शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
2
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
3
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
4
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
5
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
6
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
7
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
8
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
9
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
10
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
11
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
12
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
13
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
14
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
15
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
16
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
17
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
18
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
19
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
20
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तंटामुक्त योजनेला लागला ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST

सांगली : गावातील तंटे गावातच मिटवून पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरणे जायला लागू नयेत यासाठी शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त ...

सांगली : गावातील तंटे गावातच मिटवून पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरणे जायला लागू नयेत यासाठी शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त योजनेस जिल्ह्यात ब्रेक लागला आहे. योजनेत सहभागच न घेतल्याने गेल्या दोन वर्षांपासून तंटामुक्त समिती केवळ कागदावरच राहिल्या असून ग्रामीण भागातील वाद आता पोलीस ठाण्यात येत आहेत.

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ रोजी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. पहिल्या चार वर्षांत सर्वत्र योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला होता. योजनेत सहभागी होऊन यशस्वी झालेल्या गावांना मोठ्या रकमेची बक्षिसेही देण्यात येत होती. त्यामुळे सहभागी होऊन अनेक गावे तंटामुक्त झाली. यातील अनेक गावात अजूनही वादाचे प्रसंग घडले तर ते स्थानिक पातळीवरच सोडविले जातात. मात्र, शासनाकडून निधीसाठी पूर्तता न झाल्याने अंमलबजावणीत गती मिळू शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यानेही सहभाग कमी केला आहे.

गावपातळीवर होणारे वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने त्यांची तीव्रता वाढत होती. याशिवाय पोलिसांवरील ताणही वाढत होता. तंटामुक्त समिती गावपातळीवर कोणतीही घटना घडल्यास त्याच स्तरावर बैठक घेऊन विषय मिटवित होते. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचेही प्रमाण घटले होते. आता पुन्हा एकदा गावातील छोटे मोठे तंटे पोलिसांकडे येत असून त्यात समन्वयकाची भूमिका घेताना पोलिसांची कसरत होत आहे.

चौकट

समित्या कागदावरच

ग्रामसभांमध्ये विषय चर्चेला घेऊन तंटामुक्त समिती गठीत केली जात असे. मात्र, ग्रामसभेलाच आता हा विषय घेतला जात नाही. याशिवाय काही वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यात वाद गेल्यानंतर पोलीसच तंटामुक्त समिती व पोलीस पाटलांशी संपर्क साधून वाद मिटविण्यासाठी प्राधान्य देत होते. आता थेट तक्रार नोंदवून घेतली जात आहे किंवा पोलीसच प्रकरण ‘मिटवत’ आहेत.

चौकट

‘तंटामुक्त’ अध्यक्षपदासाठी तंटा!

शासनाच्या इतर अनेक चांगल्या योजनेत जसा राजकारणाचा शिरकाव होतो तसा या योजनेतही झाला. गावातील बडी राजकीय मंडळी अध्यक्षपद आपल्याकडेच ठेवून गावावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद मिळावे यासाठी अनेक गावात तंटे झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाद टाळण्यासाठीही केवळ कागदोपत्री योजना सुरू ठेवून अंमलबजावणी कमी केल्याचेच सध्या चित्र आहे.