शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

जिल्ह्यात तंटामुक्त योजनेला लागला ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST

सांगली : गावातील तंटे गावातच मिटवून पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरणे जायला लागू नयेत यासाठी शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त ...

सांगली : गावातील तंटे गावातच मिटवून पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरणे जायला लागू नयेत यासाठी शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त योजनेस जिल्ह्यात ब्रेक लागला आहे. योजनेत सहभागच न घेतल्याने गेल्या दोन वर्षांपासून तंटामुक्त समिती केवळ कागदावरच राहिल्या असून ग्रामीण भागातील वाद आता पोलीस ठाण्यात येत आहेत.

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ रोजी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. पहिल्या चार वर्षांत सर्वत्र योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला होता. योजनेत सहभागी होऊन यशस्वी झालेल्या गावांना मोठ्या रकमेची बक्षिसेही देण्यात येत होती. त्यामुळे सहभागी होऊन अनेक गावे तंटामुक्त झाली. यातील अनेक गावात अजूनही वादाचे प्रसंग घडले तर ते स्थानिक पातळीवरच सोडविले जातात. मात्र, शासनाकडून निधीसाठी पूर्तता न झाल्याने अंमलबजावणीत गती मिळू शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यानेही सहभाग कमी केला आहे.

गावपातळीवर होणारे वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने त्यांची तीव्रता वाढत होती. याशिवाय पोलिसांवरील ताणही वाढत होता. तंटामुक्त समिती गावपातळीवर कोणतीही घटना घडल्यास त्याच स्तरावर बैठक घेऊन विषय मिटवित होते. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचेही प्रमाण घटले होते. आता पुन्हा एकदा गावातील छोटे मोठे तंटे पोलिसांकडे येत असून त्यात समन्वयकाची भूमिका घेताना पोलिसांची कसरत होत आहे.

चौकट

समित्या कागदावरच

ग्रामसभांमध्ये विषय चर्चेला घेऊन तंटामुक्त समिती गठीत केली जात असे. मात्र, ग्रामसभेलाच आता हा विषय घेतला जात नाही. याशिवाय काही वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यात वाद गेल्यानंतर पोलीसच तंटामुक्त समिती व पोलीस पाटलांशी संपर्क साधून वाद मिटविण्यासाठी प्राधान्य देत होते. आता थेट तक्रार नोंदवून घेतली जात आहे किंवा पोलीसच प्रकरण ‘मिटवत’ आहेत.

चौकट

‘तंटामुक्त’ अध्यक्षपदासाठी तंटा!

शासनाच्या इतर अनेक चांगल्या योजनेत जसा राजकारणाचा शिरकाव होतो तसा या योजनेतही झाला. गावातील बडी राजकीय मंडळी अध्यक्षपद आपल्याकडेच ठेवून गावावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद मिळावे यासाठी अनेक गावात तंटे झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाद टाळण्यासाठीही केवळ कागदोपत्री योजना सुरू ठेवून अंमलबजावणी कमी केल्याचेच सध्या चित्र आहे.