शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

जिल्ह्यात तंटामुक्त योजनेला लागला ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST

सांगली : गावातील तंटे गावातच मिटवून पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरणे जायला लागू नयेत यासाठी शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त ...

सांगली : गावातील तंटे गावातच मिटवून पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरणे जायला लागू नयेत यासाठी शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त योजनेस जिल्ह्यात ब्रेक लागला आहे. योजनेत सहभागच न घेतल्याने गेल्या दोन वर्षांपासून तंटामुक्त समिती केवळ कागदावरच राहिल्या असून ग्रामीण भागातील वाद आता पोलीस ठाण्यात येत आहेत.

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ रोजी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. पहिल्या चार वर्षांत सर्वत्र योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला होता. योजनेत सहभागी होऊन यशस्वी झालेल्या गावांना मोठ्या रकमेची बक्षिसेही देण्यात येत होती. त्यामुळे सहभागी होऊन अनेक गावे तंटामुक्त झाली. यातील अनेक गावात अजूनही वादाचे प्रसंग घडले तर ते स्थानिक पातळीवरच सोडविले जातात. मात्र, शासनाकडून निधीसाठी पूर्तता न झाल्याने अंमलबजावणीत गती मिळू शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यानेही सहभाग कमी केला आहे.

गावपातळीवर होणारे वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने त्यांची तीव्रता वाढत होती. याशिवाय पोलिसांवरील ताणही वाढत होता. तंटामुक्त समिती गावपातळीवर कोणतीही घटना घडल्यास त्याच स्तरावर बैठक घेऊन विषय मिटवित होते. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचेही प्रमाण घटले होते. आता पुन्हा एकदा गावातील छोटे मोठे तंटे पोलिसांकडे येत असून त्यात समन्वयकाची भूमिका घेताना पोलिसांची कसरत होत आहे.

चौकट

समित्या कागदावरच

ग्रामसभांमध्ये विषय चर्चेला घेऊन तंटामुक्त समिती गठीत केली जात असे. मात्र, ग्रामसभेलाच आता हा विषय घेतला जात नाही. याशिवाय काही वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यात वाद गेल्यानंतर पोलीसच तंटामुक्त समिती व पोलीस पाटलांशी संपर्क साधून वाद मिटविण्यासाठी प्राधान्य देत होते. आता थेट तक्रार नोंदवून घेतली जात आहे किंवा पोलीसच प्रकरण ‘मिटवत’ आहेत.

चौकट

‘तंटामुक्त’ अध्यक्षपदासाठी तंटा!

शासनाच्या इतर अनेक चांगल्या योजनेत जसा राजकारणाचा शिरकाव होतो तसा या योजनेतही झाला. गावातील बडी राजकीय मंडळी अध्यक्षपद आपल्याकडेच ठेवून गावावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद मिळावे यासाठी अनेक गावात तंटे झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाद टाळण्यासाठीही केवळ कागदोपत्री योजना सुरू ठेवून अंमलबजावणी कमी केल्याचेच सध्या चित्र आहे.