शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आगारातील वादात शिराळ्यात एसटी बंद

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

प्रवासी वेठीस : कर्मचाऱ्यांचा आगार प्रमुखांवर अरेरावीचा आरोप

शिराळा : नवीन वर्षारंभीच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वादामुळे एसटी बससेवा बंद राहण्याचा प्रकार शिराळा आगारात शुक्रवारी घडला. यामुळे विद्यार्थी, महिला, नोकरदार, वयोवृद्धांना त्रास झाला. दि. ३१ डिसेंबररोजी सायंकाळी सातच्या सुमारास येथील मिनी बसच्या चालक-वाहकांनी डबल ड्युटी केली होती. ते दुपारी जेवलेही नव्हते. मात्र त्यांची गाडी ब्रेकडाऊन झाल्याने अर्धा तास उशीर झाला. परिणामी इस्लामपूरला फेरी जमणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र आगारप्रमुख जी. डी. पाटील यांनी या कर्मचाऱ्यांना प्रवाशांसमोर अर्वाच्य भाषेत बोल सुनावले. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी सुनावले. शुक्रवारी सकाळपासून एसटी चालक, वाहकांनी नियमानुसार काम व व्यवस्थित गाडी असेल तरच ताब्यात घ्यायची, असा पवित्रा घेतला. त्यातून सर्वच गाड्या ताब्यात घेण्यास नकार दिला. अनेक फेऱ्या रद्द झाल्या. हा बंद अचानक झाल्याने प्रवाशांना त्रास सोसावा लागला. याबाबत संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले की, शिराळा आगाराकडे १४३ वाहक आहेत. त्यापैकी दोघे येथे नाहीत. एक मृत झाला आहे, पाच महिला वाहक बाळंतपणाच्या रजेवर, तीन वाहक नियंत्रण कक्षाकडे आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना डबल ड्युटी करावी लागते. ते उपाशीपोटी काम करतात. गेल्या तीन वर्षात फक्त चार नव्या गाड्या आल्या आहेत. त्या आठ लाख किलोमीटरपेक्षा जास्त फिरल्या आहेत. त्यामुळे दुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. आगारातून जाणारी गाडी परत सुरक्षित येईलच याची खात्री नाही. प्रादेशिक परिवहन विभागाने दोन वाहनांवर कारवाई केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना दंडही भरावा लागला आहे.आगार प्रमुखांचा कर्मचाऱ्यांवर विश्वास नाही. (वार्ताहर)तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागेदुपारी दोन वाजता विभागीय वाहतूक अधीक्षक घन:श्याम पाटील, यंत्र अभियंता ए. एम. वाघाटे, कामगार अधिकारी सौ. व्ही. एस. डांगरे, इस्लामपूर आगारप्रमुख बी. व्ही. कदम यांनी आगारामध्ये अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन, कर्मचारी वर्गाच्या तक्रारी, मागण्या ऐकून घेतल्या. अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत अपेक्षा जाणून घेतल्या. याबाबत तोडगा काढल्यानंतर दुपारी तीन वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले.संबंधित वाहक-चालकांना आम्ही सांगितले की, ड्युटी अर्धवट सोडता येणार नाही. फेरी रद्द करू नका. ही फेरी इस्लामपूर जलद असून जाण्या-येण्यास ५० मिनिटे लागतील. ही फेरी रद्द केली, तर तुमच्या पगाराचे नुकसान होईल. मात्र या सांगण्याचा विपर्यास करून हा प्रकार घडला आहे. - जी. डी. पाटील, आगारप्रमुख, शिराळा