शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास टक्केपेक्षा जास्त थकबाकीच्या ग्रामपंचायती बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:25 IST

गेल्यावर्षी कोरोनामुळे वसुली करू नये, असे शासनाने सांगितले होते. यामुळे ग्रामपंचायत विभागाने वसुलीत शिथिलता ठेवली होती. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती ...

गेल्यावर्षी कोरोनामुळे वसुली करू नये, असे शासनाने सांगितले होते. यामुळे ग्रामपंचायत विभागाने वसुलीत शिथिलता ठेवली होती. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिघडल्याने जिल्हा परिषदेने सर्वांचाच सहानुभूतीपूर्वक विचार केला. परंतु यामुळे थकबाकीचा आकडा वाढत गेला आहे. जिल्ह्यात सध्या घरपट्टीची २४ कोटी व पाणीपट्टीची १७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात मिरज, वाळवा, आटपाडी, तासगाव या तालुक्यात पाणीपट्टी, घरपट्टी करांची थकबाकी सर्वाधिक आहे. थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचांनी ग्रामसेवक आणि तेथील कर्मचाऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी अथवा सदस्यांकडे कराची थकबाकी असेल तर त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. शासनाने कायद्यात तशी तरतूद केली आहे. वसुली खूपच वर्षांची असल्यास ग्रामपंचायती बरखास्त करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. तसा आदेश शासनाने काढला आहे. यामुळे कोणीही कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नये. सर्वांनी वसुलीसाठी सहकार्य करावे. अन्यथा कोणत्याही सुविधा दिल्या जाणार नाहीत.

चौकट

पाणीपट्टी वसुलीसाठी कनेक्शन खंडित होणार

पाणीपट्टी वसुली झाली तरच शुद्ध आणि दर्जेदार पाण्याची सुविधा देणे शक्य आहे. महावितरणचे वीजबिल भरले नाही तर त्यांच्याकडून वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका असतो. ५० टक्के पाणीपट्टी थकबाकीदारामुळे उर्वरित ५० टक्के नियमित कर भरणाऱ्यांना शिक्षा होऊ नये. यासाठीच ग्रामसेवकांनी थकबाकीदार व्यक्तींचे पाणी कनेक्शन खंडित करण्याचे आदेशही दिले आहेत, अशी माहितीही तानाजी लोखंडे यांनी दिले आहेत.