शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

पन्नास टक्केपेक्षा जास्त थकबाकीच्या ग्रामपंचायती बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:25 IST

गेल्यावर्षी कोरोनामुळे वसुली करू नये, असे शासनाने सांगितले होते. यामुळे ग्रामपंचायत विभागाने वसुलीत शिथिलता ठेवली होती. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती ...

गेल्यावर्षी कोरोनामुळे वसुली करू नये, असे शासनाने सांगितले होते. यामुळे ग्रामपंचायत विभागाने वसुलीत शिथिलता ठेवली होती. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिघडल्याने जिल्हा परिषदेने सर्वांचाच सहानुभूतीपूर्वक विचार केला. परंतु यामुळे थकबाकीचा आकडा वाढत गेला आहे. जिल्ह्यात सध्या घरपट्टीची २४ कोटी व पाणीपट्टीची १७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात मिरज, वाळवा, आटपाडी, तासगाव या तालुक्यात पाणीपट्टी, घरपट्टी करांची थकबाकी सर्वाधिक आहे. थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचांनी ग्रामसेवक आणि तेथील कर्मचाऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी अथवा सदस्यांकडे कराची थकबाकी असेल तर त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. शासनाने कायद्यात तशी तरतूद केली आहे. वसुली खूपच वर्षांची असल्यास ग्रामपंचायती बरखास्त करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. तसा आदेश शासनाने काढला आहे. यामुळे कोणीही कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नये. सर्वांनी वसुलीसाठी सहकार्य करावे. अन्यथा कोणत्याही सुविधा दिल्या जाणार नाहीत.

चौकट

पाणीपट्टी वसुलीसाठी कनेक्शन खंडित होणार

पाणीपट्टी वसुली झाली तरच शुद्ध आणि दर्जेदार पाण्याची सुविधा देणे शक्य आहे. महावितरणचे वीजबिल भरले नाही तर त्यांच्याकडून वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका असतो. ५० टक्के पाणीपट्टी थकबाकीदारामुळे उर्वरित ५० टक्के नियमित कर भरणाऱ्यांना शिक्षा होऊ नये. यासाठीच ग्रामसेवकांनी थकबाकीदार व्यक्तींचे पाणी कनेक्शन खंडित करण्याचे आदेशही दिले आहेत, अशी माहितीही तानाजी लोखंडे यांनी दिले आहेत.