शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

ठराविक कार्यकर्त्यांच्या कोंडाळ्यामुळे धुसफूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:48 IST

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासोबत असलेले तेच-तेच कार्यकर्ते आमदार पाटील ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासोबत असलेले तेच-तेच कार्यकर्ते आमदार पाटील यांची मुले प्रतीक आणि राजवर्धन यांच्याभोवतीही दिसतात. त्यामुळे तिसऱ्या फळीतील युवा कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे युवा पिढी राष्ट्रवादीपासून दुरावू लागली आहे. पक्षातील या धुसफुशीमुळे काहींनी पक्षबदल करून भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.राजारामबापू पाटील यांच्या संपूर्ण घराण्यावर निष्ठा असणारे कार्यकर्ते मोजकेच आहेत, तर आ. जयंत पाटील जेव्हापासून राजकारणात सक्रिय आहेत, तेव्हापासून त्यांच्याजवळ असलेले प्रस्थापित कार्यकर्तेच आजही त्यांच्याभोवती दिसतात. नवीन कार्यकर्त्यांना आ. पाटील यांच्याजवळ फिरकू दिले जात नाही. तिसºया फळीतील युवा कार्यकर्त्यांचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे त्यांनी आ. पाटील यांची मुले प्रतीक आणि राजवर्धन यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. परंतु येथेही तीच मंडळी आडवी येत आहेत. त्यामुळे युवक कार्यकर्त्यांनी विरोधी गटातील युवा नेत्यांना जवळ करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात निशिकांत पाटील, वैभव शिंदे, गौरव नायकवडी, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सागर खोत यांची ताकद वाढू लागली आहे. युवक कार्यकर्त्यांना सध्यातरी येथील राष्ट्रवादीत वाव मिळत नाही. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या पदाधिकाऱ्यांना खुर्च्या सोडाव्याशा वाटत नाहीत. राजारामबापू उद्योग समूहाची तीच अवस्था आहे. विविध संस्थांतील पदाधिकाºयांनी गेली कित्येक वर्षे पदे सोडलेली नाहीत. जे युवक कार्यकर्ते ज्येष्ठांना अडसर ठरू लागले, त्यांना खड्यासारखे बाजूला करण्यातही ही प्रस्थापित मंडळी माहीर आहेत.दोघांभोवती जुन्या नेत्यांचीच गर्दीराजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगतसिंह व जयंत पाटील यांना राजकारणात आणण्यासाठी काही ठराविक कार्यकर्त्यांचा रेटा होता, तर काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथे बैठक घेऊन, या दोघांच्या नावाला विरोध केला होता. जयंत पाटील यांचे राजकीय वारसदार निश्चित नाहीत. मात्र आ. पाटील यांनी प्रतीक आणि राजवर्धन यांना उद्योग समूहाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय केले आहे. परंतु त्या दोघांभोवती असलेले जुने कोंडाळे मात्र राजकारणाचा मोकळा श्वास घेऊ देत नाही.