शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडच्या विद्यार्थ्यांकडून फटाकेमुक्तीचा संकल्प

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम : प्रदूषणमुक्त दिवाळीचा निर्धार, शिक्षकांनीही घेतला सहभाग

कुपवाड : दीपावलीमध्ये लहान-थोरांकडून फटाक्यांची मोठ्याप्रमाणात आतषबाजी होते. हे फटाके म्हणजेच स्फोटकाचे छोटे रूपच. या फटाक्यांमुळे हवा आणि आवाजाचे प्रदूषण होते. या प्रदूषणाचा मानवाला आणि सृष्टीला खूप त्रास होतो. ‘त्यामुळेच आपण लुटायची मजा, कोणाला तरी होते सजा’ असे कदापीही होऊ देणार नसल्याची शपथ शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एकच्या विद्यार्थ्यांनी घेतली. सृष्टीच्या हितासाठी पर्यावरणाच्या रक्षणासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्धार या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.कुपवाडमधील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक ही स्वातंत्र्यसैनिकांची शाळा म्हणून परिचित आहे. शंभर वर्षांची परंपरा लाभलेल्या या शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये देशासाठी चांगले योगदान दिले. त्या माजी विद्यार्थ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच शाळा क्रमांक एकमधील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यंदाच्या दीपावलीमध्ये प्रदूषण नियंत्रणाबरोबरच फटाके न उडविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मागीलवर्षी त्यांच्याच शाळेतील एका सवंगड्याला दीपावलीमध्ये फटाके उडविताना इजा झाली होती. त्यामध्ये त्याला बरेच दिवस रुग्णालयात घालवावे लागले होते. या घटनेतून बोध घेत येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यंदा प्रदूषण आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शपथही घेतली.प्रतिज्ञेवेळी विद्यार्थ्यांबरोबरच प्रभारी मुख्याध्यापक महादेव हेगडे, बाळासाहेब गायकवाड, अण्णासाहेब जाधव, शिखरजी लखणे, हनुमंत सनगर, विजया शिंदे, रत्ना हेगडे, शारदा आडके, रंजना कांबळे, सुचित्रा कुंभार आणि रेश्मा खतीब हे शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी, केंद्रप्रमुख शशिकांत नागरगोजे यांचे मार्गदर्शन लाभले. याबरोबरच या शाळेने इतरही आदर्श असे उपक्रम राबवून जिल्ह्याबरोबरच राज्यात नाव उंचावले आहे. राज्यातून पाचशेहून अधिक शिक्षकांनी उपक्रमाची माहिती घेण्यासाठी या शाळेला भेटी दिल्या आहेत. (वार्ताहर)शाळेचे अभिनव उपक्रमशाळेने परिसरात औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. निर्माल्यापासून सेंद्रीय खतांचा उपक्रम राबविला आहे. स्वतंत्र संचलन युनिटसह झांज, लेझीम आणि बँडपथक निर्माण केले आहे. ज्ञानरचना वादावर आधारित अध्यापन पध्दतीचा वापर केला आहे, असे शिक्षक बाळू गायकवाड यांनी सांगितले.