शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

मतदारांत अविश्वास आणि अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:38 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क । सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे ...

शरद जाधव ।

लोकमत न्यूज नेटवर्क ।

सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे कशापद्धतीने पाहतात, त्यांच्या नजरेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जायला हवेत, याचा आढावा घेणारी ही मुलाखत...साहित्यिक, अभ्यासक म्हणून तुम्ही सध्याच्या निवडणुकीच्या वातावरणाकडे कसे पाहता?पहिल्या निवडणुकीपासून मला अनुभव आहे. पहिली निवडणूक सोडली तर, प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविला आहे. आजच्या मतदारांमध्ये प्रकर्षाने अस्वस्थता दिसून येते आहे. अविश्वासाचे वातावरण वाढत आहे. सर्वच घटकांमध्ये अस्वस्थता व त्याबद्दलचा विश्वास वाटत नसल्याचे या निवडणुकीतच दिसून येत आहे. साहित्यिक म्हणून हे अस्वस्थ करणारे आहे.लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत?सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शिक्षणासाठी भरीव तरतूद व क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाही. प्राथमिक शिक्षणाचा पाया खूपच कमकुवत आहे. डिजिटलायझेशनकडे लक्ष देताना श्रम आणि शिक्षणाची सांधेजोड होताना दिसत नाही. शिक्षणाबद्दल खूप मोठी अनास्था असून, शिक्षण घेतलेल्यांनी श्रम करायचेच नाहीत, असा समज निर्माण झालेला आहे. शिक्षण क्षेत्राला अग्रस्थान हवे.तुमच्या क्षेत्राशी निगडित मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्त्व देतात?भाषिक प्रश्न अद्यापही कायम आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा, याची अनेक वर्षांपासूनची मागणी असली तरी, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संशोधनासाठी निरामय वातावरण मिळत नसून, त्यात सवंगपणा आला आहे. विद्यापीठस्तरावर संशोधनात सुमारपणा आला आहे. कसदार साहित्य निर्माण होताना दिसत नाही आणि प्रामाणिक संशोधकांना शासकीय पातळीवर दडपण सहन करावे लागत आहे.नवीन मतदारांनाकाय आवाहन कराल?प्रत्येक पिढीच्या समस्या वेगळ्या आहेत. समाजातील अनेक स्तरावर कार्यरत तरूणांच्या काही अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मतदान जरूर करावे. सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळण्यासाठी मतदान करावे.