शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

मतदारांत अविश्वास आणि अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:38 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क । सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे ...

शरद जाधव ।

लोकमत न्यूज नेटवर्क ।

सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे कशापद्धतीने पाहतात, त्यांच्या नजरेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जायला हवेत, याचा आढावा घेणारी ही मुलाखत...साहित्यिक, अभ्यासक म्हणून तुम्ही सध्याच्या निवडणुकीच्या वातावरणाकडे कसे पाहता?पहिल्या निवडणुकीपासून मला अनुभव आहे. पहिली निवडणूक सोडली तर, प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविला आहे. आजच्या मतदारांमध्ये प्रकर्षाने अस्वस्थता दिसून येते आहे. अविश्वासाचे वातावरण वाढत आहे. सर्वच घटकांमध्ये अस्वस्थता व त्याबद्दलचा विश्वास वाटत नसल्याचे या निवडणुकीतच दिसून येत आहे. साहित्यिक म्हणून हे अस्वस्थ करणारे आहे.लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत?सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शिक्षणासाठी भरीव तरतूद व क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाही. प्राथमिक शिक्षणाचा पाया खूपच कमकुवत आहे. डिजिटलायझेशनकडे लक्ष देताना श्रम आणि शिक्षणाची सांधेजोड होताना दिसत नाही. शिक्षणाबद्दल खूप मोठी अनास्था असून, शिक्षण घेतलेल्यांनी श्रम करायचेच नाहीत, असा समज निर्माण झालेला आहे. शिक्षण क्षेत्राला अग्रस्थान हवे.तुमच्या क्षेत्राशी निगडित मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्त्व देतात?भाषिक प्रश्न अद्यापही कायम आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा, याची अनेक वर्षांपासूनची मागणी असली तरी, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संशोधनासाठी निरामय वातावरण मिळत नसून, त्यात सवंगपणा आला आहे. विद्यापीठस्तरावर संशोधनात सुमारपणा आला आहे. कसदार साहित्य निर्माण होताना दिसत नाही आणि प्रामाणिक संशोधकांना शासकीय पातळीवर दडपण सहन करावे लागत आहे.नवीन मतदारांनाकाय आवाहन कराल?प्रत्येक पिढीच्या समस्या वेगळ्या आहेत. समाजातील अनेक स्तरावर कार्यरत तरूणांच्या काही अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मतदान जरूर करावे. सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळण्यासाठी मतदान करावे.