शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

देवराष्ट्रेत काँग्रेससमोर गटबाजीची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 22:38 IST

देवराष्ट्रे : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव असलेल्या देवराष्ट्रेत ग्रामपंचायत सरपंचपद खुले असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे.

ठळक मुद्दे ग्रामपंचायत निवडणूक : भाजप नेत्यांचाही सूर जुळेना; प्रभागवार बैठकांवर जोरभाजपने ५ प्रभागात उमेदवार निश्चित केल्याचे समजते. पण काँग्रेसचे उमेदवार पाहूनच भाजप आपली उमेदवारी ठरविणार, हे निश्चित.जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी यासाठी मोठे बळ उभे केले आहे.

अतुल जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव असलेल्या देवराष्ट्रेत ग्रामपंचायत सरपंचपद खुले असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. अंतर्गत कुरघोड्यांमुळे काँग्रेससाठी सोपी वाटणारी ही निवडणूक सध्या गटा-तटाच्या अवघड घाटात अडकली आहे. तसेच भाजप नेत्यांचेही सूर जुळता जुळेनासे झाले आहेत. सध्या दोन्ही गटांनी बैठकांवर जोर दिल्याचे चित्र आहे.देवराष्ट्रेत ५ प्रभागात ५ हजार ४५६ मतदार असून १५ जागांसाठी निवडणूक लढविली जाणार आहे. सरपंचपद खुले असल्याने मोठी चुरस असून प्रकाश मोरे, आनंदराव मोरे, नारायण साळुंखे, प्रमोद गावडे, अजित मोरे, माणिक मोरे, तानाजी महिंद हे या पदासाठी इच्छुक आहेत.कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रेची निवडणूक नेहमीच लक्षवेधी ठरत असते.

डॉ. पतंगराव कदम यांचे निष्ठावंत कार्यकर्ते माजी उपसभापती मोहनराव मोरे व सोनहिरा साखर कारखान्याचे संचालक पोपट महिंद यांनी या ग्रामपंचायतीवर कायम काँग्रेस पक्षाची सत्ता ठेवली आहे. पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात देवराष्ट्रे गट वगळता सर्वत्र काँग्रेसचे पानिपत झाले, पण देवराष्ट्रेकरांनी आपला गड कायम राखला. काँग्रेसमधील एकीने भाजपची लाट थोपवली. हीच एकी कायम राहिली, तर देवराष्ट्रे ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता कायम राहील, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत

सध्या काँग्रेसअंतर्गत गटबाजीने भाजपमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपचे नेते धोंडीराम महिंद, तानाजी महिंद, अजित मोरे यांनी देवराष्ट्रे ग्रामपंचायतीत वर्षानुवर्षे असलेली काँग्रेसची सत्ता उलथविण्याचा चंग बांधला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी यासाठी मोठे बळ उभे केले आहे.

काँग्रेसअंतर्गत असलेल्या दुफळीने दुसºया गटाने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. दीपक शिंदे, प्रमोद गावडे, नारायण साळुंखे यांनी जोरदार मोर्चेबांधणी करीत पॅनेल उभे करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे काँग्रेसअंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. गटबाजी मिटविण्यासाठी डॉ. पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम यांनी प्रयत्न चालविले आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांमधील अंतर्गत असंतोष निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर येत आहे. तो थोपविण्यात नेत्यांना अपेक्षित यश येत नसल्याने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज दिसत आहे. भाजपने ५ प्रभागात उमेदवार निश्चित केल्याचे समजते. पण काँग्रेसचे उमेदवार पाहूनच भाजप आपली उमेदवारी ठरविणार, हे निश्चित.समझोता एक्स्प्रेस : घसरली.....!गावात पाच प्रभाग असून १० बुथवर मतदान होणार आहे. यामध्ये प्रभाग १ व २ चे मतदान मराठी शाळेत, तर प्रभाग ३ ते ५ मधील मतदान यशवंतराव हायस्कूलमध्ये होणार आहे.