शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

राष्टवादीविरोधी विकास आघाडीमध्ये फुटीचे संकेत : सदाभाऊ-निशिकांतदादा यांच्यात संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:04 IST

इस्लामपूर व शिराळा मतदारसंघातील आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याआधीच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीत धुसफूस सुरू झाली

ठळक मुद्देमहाडिक बंधूंचे आव्हान

अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपूर व शिराळा मतदारसंघातील आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याआधीच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. त्यातच पेठनाक्यावरील महाडिक पिता-पुत्रांचे आव्हान कोण थोपविणार, याचीही चिंता आघाडीसमोर आहे. आता खोत आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यातील अंतर्गत संघर्षाची चर्चा रंगू लागली आहे. त्यातून आघाडीत फूट पडण्याचे संकेत मिळत आहेत.

इस्लामपूर मतदारसंघात राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांना शह देण्यासाठी सरसावलेली विरोधकांची विकास आघाडीची नौका लोकसभा, विधानसभा निवडणुकीआधीच हेलकावे खाऊ लागली आहे. रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी मेळाव्यापासून सदाभाऊ खोत आणि निशिकांत पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. इस्लामपूर नगरपालिकेतील विकास आघाडीचे पक्षप्रतोद व गटनेते विक्रम पाटील आणि नगराध्यक्ष पाटील यांच्यातील मतभेदही आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

इस्लामपुरात विकास आघाडीची ही अवस्था असताना, पेठनाक्यावरील महाडिक पिता—पुत्रांनी आघाडीचा विचार न घेता विधानसभेच्या इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. नानासाहेब महाडिक यांच्या दोन्ही मुलांनी इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात लढण्याची तयारी केली आहे. त्यातच सदाभाऊ खोत आणि नानासाहेब महाडिक यांची गाडी एकत्रित धावू लागल्याने शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक आणि इस्लामपुरातील इच्छुक निशिकांत पाटील यांच्या समर्थकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.विकास आघाडीतील नेते याबाबत काहीही स्पष्ट बोलत नसल्याचे चित्र आहे. सर्वच प्रमुख नेत्यांमध्ये धुसफूस असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. 

राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी विकास आघाडी वाटचाल करीत आहे. परंतु आमच्यातील काही नेते राष्ट्रवादीला सोबत घेऊन विकास कामांची उद्घाटने करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीविरोधी नेत्यांना धक्का बसला आहे. गेल्या तीस वर्षात राष्ट्रवादीने विरोधकांना कोठेच स्थान दिलेले नाही. अण्णासाहेब डांगे मंत्री असताना देखील राष्ट्रवादीने ‘प्रोटोकॉल’ पाळला नव्हता. मग विकास आघाडीतील नेत्यांनाच राष्ट्रवादीचा पुळका का आला आहे?- विक्रम पाटील, गटनेते,विकास आघाडी, इस्लामपूर.विकास आघाडी भक्कमपणे एकत्रित काम करीत आहे. शिराळा मतदारसंघात मी निवडणूक लढविणार हे निश्चित आहे. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून भाजपकडून उमेदवारी मागितली आहे. त्यांच्या निर्णयाची वाट बघत आहोत. अन्यथा ‘एकला चलो रे’ची भूमिका ठेवणार आहे.- सम्राट महाडिक,माजी जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :PoliticsराजकारणSadabhau Khotसदाभाउ खोत