शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

शेतकरी म्हणजे आतंकवादी वाटले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:19 IST

सांगली : खंदक खोदून राज्यांच्या सीमेवर अडविण्याचा प्रयत्न केला गेला. भाजप सरकारला शेतकरी म्हणजे आतंकवादी वाटले का, असा सवाल ...

सांगली : खंदक खोदून राज्यांच्या सीमेवर अडविण्याचा प्रयत्न केला गेला. भाजप सरकारला शेतकरी म्हणजे आतंकवादी वाटले का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, ८ डिसेंबरला होणाऱ्या देशव्यापी संपामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसह शेतकरी नसलेल्या सर्व घटकांनी सहभागी व्हावे. पोशिंदा जगविण्यासाठी सर्वांची साथ हवी आहे. संकटकाळात बळीराजाने तुम्हाला पोसले. आता त्याच्या संकटात सर्व घटकांनी साथ द्यावी. केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवत आहे. त्यांना आपल्याच देशाच्या राजधानीत जाण्यापासून रोखले जात आहे. खलिस्तानवादी संबोधून त्यास राजकीय व जातीय रंग देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.

केंद्र सरकारचे हे कायदे म्हणजे दोन उद्योजकांसाठी देशातील शेतीला गहाण ठेवण्याचा प्रकार आहे. त्यांचे हे उद्योग एअर इंडियापासून अनेक कंपन्यांच्या बाबतीत समोर आले आहेत. तरीही ते थांबण्यास तयार नाहीत.

शेती कराराचे आजवरचे सर्व प्रयोग फसले आहेत. पॉपकॉर्न, बेबीकॉर्न, स्ट्रॉबेरी, भाजीपाला, शेळी-मेंढी असे अनेक करार फसले आहेत. सध्या गाजत असलेला कडकनाथ घोटाळाही याच करार पद्धतीचा आहे. त्यामुळे अशा करार पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. साठामर्यादा उठविल्याने छोट्या शेतकऱ्यांनी माल विकायचा कोठे, असा प्रश्न निर्माण होईल.

चौकट

राज्याच्या अधिकारावर गदा

एका बाजूला कर्जमाफी देताना तो राज्याचा विषय म्हणून सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला कायदे राज्यावर लादायचे, असा दुटप्पीपणा केंद्र सरकार करीत आहे. राज्याच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्याने अनेक राज्यांनी त्याच्या अंमलबजावणीस विरोध केला आहे.

चाैकट

...तर कारखाने बंद पाडणार

एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांचे परवाने रद्दची मागणी आम्ही केली आहे. त्यानंतरही कारवाई न झाल्यास असे सर्व कारखाने आम्ही बंद पाडू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

चौकट

निवडणुकांत परिणाम होतील

विधानपरिषदेच्या निकालात कृषी विधेयकाचे परिणाम दिसले. भविष्यातील निवडणुकांतही ते दिसतील. कारण ६५ टक्के समाज हा शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे, असेही शेट्टी म्हणाले.