शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

शेतकरी म्हणजे आतंकवादी वाटले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:19 IST

सांगली : खंदक खोदून राज्यांच्या सीमेवर अडविण्याचा प्रयत्न केला गेला. भाजप सरकारला शेतकरी म्हणजे आतंकवादी वाटले का, असा सवाल ...

सांगली : खंदक खोदून राज्यांच्या सीमेवर अडविण्याचा प्रयत्न केला गेला. भाजप सरकारला शेतकरी म्हणजे आतंकवादी वाटले का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, ८ डिसेंबरला होणाऱ्या देशव्यापी संपामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसह शेतकरी नसलेल्या सर्व घटकांनी सहभागी व्हावे. पोशिंदा जगविण्यासाठी सर्वांची साथ हवी आहे. संकटकाळात बळीराजाने तुम्हाला पोसले. आता त्याच्या संकटात सर्व घटकांनी साथ द्यावी. केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवत आहे. त्यांना आपल्याच देशाच्या राजधानीत जाण्यापासून रोखले जात आहे. खलिस्तानवादी संबोधून त्यास राजकीय व जातीय रंग देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.

केंद्र सरकारचे हे कायदे म्हणजे दोन उद्योजकांसाठी देशातील शेतीला गहाण ठेवण्याचा प्रकार आहे. त्यांचे हे उद्योग एअर इंडियापासून अनेक कंपन्यांच्या बाबतीत समोर आले आहेत. तरीही ते थांबण्यास तयार नाहीत.

शेती कराराचे आजवरचे सर्व प्रयोग फसले आहेत. पॉपकॉर्न, बेबीकॉर्न, स्ट्रॉबेरी, भाजीपाला, शेळी-मेंढी असे अनेक करार फसले आहेत. सध्या गाजत असलेला कडकनाथ घोटाळाही याच करार पद्धतीचा आहे. त्यामुळे अशा करार पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. साठामर्यादा उठविल्याने छोट्या शेतकऱ्यांनी माल विकायचा कोठे, असा प्रश्न निर्माण होईल.

चौकट

राज्याच्या अधिकारावर गदा

एका बाजूला कर्जमाफी देताना तो राज्याचा विषय म्हणून सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला कायदे राज्यावर लादायचे, असा दुटप्पीपणा केंद्र सरकार करीत आहे. राज्याच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्याने अनेक राज्यांनी त्याच्या अंमलबजावणीस विरोध केला आहे.

चाैकट

...तर कारखाने बंद पाडणार

एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांचे परवाने रद्दची मागणी आम्ही केली आहे. त्यानंतरही कारवाई न झाल्यास असे सर्व कारखाने आम्ही बंद पाडू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

चौकट

निवडणुकांत परिणाम होतील

विधानपरिषदेच्या निकालात कृषी विधेयकाचे परिणाम दिसले. भविष्यातील निवडणुकांतही ते दिसतील. कारण ६५ टक्के समाज हा शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे, असेही शेट्टी म्हणाले.