शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

शेतकरी म्हणजे आतंकवादी वाटले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:19 IST

सांगली : खंदक खोदून राज्यांच्या सीमेवर अडविण्याचा प्रयत्न केला गेला. भाजप सरकारला शेतकरी म्हणजे आतंकवादी वाटले का, असा सवाल ...

सांगली : खंदक खोदून राज्यांच्या सीमेवर अडविण्याचा प्रयत्न केला गेला. भाजप सरकारला शेतकरी म्हणजे आतंकवादी वाटले का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, ८ डिसेंबरला होणाऱ्या देशव्यापी संपामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसह शेतकरी नसलेल्या सर्व घटकांनी सहभागी व्हावे. पोशिंदा जगविण्यासाठी सर्वांची साथ हवी आहे. संकटकाळात बळीराजाने तुम्हाला पोसले. आता त्याच्या संकटात सर्व घटकांनी साथ द्यावी. केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवत आहे. त्यांना आपल्याच देशाच्या राजधानीत जाण्यापासून रोखले जात आहे. खलिस्तानवादी संबोधून त्यास राजकीय व जातीय रंग देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.

केंद्र सरकारचे हे कायदे म्हणजे दोन उद्योजकांसाठी देशातील शेतीला गहाण ठेवण्याचा प्रकार आहे. त्यांचे हे उद्योग एअर इंडियापासून अनेक कंपन्यांच्या बाबतीत समोर आले आहेत. तरीही ते थांबण्यास तयार नाहीत.

शेती कराराचे आजवरचे सर्व प्रयोग फसले आहेत. पॉपकॉर्न, बेबीकॉर्न, स्ट्रॉबेरी, भाजीपाला, शेळी-मेंढी असे अनेक करार फसले आहेत. सध्या गाजत असलेला कडकनाथ घोटाळाही याच करार पद्धतीचा आहे. त्यामुळे अशा करार पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. साठामर्यादा उठविल्याने छोट्या शेतकऱ्यांनी माल विकायचा कोठे, असा प्रश्न निर्माण होईल.

चौकट

राज्याच्या अधिकारावर गदा

एका बाजूला कर्जमाफी देताना तो राज्याचा विषय म्हणून सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला कायदे राज्यावर लादायचे, असा दुटप्पीपणा केंद्र सरकार करीत आहे. राज्याच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्याने अनेक राज्यांनी त्याच्या अंमलबजावणीस विरोध केला आहे.

चाैकट

...तर कारखाने बंद पाडणार

एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांचे परवाने रद्दची मागणी आम्ही केली आहे. त्यानंतरही कारवाई न झाल्यास असे सर्व कारखाने आम्ही बंद पाडू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

चौकट

निवडणुकांत परिणाम होतील

विधानपरिषदेच्या निकालात कृषी विधेयकाचे परिणाम दिसले. भविष्यातील निवडणुकांतही ते दिसतील. कारण ६५ टक्के समाज हा शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे, असेही शेट्टी म्हणाले.