शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राची साखर उद्योगावर हुकूमशाही

By admin | Updated: September 28, 2016 23:06 IST

जयंत पाटील : राजारामबापू साखर कारखान्याची वार्षिक सभा

इस्लामपूर : केंद्रातील मोदी सरकार साखर विक्रीसाठी हुकूमशाही पध्दत राबवत आहे. शेतकऱ्यांना आपला माल कधी विकायचा, याचे स्वातंत्र्य होते. मात्र मोदी सरकारने थेट शेतकऱ्यांचे हे स्वातंत्र्यच हिरावून घेतले आहे. ऊस उत्पादकांवर अन्याय करणारी धोरणे केंद्र शासन स्वीकारत आहे. धोरणे बदलणारे सरकार लाभल्याने सर्वांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत, अशी टीका माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केली. साखरेचा दर पाडण्याचा त्यांचाच डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, सभापती रवींद्र बर्डे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, रामरावतात्या देशमुख, विष्णुपंत शिंदे, रघुनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार पाटील म्हणाले की, ‘राजारामबापू’ची कार्यक्षमता वाढविण्याच्यादृष्टीने अद्ययावत विस्तारीकरण झाले आहे. नोव्हेंबरमध्ये प्रतिदिन सात हजार टनाचे गाळप आणि २८ मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल. ग्राहकाला स्वस्त साखर देताना, ऊस उत्पादकांवर अन्याय करणारी धोरणे केंद्राकडून राबविली जात आहेत. साखर कारखानदारीला बरे दिवस आले असे वाटत असताना, पंतप्रधान मोदींनी जीवनावश्यक वस्तू कायद्याची भीती दाखवत, साखर विक्री तातडीने करण्याचे फर्मान सोडले. दोन—तीन वेळा निविदा काढूनही साखर विकली जात नाही, त्याचा दोष कारखानदारांना कसा देणार? सगळ्या कारखानदारांना एकाचवेळी साखर विक्री करायला भाग पाडून साखरेचे दर पाडण्याचा डाव खेळला जात आहे. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने एफआरपीपोटी ४५ रुपये प्रतिटन देण्याची घोषणा केली होती. मात्र हे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. कारखान्याने स्वनिधीतून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिली. केंद्र व राज्य सरकारची धोरणे धरसोड वृत्तीची आहेत. इथेनॉल निर्मितीमधील ५0 टक्के वाटा आॅईल कंपन्यांना देण्याचे बंधन घातले आहे. एफआरपीसाठी दिलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची?, हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकारला धोरण बदलायला भाग पाडले पाहिजे.आऱ डी़ माहुली यांनी नोटीस वाचन केले. सचिव प्रतापराव पाटील यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभेस प्रा़ शामराव पाटील, जनार्दनकाका पाटील, बी़ के. पाटील, विजयभाऊ पाटील, विनायकराव पाटील, जगन्नाथ पाटील, नेताजीराव पाटील, शामरावकाका पाटील, बी़ डी़ पवार, आऱ डी़ सावंत, सभापती आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, उपस्थित होते़ संचालक विराज शिंदे यांनी आभार मानले़ विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले़ (वार्ताहर)ऐनवेळच्या विषयात शहाजीबापू पाटील यांनी, शेतकऱ्यांना अ‍ॅडव्हान्सपेक्षा जास्तीचा दर द्या, अशी मागणी केली. कल्लाप्पा पोचे, सुबराव पाटील यांनीही मते मांडली़ शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, रवींद्र पिसाळ यांनीही काही सूचना केल्या़