शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

खटावला दूषित पाण्याने शंभरजणांना अतिसार

By admin | Updated: December 23, 2015 01:22 IST

तलावातील पाण्याचा परिणाम : शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा

मिरज : तालुक्यातील खटाव येथे यल्लम्मादेवीच्या यात्रेदरम्यान तलावातील दूषित पाणी पुरवठ्यामुळे सुमारे शंभरजणांना अतिसाराची लागण झाल्याची घटना घडली. ताप, जुलाब, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांवर मिरज तालुक्यातील खटाव, आरग, अथणी तालुक्यातील मदभावी, केंपवाड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. खटाव येथे तीन दिवसांपूर्वी यल्लम्मादेवीची यात्रा पार पडली. यात्रेसाठी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. यात्रेदरम्यान गावात लिंगनूर हद्दीत विहिरीतून नळपाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र यात्रेदरम्यान गावात आलेल्या जादा लोकांसाठी विहिरीशेजारी असलेल्या तलावातून पाणी विहिरीत सोडण्यात आले. तलावातील दूषित पाण्यावर शुध्दीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा करण्यात आल्याने गावातील शेकडोजणांना जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू झाला. डोकेदुखी, ताप, जुलाब, उलट्या या लक्षणांमुळे खटावसह आरग, मदभावी, केंपवाड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. गावातील सचिन जताण्णावर, शैलेश जताण्णावर, गणेश खटावकर, गोविंद चंदूरकर यांच्यासह अन्य रुग्णांवर उपचार करण्यात आले. अतिसाराच्या साथीमुळे तलावातील पाणीपुरवठा बंद करून पुन्हा विहिरीतून शुध्दीकरण करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तीन दिवस गावात सुरू असलेली अतिसाराची साथ नियंत्रणात आहे. मात्र पंचायत समिती आरोग्य विभागाचे अधिकारी खटावकडे फिरकले नसल्याचे सांगण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, या अतिसाराच्या साथीबाबत माहिती नसल्याचे सांगितले. आरग प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. धेंडे यांनी गावातील पाण्याचे नमुने तपासणी व रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे सांगितले. (वार्ताहर)दुष्काळामुळे पातळी कमी : विहिरीतून पुरवठाकर्नाटक सीमेवर असलेल्या खटाव गावाला लिंगनूर हद्दीतील विहिरीतून पाणीपुरवठा होतो. अवर्षणामुळे विहिरीशेजारी असलेल्या तलावातील पाणी पातळी कमी झाली आहे. पाण्याने तळ गाठला असल्याने शिल्लक असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा होती. खटावचे उपसरपंच रावसाहेब बेडगे यांनी मात्र गावात दूषित पाणीपुरवठा झाला नाही व आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात अतिसाराचे रुग्ण आढळले नसल्याचे सांगितले.