शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धुमश्चक्री

By admin | Updated: June 10, 2016 00:28 IST

दोघे जखमी : एकमेकांना पाठलाग करून चोपले; खुर्च्या, खिडक्यांची मोडतोड

सांगली : येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जेवण करण्यावरून कार्यकर्त्यांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. खुर्च्या, लाकडे हातात घेऊन एकमेकांना पाठलाग करून चोपण्यात आले. दहा मिनिटे सुरू असलेल्या या मारामारीत दोघे गंभीर जखमी झाले. गुरुवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली. कार्यकर्त्यांनी नाट्यगृहातील खिडक्यांच्या काचा, प्रवेशद्वारांसह खुर्च्यांची मोडतोड केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद नव्हती.माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सांगली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त स्नेहभोजनही आयोजित केले होते. दुपारी बारा वाजता मेळावा सुरू होणार होता, पण कार्यकर्ते सकाळी दहापासूनच मेळाव्यासाठी हजेरी लावत होते. जयंत पाटील दुपारी तीन वाजता कार्यक्रमस्थळी आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाट्यगृह तुडुंब भरले होते. नाट्यगृहाच्या आवारातही कार्यकर्ते थांबून होते. मेळाव्याच्या अंतिम टप्प्यात दुपारी चार वाजता जयंत पाटील यांचे भाषण सुरू होते. हे भाषण संपल्यानंतरच सर्वांनी स्नेहभोजन घ्यावे, अशी सूचना संयोजकांनी केली होती, पण कार्यकर्त्यांना धीर धरता आला नाही. पाटील यांचे भाषण सुरू असतानाच काही कार्यकर्ते बाहेर आले. त्यांनी आचाऱ्यास जेवण वाढण्याची विनंती केली, पण त्याने नकार दिला. काही कार्यकर्त्यांनी या आचाऱ्याला तेथून हटवून जेवणाच्या व्यवस्थेचा ताबा घेतला. जेवण (पान १० वर)एक बेशुद्ध : लाकडाने मारहाणमारामारीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील शुभम राजाराम गोसावी (वय १८, रा. अहिल्यानगर झोपडपट्टी, सांगली) हा उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता, पण पोलिसांत गुन्हा दाखल करायचा का नाही, असा प्रश्न वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला विचारल्यानंतर तो तेथून खासगी रुग्णालयात गेला. रुग्णालयातील दप्तरी, त्याला गणपती पेठ येथे दहा ते पंधराजणांनी मारहाण केली असल्याची नोंद आहे. याशिवाय आणखी एका कार्यकर्त्याला लाकडाने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली. त्याला उपचारासाठी कोठे दाखल केले, याची माहिती मिळू शकली नाही. या घटनेची रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांत नोंद नव्हती. जयंत पाटील यांचा काढता पायमेळावा अंतिम टप्प्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या दोन गटांत हाणामारी सुरू झाली, पण मेळावा संपवूनच जयंत पाटील बाहेर आले. नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असल्याने पाटील नाट्यगृहातून भारती विद्यापीठाकडे जाणाऱ्या बोळातील रस्त्याने बाहेर निघून गेले. त्यांची मोटार नाट्यगृहाच्या आवारात होती. पोलिस ठाण्याजवळ त्यांनी मोटार बोलावून घेऊन ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.