शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बुधगावमध्ये दोन गटांत धुमश्चक्री

By admin | Updated: December 11, 2014 23:41 IST

गटातील संघर्ष टोकाला : नंग्या तलवारी, रिव्हॉल्व्हरच्या माध्यमातून गावात दहशत

बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथे काल किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर आज दोन गट आमने-सामने आले. शिवप्रेमी व युवा स्वराज्य मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. दोन्ही गटांकडून काठ्या, लोखंडी गज, नंग्या तलवारी, रिव्हॉल्व्हरसह दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. आज एका दुकानावर झालेल्या दगडफेकीत सुमारे २००० रुपयांचे नुकसान झाले.काल गाडी घासून गेल्याच्या कारणावरून शिवप्रेमी आणि युवा स्वराज्य मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. याचे पर्यवसान मारहाणीत झाले. यानंतर दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते काठ्या, लोखंडी गज घेऊन आमने-सामने आले. गावातील काही मंडळींनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन्ही गटातील संघर्ष मिटला नाही, आज (गुरुवारी) रात्री आठच्या सुमारास गावात पोलीस येऊन गेल्यानंतर दोन्ही गट पुन्हा काठ्या, लोखंडी गज, नंग्या तलवारी, रिव्हॉल्व्हरसह आमने-सामने आले. हा प्रकार पाहून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार नवजीवन चौकात घडला. यावेळी येथील सुकुमार टिंगरे यांचे आदित्य डिस्ट्रिब्युटर्स अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स हे दुकान लोखंडी गजाने फोडण्यात आले. दुकानातील सुमारे दोन हजार रुपयांच्या काच साहित्याचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत हा धुमाकूळ सुरूच होता. सांगली ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुधगावमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर कडक कारवाईची जनतेतून मागणी होत आहे. (वार्ताहर)दोन दिवसापासून गावात तणावदोन दिवसांपासून गावातील नवजीवन चौक, वटसावित्री चौक याठिकाणी अंधार पडला की, हजारो युवक गोळा झालेले दिसतात. त्यामुळे गावाबरोबरच परिसरातही या घटनेचे पडसाद उमटत आहेत.बुधवारी झालेल्या मारामारीत शिवप्रेमी मंडळाच्या कार्यकर्त्याच्या एका दुचाकीचे नुकसान मोठ्याप्रमाणात केले आहे.दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून लोखंडी गज, नंग्या तलवारी, रिव्हॉल्व्हरसह गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे गावातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी दोन्ही गटावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.