शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आरक्षणाबाबत सरकारकडून राज्यात फसवणुकीचाच खेळ: धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:53 IST

कवठेमहांकाळ : मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात कितपत टिकेल, याबद्दल शंका आहे. धनगर समाजाला अद्याप आरक्षण दिले नाही. त्यामुळे ...

कवठेमहांकाळ : मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात कितपत टिकेल, याबद्दल शंका आहे. धनगर समाजाला अद्याप आरक्षण दिले नाही. त्यामुळे आरक्षणाच्या नावाखाली सरकार या समाजबांधवांना फसवित आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नागज येथे केली.नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आ. सुमनताई पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार प्रकाश शेंडगे उपस्थित होते.मुंडे म्हणाले, या सरकारने देशातील जनतेला ‘अच्छे दिन’ची खोटी स्वप्ने दाखवली. काळे धन देशात आणले नाही, की १५ लाख रुपये प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर जमा झाले नाहीत. त्यामुळे हेच का ‘अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत एसटीचे आरक्षण देतो असे सांगितले होते; पण अशा अनेक बैठका होऊनही आरक्षण का दिले नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे.ते म्हणाले, भाजप हा संघाच्या विचारावर चालणारा जातीवादी पक्ष आहे. त्यामुळे धनगर समाजाला हे सरकार आरक्षण देणार नाही. मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबद्दल शंका आहे. जर आरक्षण टिकले नाही, तर भाजप मराठा समाजाला फसवतोय, हे स्पष्ट होईल.आ. सुमनताई पाटील म्हणाल्या, दोन महिने झाले तरी प्रशासन टँकर देत नाही, तलाव भरून देत नाही. प्रशासन आमच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. याला भाजप सरकार जबाबदार आहे. आज आबा असते तर ही परिस्थिती आली असती का?प्रकाश शेंडगे म्हणाले, मराठा व ओबीसी यांच्यात भांडणे लावण्याचा भाजप सरकारचा डाव आहे.भ्रष्ट मंत्र्यांना क्लीन चिटराज्य सरकारमधील १६ मंत्र्यांनी घोटाळे केले आहेत, त्याचे पुरावेही मी दिले. परंतु त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्लीन चिट दिली. हे या सरकारचे महापाप आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.खासदारांना घरी बसवामुंडे म्हणाले, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आता आर. आर. आबा नसल्याने जनतेच्या स्वप्नांचा चुराडा झाला. आबांचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही सुमनताई पाटील यांना ताकद द्या. या जिल्ह्यात पाण्याचे राजकारण केले जातेय. येथील खासदार पाण्याचे राजकारण करीत आहेत, ही खेदाची बाब आहे. त्यांना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे.