शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

देवेंद्र फडणवीसांना राज्यात फिरून देणार नसल्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST

सांगली : देवेंद्र फडणवीस, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारस्थानांमुळेच मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. त्यामुळे फडणवीसांना ...

सांगली : देवेंद्र फडणवीस, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारस्थानांमुळेच मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. त्यामुळे फडणवीसांना राज्यात फिरून देणार नाही, असा इशारा मराठा स्वराज्य संघाने दिला आहे. मराठ्यांना आरक्षण ही जबाबदारी राज्याची नसून केंद्राची असल्याचा दावा संघाने केला.

अध्यक्ष महादेव साळुंखे, प्रवक्ते पंडितराव बोराडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत मराठा आरक्षणातील अडथळे विशद केले. ते म्हणाले, राज्यातील ९७ टक्के मराठा अत्यंत विपन्नावस्थेत दिवस कंठत आहे. त्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी भाजप, स्वयंसेवक संघ व फडणवीसांनी माणसे पेरली. मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे सर्व याचिकाकर्ते त्यांचेच हस्तक आहेत. त्यामुळे फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत, तो धुऊन काढण्याचे काम बहुजनांनी करायला हवे. आरक्षणाची प्रक्रिया सुरळीत सुरू असताना, त्यांनी गोंधळ निर्माण केला. त्यांचा खरा चेहरा समोर आणण्याचे काम आम्ही करणार आहोत.

ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाविरोधात फडणवीस सरकारने २०१७ मध्ये अध्यादेश काढला, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व राजकारणातून ओबीसी हद्दपार होण्याची वेळ आली आहे. त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजकारणापोटी संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान केले जात आहे, हे खपवून घेणार नाही. फडणवीस राज्यात कोठेही गेले, तरी त्यांच्या गाड्या अडवू. फिरून देणार नाही.

यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड, अविनाश शिंदे, मनपा क्षेत्र अध्यक्ष सुधीर चव्हाण, कवठेमहांकाळचे अमोल जाधव, शरद पवार, गोपाळ पाटील, सतीश पाटील, पंडित पाटील, शंकर शिंदे आदी उपस्थित होते.

चौकट

भाजपमधील मराठ्यांनी विचार करायला हवा

साळुंखे म्हणाले, भाजपमधील मराठा नेत्यांनी समाजाशी निष्ठा दाखवून दिली पाहिजे. भाजपमध्ये राहून आपल्याच समाजबांधवांच्या आरक्षणाला विरोध करणे त्यांना शोभणारे नाही. पक्षाची तळी उचलताना आपण समाजाचे नुकसान करत आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे.