शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विकासाभिमुख नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST

खानापूर मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करताना भाऊंनी लोककल्याणाचे व्रत हाती घेऊन विकासाचा डोंगर उभा केला. अभ्यासपूर्ण वक्तृत्व आणि सदैव ...

खानापूर मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करताना भाऊंनी लोककल्याणाचे व्रत हाती घेऊन विकासाचा डोंगर उभा केला. अभ्यासपूर्ण वक्तृत्व आणि सदैव मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारा नेता म्हणून भाऊंची महाराष्ट्राला ओळख आहे. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने अर्थात भाऊंनी विटा शहरास देशपातळीवर पोहोचवले. कामाचा व्यासंग व तळमळीने भाऊंनी विकासपर्व उभे केले.

स्वच्छ विटा शहराचा विकास ही भाऊंची तळमळ आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर स्वच्छतेच्या लोकचळवळीस सुरुवात झाली. सन २०१८ ते २०२० सलग तीन वर्षे विटा शहराने स्वच्छतेत नाथनगरीची पताका देशपातळीवर पोहोचली. यात दूरदृष्टी होती सदाभाऊंची...!

सन २०१८ ला विटा शहराने स्वच्छतेत देशात २५ वे स्थान मिळवले. भाऊंनी स्वच्छतेच्या या लोकचळवळीत नगर परिषदेस सतत प्रोत्साहन देत शहरात स्वच्छतेची चळवळ गतिमान केली. आदरणीय भाऊ व मा. नगराध्यक्ष तथा स्वच्छतेचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर ॲड. वैभवदादा पाटील यांनी अहोरात्र प्रयत्न केले. लोकांचा सहभाग वाढवला, विटा शहर कचरामुक्त शहर केले. लोकांच्या सवयीमध्ये बदल केला. लोकांनीही सक्रिय योगदान देत शहराच्या स्वच्छतेत भर घातली. भाऊंनी विटा शहराचा चेहरामोहरा बदलला आणि देशपातळीवर पश्चिम भारतात सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून प्रथम तर देशात चौथा क्रमांक विटा शहरास मिळाला. विटेकरांच्या साथीने व भाऊंच्या दूरदृष्टीने हा नावलौकिक मिळाला.

खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर असणारे, शेती, औद्योगिक, सहकार, शिक्षण, सांस्कृतिक, पर्यावरण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत भरीव योगदान असणारे व मतदारसंघाचा कायापालट करणारे धुरंधर नेतृत्व म्हणून भाऊंचा नावलौकिक सदैव आहे. कोरोनाच्या महामारीत लोकांना धीर देत सढळ हाताने मदतीचा ओघ दिला. मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवणारे भाऊ या मतदारसंघातील प्रत्येक माणसाच्या पाठीशी संकटकाळात ठाम उभे राहिले.

माजी आमदार भाऊ यांनी खानापूर मतदारसंघातील सोने-चांदी उद्योजकांना मोठा आधार दिला आहे. त्यांच्या व्यवसायाची ते सातत्याने विचारपूस करतात. तसेच स्थानिक प्रश्न सोडविण्यास भाऊ नेहमीच प्राधान्य देत आहेत.

विटा न्यायालयाची टोलेजंग इमारत निर्माण करून उपजिल्हा न्यायालयाला मंजुरी मिळवून घेतली आहे. त्यामुळे या उपजिल्हा न्यायालयात आता खानापूर, आटपाडी, कडेगाव व पलूस या चार तालुक्यांतील कामकाज चालणार असल्याने पक्षकारांना सांगली न्यायालयात जाण्याचा त्रास बंद झाला आहे. खानापूर मतदारसंघाचा विकास साधताना माजी आ. सदाभाऊंनी अत्यंत दूरदृष्टी ठेवून कामे केली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सदाभाऊ आपलेसे वाटत आहे.

सामान्य माणसाशी नाळ आणि स्वच्छ राजकारणाची प्रतिमा अशी अतूट ओळख असलेले खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. ॲड. सदाशिवराव (भाऊ) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

-अशोकराव मोरे, लेंगरे

उद्योजक, पुणे