शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
5
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
6
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
7
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
9
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
10
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
11
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
12
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
13
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
14
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
15
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
17
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
19
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
20
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!

विकासाभिमुख नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST

खानापूर मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करताना भाऊंनी लोककल्याणाचे व्रत हाती घेऊन विकासाचा डोंगर उभा केला. अभ्यासपूर्ण वक्तृत्व आणि सदैव ...

खानापूर मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करताना भाऊंनी लोककल्याणाचे व्रत हाती घेऊन विकासाचा डोंगर उभा केला. अभ्यासपूर्ण वक्तृत्व आणि सदैव मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारा नेता म्हणून भाऊंची महाराष्ट्राला ओळख आहे. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने अर्थात भाऊंनी विटा शहरास देशपातळीवर पोहोचवले. कामाचा व्यासंग व तळमळीने भाऊंनी विकासपर्व उभे केले.

स्वच्छ विटा शहराचा विकास ही भाऊंची तळमळ आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर स्वच्छतेच्या लोकचळवळीस सुरुवात झाली. सन २०१८ ते २०२० सलग तीन वर्षे विटा शहराने स्वच्छतेत नाथनगरीची पताका देशपातळीवर पोहोचली. यात दूरदृष्टी होती सदाभाऊंची...!

सन २०१८ ला विटा शहराने स्वच्छतेत देशात २५ वे स्थान मिळवले. भाऊंनी स्वच्छतेच्या या लोकचळवळीत नगर परिषदेस सतत प्रोत्साहन देत शहरात स्वच्छतेची चळवळ गतिमान केली. आदरणीय भाऊ व मा. नगराध्यक्ष तथा स्वच्छतेचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर ॲड. वैभवदादा पाटील यांनी अहोरात्र प्रयत्न केले. लोकांचा सहभाग वाढवला, विटा शहर कचरामुक्त शहर केले. लोकांच्या सवयीमध्ये बदल केला. लोकांनीही सक्रिय योगदान देत शहराच्या स्वच्छतेत भर घातली. भाऊंनी विटा शहराचा चेहरामोहरा बदलला आणि देशपातळीवर पश्चिम भारतात सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून प्रथम तर देशात चौथा क्रमांक विटा शहरास मिळाला. विटेकरांच्या साथीने व भाऊंच्या दूरदृष्टीने हा नावलौकिक मिळाला.

खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर असणारे, शेती, औद्योगिक, सहकार, शिक्षण, सांस्कृतिक, पर्यावरण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत भरीव योगदान असणारे व मतदारसंघाचा कायापालट करणारे धुरंधर नेतृत्व म्हणून भाऊंचा नावलौकिक सदैव आहे. कोरोनाच्या महामारीत लोकांना धीर देत सढळ हाताने मदतीचा ओघ दिला. मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवणारे भाऊ या मतदारसंघातील प्रत्येक माणसाच्या पाठीशी संकटकाळात ठाम उभे राहिले.

माजी आमदार भाऊ यांनी खानापूर मतदारसंघातील सोने-चांदी उद्योजकांना मोठा आधार दिला आहे. त्यांच्या व्यवसायाची ते सातत्याने विचारपूस करतात. तसेच स्थानिक प्रश्न सोडविण्यास भाऊ नेहमीच प्राधान्य देत आहेत.

विटा न्यायालयाची टोलेजंग इमारत निर्माण करून उपजिल्हा न्यायालयाला मंजुरी मिळवून घेतली आहे. त्यामुळे या उपजिल्हा न्यायालयात आता खानापूर, आटपाडी, कडेगाव व पलूस या चार तालुक्यांतील कामकाज चालणार असल्याने पक्षकारांना सांगली न्यायालयात जाण्याचा त्रास बंद झाला आहे. खानापूर मतदारसंघाचा विकास साधताना माजी आ. सदाभाऊंनी अत्यंत दूरदृष्टी ठेवून कामे केली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सदाभाऊ आपलेसे वाटत आहे.

सामान्य माणसाशी नाळ आणि स्वच्छ राजकारणाची प्रतिमा अशी अतूट ओळख असलेले खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. ॲड. सदाशिवराव (भाऊ) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

-अशोकराव मोरे, लेंगरे

उद्योजक, पुणे