शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळ शहराचा मेट्रोसिटीच्या धर्तीवर विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST

कवठेमहांकाळ : नवीन आलेल्या अधिकाऱ्यांनी कवठेमहांकाळ शहराचा विकास करण्याचा संकल्प केला आहे. शहरात आजवर स्वच्छ, सुंदर परिसर संकल्पना प्रत्यक्ष ...

कवठेमहांकाळ : नवीन आलेल्या अधिकाऱ्यांनी कवठेमहांकाळ शहराचा विकास करण्याचा संकल्प केला आहे. शहरात आजवर स्वच्छ, सुंदर परिसर संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून राबवली नाही. परंतु नगरपंचायतीमध्ये नुकतेच मुख्याधिकारी म्हणून डॉ. संतोष मोरे, शहर समन्वयक ऋतुजा गावडे हे अधिकारी दाखल झाले आहेत. या नवीन अधिकाऱ्यांनी शहराचा मेट्रो सिटीच्या धर्तीवर विकास करण्यास सुरुवात केली आहे.

‘स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावी राबवण्यात येत आहे. कवठेमहांकाळ शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘आय लव्ह यू’ पॉईंट व छोटेसे गार्डन शहरातील नागरिकांचे विरंगुळा ठिकाण ठरले आहे. या अभियानामुळे शहरात कमालीची स्वच्छता ठेवली जात आहे. नगरपंचायतीमधील सफाई कर्मचारी, सर्व अधिकारी यांनी मिळून शहरातील तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, इतर शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे पथनाट्य शहरात सादर करण्यात आले. शहरात आरोग्य मोहीम राबवून सार्वजनिक ठिकाणी असणारी शौचालये तपासण्यात आली. शाळा, महाविद्यालय या ठिकाणीही सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी केली. शहरात नागरिक, जनता या मोहिमेचे स्वागत करत आहे. एकूणच कवठेमहांकाळ शहर हे मेट्रो सिटीच्या धर्तीवर स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्याचा ध्यास मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे, शहर समन्वयक ऋतुजा गावडे, गोपीनाथ तरडे, पंकज घेवरे, जालिंदर माने यांनी घेतला आहे. यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी, लोकप्रतिनिधीही प्रयत्नशील आहेत.

चौकट

शहराचा चेहरा बदलणार : संतोष मोरे

शहरातील कुची कॉर्नर, जुने बसस्थानक या मुख्य चौकात आकर्षक प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. मेघराजा टेकडी ही शहरातील मिनी पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. कवठेमहांकाळ शहर हे स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत पूर्णपणे स्वच्छ, सुंदर करून जनतेचे आरोग्य कसे सुधारले जाईल, याकडे नगरपंचायत लक्ष देत आहे. शहराचा पूर्ण चेहरामोहरा बदलला जाईल, अशी प्रतिक्रिया नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यांनी दिली.

कोट

शहरातील जनतेने ‘स्वच्छ सर्वेक्षण’, ‘माझी वसुंधरा’ अभियानात सक्रिय व्हावे. हे अभियान यशस्वी करावे. राज्यात शहराची एक वेगळी ओळख निर्माण करावी.

-ऋतुजा गावडे, शहर समन्वयक, नगरपंचायत, कवठेमहांकाळ