शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
5
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
6
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
7
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
8
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
9
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
11
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
12
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
13
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
14
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
15
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
17
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
18
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
19
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
20
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

नव्या शेती व्यवस्थेसाठी धोरणात्मक लढाईचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST

इस्लामपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे देशभरात शेती प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा केवळ केंद्र सरकारने केलेले ...

इस्लामपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे देशभरात शेती प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा केवळ केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द व्हावेत, या मुद्याभाेवती फिरत आहे. या आंदोलनाने हे कायदे रद्द झाले तरी शेतकऱ्यांचे शोषण संपणार नाही. शेतकऱ्यांचे शोषण संपवायचे असेल तर नवे कृषी औद्योगिक धोरण अस्तित्वात आले पाहिजे, यासाठी संघर्ष करावा लागेल, असे आवाहन श्रमुदचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

कासेगाव (ता. वाळवा) येथील क्रांतिवीर बाबूजी पाटणकर, प्रबोधन संस्थेच्या सभागृहात श्रमिक मुक्ती दलाच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप झाला. दुसऱ्या दिवशी क्रांतिवीर बाबूजी पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या अधिवेशनात नव्या पर्यायी शेती व्यवस्थेसाठी फेब्रुवारी महिन्यापासून धोरणात्मक लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्त्री वारसदारांना मालमत्तेत समान वाटा देण्याचा कायदा पूर्वलक्षी पद्धतीने लागू करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला.

डॉ. पाटणकर म्हणाले, शेतकऱ्यांचे शोषण संपायचे असेल तर त्यांच्या शेतापर्यंत अर्थकारण यावे लागेल. अर्थकारणाची नाडी शेतकऱ्यांच्या हाती असली पाहिजे, यासाठी समन्यायी पाणी वाटपाचे धोरण सार्वत्रिक करावे लागेल. पाणी, जमीन, सूर्यप्रकाश, हवा, जंगल, समुद्र या आधारावर पर्यावरण संतुलित नवे उद्योग उभे करणारे कृषी औद्योगिक धोरण अस्तित्वात आले पाहिजे.

कार्याध्यक्ष संपत देसाई यांनी पहिल्या दिवसाच्या कामाकाजाचा आढावा घेतला. अधिवेशनात नव्या शेती व्यवस्थेबद्दल श्रमिक मुक्ती दलाची भूमिका काय असावी, याची मांडणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत अ‍ॅड. कृष्णा पाटील, मोहनराव यादव, चैतन्य दळवी, अ‍ॅड. शरद जांभळे, सुधीर नलवडे यांनी भाग घेतला. यावेळी जयंत निकम, आनंदराव पाटील, अंकुश शेडगे, दिलीप पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगुले, हरिश्चंद्र दळवी, संतोष गोटल उपस्थित होते.

फाेटाे : येणार आहे.