शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

नव्या शेती व्यवस्थेसाठी धोरणात्मक लढाईचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST

इस्लामपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे देशभरात शेती प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा केवळ केंद्र सरकारने केलेले ...

इस्लामपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे देशभरात शेती प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा केवळ केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द व्हावेत, या मुद्याभाेवती फिरत आहे. या आंदोलनाने हे कायदे रद्द झाले तरी शेतकऱ्यांचे शोषण संपणार नाही. शेतकऱ्यांचे शोषण संपवायचे असेल तर नवे कृषी औद्योगिक धोरण अस्तित्वात आले पाहिजे, यासाठी संघर्ष करावा लागेल, असे आवाहन श्रमुदचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

कासेगाव (ता. वाळवा) येथील क्रांतिवीर बाबूजी पाटणकर, प्रबोधन संस्थेच्या सभागृहात श्रमिक मुक्ती दलाच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप झाला. दुसऱ्या दिवशी क्रांतिवीर बाबूजी पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या अधिवेशनात नव्या पर्यायी शेती व्यवस्थेसाठी फेब्रुवारी महिन्यापासून धोरणात्मक लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्त्री वारसदारांना मालमत्तेत समान वाटा देण्याचा कायदा पूर्वलक्षी पद्धतीने लागू करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला.

डॉ. पाटणकर म्हणाले, शेतकऱ्यांचे शोषण संपायचे असेल तर त्यांच्या शेतापर्यंत अर्थकारण यावे लागेल. अर्थकारणाची नाडी शेतकऱ्यांच्या हाती असली पाहिजे, यासाठी समन्यायी पाणी वाटपाचे धोरण सार्वत्रिक करावे लागेल. पाणी, जमीन, सूर्यप्रकाश, हवा, जंगल, समुद्र या आधारावर पर्यावरण संतुलित नवे उद्योग उभे करणारे कृषी औद्योगिक धोरण अस्तित्वात आले पाहिजे.

कार्याध्यक्ष संपत देसाई यांनी पहिल्या दिवसाच्या कामाकाजाचा आढावा घेतला. अधिवेशनात नव्या शेती व्यवस्थेबद्दल श्रमिक मुक्ती दलाची भूमिका काय असावी, याची मांडणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत अ‍ॅड. कृष्णा पाटील, मोहनराव यादव, चैतन्य दळवी, अ‍ॅड. शरद जांभळे, सुधीर नलवडे यांनी भाग घेतला. यावेळी जयंत निकम, आनंदराव पाटील, अंकुश शेडगे, दिलीप पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगुले, हरिश्चंद्र दळवी, संतोष गोटल उपस्थित होते.

फाेटाे : येणार आहे.