शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

महावितरण कामगार संघटनांचा वीज बिल थकबाकीमुक्तीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST

सांगली : कोरोना महामारी व महापूर या काळात वाढलेल्या वीजबिल थकबाकीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. महावितरणचे ...

सांगली : कोरोना महामारी व महापूर या काळात वाढलेल्या वीजबिल थकबाकीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. महावितरणचे अस्तित्व टिकविण्यासाठी थकीत वीजबिल वसूल करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या अनुषंगाने महावितरणच्या वीज कामगार -अधिकारी संघटनांनी एक पाऊल पुढे टाकत जिल्ह्यातील वीजबिल थकबाकी शून्य करण्याचा निर्धार केला आहे.

सांगली जिल्ह्यात महावितरणची थकीत वीजबिल ४२४ कोटी झाली आहे. थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महावितरणचा कारभार करणे कठीण झाले आहे. महावितरणला दैनंदिन कारभार व वीज खरेदीकरिता नियमित अर्थपुरवठा होणे गरजेचे आहे. दरमहा वीजबिल वसुलीच्या महसुलावरच महावितरणची भिस्त अवलंबून असल्यामुळे या कठीणकाळात १०० टक्के वीजबिल वसुली होणे आवश्यक आहे. ग्राहकांना अखंडित, दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा देण्याची जबाबदारी महावितरणवर आहे. तेव्हा वीज ग्राहकांनाही आपली मासिक वीजदेयके नियमित भरणा करून महावितरणला ही जबाबदारी पेलण्यासाठी आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, वीज कामगार संघटनांच्या पुढाकारातून सांगली मंडळ कार्यालयात वीजबिल थकबाकी सद्य:स्थिती व वसुलीसाठीचे नियोजन चर्चा झाली. संघटना प्रतिनिधींनी जिल्ह्यात वीजबिल वसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करून महावितरण कंपनीचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार केला.