शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विध्वंस रोखायला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली सुरू असणारा पर्यावरणाचा विध्वंस रोखायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली सुरू असणारा पर्यावरणाचा विध्वंस रोखायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. येथील सत्यशोधक प्रबोधिनीतर्फे पर्यावरणदिनी आयोजित ‘डिजिटल सत्यशोधक संवाद’ या ऑनलाइन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

‘पर्यावरणपूरक विकास नीती’ या विषयावर त्यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, सत्ताधारी नैसर्गिक संसाधनांशी खेळ करत आहेत. निसर्गाचा रास सुरू आहे. याचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. विरोधात आवाज उठवणाऱ्या पर्यावरणवाद्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. विध्वंस रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर लढा उभारावा लागेल. पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा पर्याय पुढे आणावा लागेल. अन्यथा कोरोनासारख्या संकटांना सामोरे जावे लागेल.

त्या म्हणाल्या, प्रस्तावित कृषी कायद्यांमुळे शेतीचे बाजारीकरण होईल. रेशन व्यवस्था आणि अन्नसुरक्षा संपुष्टात येऊन सर्वसामान्यांना जगणे मुश्कील होईल. याचाही विचार करावा लागेल. प्रास्ताविकात महेश माने म्हणाले, पर्यावरण उद‌्ध्वस्त करणाऱ्या कुटनीतीमुळे नैसर्गिक आपत्ती येत आहेत. पर्यावरणाला वाचवले नाही तर माणसाला कोणीच वाचवणार नाही.

कार्यक्रमाला संपतराव पवार, डॉ. रवींद्र श्रावस्ती, ॲड. संदेश पवार, विकास मगदूम, दिगंबर माळी, स्वप्निल पाटील, वरद नागठाणे, रोहित माळी, नसीम गवंडी, सना पटेल, चैताली गुरव, सौरभ डांगे, अलंकार जाधव, सूरज बरगाले, प्रसाद माळी, असिम पठाण, वैभव आटुगडे, अभिषेक ढाले, अभिषेक जवंजाळ, कुणाल काळोखे आदी उपस्थित होते.