शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

देशातील लुटारूंचे राज्य उद्ध्वस्त करा: प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 23:52 IST

मिरज : राज्यात काही घराण्यात असलेली सत्ता सर्वसामान्यांपर्यंत नेणार असून, देशातील लुटारूंचे राज्य उचलून फेका, असे आवाहन भारिप बहुजन ...

मिरज : राज्यात काही घराण्यात असलेली सत्ता सर्वसामान्यांपर्यंत नेणार असून, देशातील लुटारूंचे राज्य उचलून फेका, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात केले. पश्चिम महाराष्टÑातील लोकसभेची एक जागा मुस्लिम समाजाला देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मिरजेतील क्रीडा संकुलाजवळील मैदानावर मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी जयसिंग शेडगे होते. यावेळी आंबेडकर म्हणाले, गेल्या निवडणुकीत भूलथापांमुळे काँग्रेस व राष्टÑवादी भुईसपाट होऊन प्रतिगामी सत्तेवर आले. धनगर समाजाच्या विरोधामुळे सत्ता गमावल्यानंतरही काँग्रेसला अजून समज आली नसून, बहुजन वंचित आघाडीला किरकोळ समजण्याची चूक करीत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत रोजगाराच्या आशेने तरूणांनी मोदींना निवडून दिले. मात्र निवडून आल्यानंतर मोदींनी भांडवलदारांना साथ दिली. नोटाबंदी करून कष्टकऱ्यांच्या श्रमाचा पैसा बुडविला. कॅशलेस व्यवस्थेचा आग्रह धरणाºया भाजपने परदेशी कंपन्यांना फायदा पोहोचविण्याचा करार केला आहे काय?चीनसारख्या शत्रुदेशाच्या कंपन्यांचा फायदा करून; आ बैल मुझे मार असे सरकारचे धोरण असताना हिंदुत्ववाद्यांचे देशावरील प्रेम कोठे गेले? राज्यात १६९ कुटुंबात आमदार, खासदार यांसह अनेक पदे असून सामान्य मराठ्यांना त्यात स्थान नाही. यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांच्याशिवाय अन्य कोणीही सामान्य कुटुंबातील मुख्यमंत्री झाला नाही. पश्चिम महाराष्टÑातील सहकार चळवळीत खाबुगिरीच अधिक आहे. बाजार समित्या लुटारूंचा अड्डा बनल्या आहेत. कुटुंबशाहीमुळे लुटारूंचे फावले आहे. प्रतिगामी, सौदेबाज, नफेखोर, लुटारूंचे राज्य असेपर्यंत सामान्यांना न्याय मिळणार नाही. चोर व लुटारूंच्या टोळीला पुन्हा सत्तेपासून रोखण्यासाठी पश्चिम महाराष्टÑात सुरू असलेली वतनदारी, जहागीरदारी, इनामदारी झुगारून द्या, असे आवाहन त्यांनी केले.काँग्रेस, राष्टÑवादीकडून बहुजन वंचित आघाडीसोबत समझोत्याच्या वल्गना सुरू आहेत. मात्र त्यांच्यासोबत जाणार नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. भाजपएवढेच काँग्रेसवालेही चोर असून राफेलवरून दोघांचे दलालीचे भांडण सुरू आहे. विमान खरेदीतील गैरव्यवहार उघडकीस आणायचा असेल, तर कॅगऐवजी लोकसभेची मुदत संपण्यास ९० दिवस असताना जीपीसीची मागणी कशासाठी? असा सवाल आंबेडकर यांनी केला.यावेळी अशोक बन्नेनवार, विनायक मासाळ, नानासाहेब वाघमारे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी, माजी आमदार हरिभाऊ भदे, बी. बी. घाडगे, इंद्रजित तांबे, गणेश मेढे, अमोल पांढरे, विक्रम कांबळे यांची भाषणे झाली.ओवेसींची गैरहजेरी, समर्थक नाराजएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी या मेळाव्यासाठी येणार असल्याचे सांगत वातावरणनिर्मिती करण्यात आली होती, पण ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाल्याने ओवेसी समर्थकांत नाराजी दिसत होती.आघाडीसाठी अजूनही तयार, पण...यावेळी माध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, काँग्रेसबरोबर आम्ही आघाडी करण्यास तयार होतो, मात्र समाझोता करण्याचे काँग्रेसचे धोरण नाही. आम्ही १२ लोकसभा मतदारसंघ मागितले, मात्र काँग्रेस नेते आमच्याशी चर्चा करण्याऐवजी माध्यमातून बोलत आहेत. सोबत एमआयएम नको आणि एक किंवा दोन जागा देतो, असा त्यांचा पावित्रा आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे स्वत:ला पंतप्रधानांपेक्षा मोठे समजतात. संघ व भाजपपासून देश वाचविण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यास अजूनही तयार आहोत. मात्र काँग्रेस अनुकूल नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. राफेलवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेली टीका-टिपणी म्हणजे दोन्ही पक्षांतील दलालांची नावे बाहेर येऊ नयेत, यासाठी सुरू असलेला प्रयत्न आहे. वायुसेनेसाठी राफेल विमाने सक्षम आहेत का? याबाबतही शंका आहे, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले....तर मोदींवर खटला!आंबेडकर म्हणाले, मुस्लिमांशिवाय सत्ता मिळविण्याचे भाजपचे धोरण काँग्रेसनेही सुरू केल्याने, ते ओवेसींना झिडकारत आहेत. मात्र आमची आघाडी लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्टÑात एक मुस्लिम उमेदवार देणार आहे. ट्रीपल तलाक कायदा काहीजणांना चांगला वाटतो. सर्व हिंदूंनाही हा कायदा लागू केल्यास सर्वप्रथम पंतप्रधान मोंदीवर खटला होईल, असेही त्यांनी सांगितले. भाजप सरकार देशातील एक-एक संस्था मोडत असून, आता विवाह संस्थाही मोडण्यास निघाले आहे, असा आरोपही त्यांनी केला.