शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

माझे काय चुकले हे देशमुखांनीच सांगावे!

By admin | Updated: July 25, 2014 23:33 IST

अनिल बाबर : उमेदवारीला राजेंद्रअण्णांचाच नकार

विटा : खानापूर विधानसभेची उमेदवारी आटपाडीला देणार असाल तर माझी संमती असल्याचे मी पक्षश्रेष्ठींना यापूर्वीच सांगितले होते. त्यावेळी राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याशीही मी उमेदवारीबाबत चर्चा केली होती. चर्चेवेळी त्यांना खानापूर तालुका व विटा शहराशी सातत्याने जनसंपर्क ठेवावा लागेल, असे सुचविले होते. त्यासाठी मीसुध्दा वर्षभर प्रयत्नशील होतो. त्यावेळी राजेंद्रअण्णांनी स्वत:च उमेदवारीस स्पष्ट नकार दिला होता. मात्र, आता अमरसिंह देशमुख यांनी, आमचे काय चुकले आणि आम्ही अचानक कसे शत्रू झालो, असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. पक्षश्रेष्ठींसमोर झालेली चर्चा व आटपाडीकरांनी मला केलेली मदत लक्षात घेता, मीही त्यांना अन्य पदांवर संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता माझे काय चुकले, हे देशमुख यांनीच सांगावे, असा सवाल माजी आमदार अनिल बाबर यांनी आज (शुक्रवारी) गार्डी (ता. खानापूर) येथे पत्रकार परिषदेत केला.बाबर म्हणाले की, मी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आजअखेर पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत व्यक्तिगत नुकसान होणार असल्याची माहिती असूनही, पक्षादेश मानून मी आघाडी धर्माचे पालन केले. पक्षनेतृत्वाचा आदेश शिरोधार्ह मानून पक्षशिस्त पाळली. येणारी विधानसभा निवडणूक व राहिलेल्या कालावधीचा विचार करून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील व जयंत पाटील यांच्याशी मी उमेदवारीबद्दल चर्चा केली होती. त्या चर्चेत आटपाडीला आपण उमेदवारी देणार असाल तर माझी संमती असल्याचे मी सांगितले होते. मात्र, ज्यांना उमेदवारी मिळेल, त्यांनी खानापूर तालुका व विटा शहराशी सातत्याने संपर्क ठेवावा, अशी आग्रही मागणीही मी पक्षश्रेष्ठींकडे केली होती.आटपाडीतील नेतृत्वाने मला व पक्षाला केलेली मदत लक्षात घेऊन, आमदारकीपेक्षा ज्या पदाला महत्त्व आहे, त्या व अन्य पदांवर आटपाडीला संधी मिळावी यासाठी मी प्रयत्न केले आहेत. विधानसभा उमेदवारीसंदर्भात मी राजेंद्र्रअण्णांशी चर्चा केली होती. त्यावेळी देशमुख यांनी विधानसभेची उमेदवारी करण्यास स्पष्ट नकार दिला होता. उमेदवारीबाबत मुंबई येथे पक्षश्रेष्ठींसमोर झालेल्या बैठकीत सर्व चर्चा स्पष्टपणाने झाल्या आहेत. याचा तपशीलही मी देण्यास तयार आहे. मात्र, असे असताना अमरसिंह देशमुख यांनी, आमचे काय चुकले, आम्ही अचानक शत्रू कसे झालो, असे म्हणणे चुकीचे आहे, असेही बाबर यावेळी म्हणाले. मी कुणाचाही शत्रू नाही, कुणालाही शत्रू मानत नाही व भविष्यातही मानणार नाही, पण देशमुख यांचे वक्तव्य जनतेत गैरसमज पसरविणारे आहे. सर्व चर्चा झाली असतानाही व उमेदवारीला राजेंद्रअण्णांनी स्पष्ट नकार दिला असतानाही त्यांनी असे वक्तव्य केल्याने, माझे काय चुकले हे देशमुखांनीच सांगावे, असा प्रतिसवाल बाबर यांनी केला. (वार्ताहर)विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला रामराम ठोकून बाबर शिवसेनेचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा खानापूर मतदारसंघात सुरू आहे. त्याबाबत बाबर यांना विचारले असता त्यांनी, थांबा व पहा, एवढेच सांगून या प्रश्नाला बगल दिली.