शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

जिल्हा बॅँकेतील विजयाने देशमुख गट रिचार्ज

By admin | Updated: May 12, 2015 23:43 IST

आटपाडीत समर्थकांचा जल्लोष : देशमुखवाडा गुलालात न्हाला, कार्यकर्त्यांत उत्साह

अविनाश बाड-आटपाडी -विधानसभा निवडणुकीनंतर सुना-सुना दिसणारा आटपाडीतील देशमुखांचा वाडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीत उदयसिंह ऊर्फ संजूकाका देशमुख यांच्या विजयामुळे गुलालाने न्हाऊन निघाला संजूकाकांच्या निवडीमुळे देशमुख गटाचे कार्यकर्ते रिचार्ज झाले  आहेत. आतापर्यत अनेक निवडणुकांमध्ये माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी उमेदवारी केली आहे. पण त्यांच्या निवडणुकीची सारी सूत्रे पडद्यामागून उदयसिंह ऊर्फ संजूकाका हाताळत होते.राजेंद्रअण्णांनी लढविलेली विधानसभेची निवडणूक असो अथवा अमरसिंह देशमुख यांनी तालुक्याला प्रथमच मिळवून दिलेल्या जिल्हा परिषदेच्या लाल दिव्याची गाडी असो या सर्व निवडणुका ज्यांनी पडद्याच्या पाठीमागून हाताळल्या, त्या संजूकाकांना जिल्हा बॅँकेच्या निमित्ताने प्रथमच थेट संधी मिळाली.विशेष म्हणजे आटपाडी तालुक्यात एकूण ६८ विकास सोसायट्या आहेत. त्यापैकी ४५ संस्था देशमुख गटाच्या ताब्यात आहेत. पण उदयसिंह देशमुख यांना ५१ मते मिळाली म्हणजेच देशमुख गटाच्या राजकीय विरोधकांचीही सहा मते मिळाली. तालुक्यात कॉँग्रेसचे उमेदवार वसंतराव गायकवाड यांनी फक्त १६ मते मिळाली. मग देशमुखांना मिळालेली मते भाजपची की शिवसेनेची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना अमरसिंह देशमुख यांच्या उमेदवारीने विरोध केल्याने शिवसेनेची मते एकाच शेतकरी सहकारी पॅनेलमध्ये असूनही मिळाली की नाही, याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत.दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत मिळविलेल्या या दमदार विजयामुळे देशमुख गटाच्या कार्यकर्त्यामध्ये आता उत्साह संचारल्याचे चित्र आहे. असे असले तरी आता माणगंगा सहकारी साखर कारखाना, बाबासाहेब देशमुख सूतगिरणी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपसह देशमुख गटाचे सगळे विरोेधक या निवडणुकांमध्ये वेगळी भूमिका घेणार असून, त्याला देशमुख गटाचे हे ‘त्रिदेव’ कशी टक्कर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.देशमुखांचा ‘कार्यक्रम’ कधी थांबणार ?वारा ज्या दिशेने वाहतो, त्या दिशेने वाहत जाणे सुकर असते, पण देशमुख गटाला हे आजपर्यंत जमलेले नाही. अनेक नेत्यांना, अनेक गटांना देशमुख गटाने अनेक निवडणुकीत मदत केली, पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या या गटाचा लाभ घेणाऱ्या सर्वांनीच अनेकवेळा ‘कार्यक्रम’ केला आहे. तालुक्यातील, मतदारसंघातील आणि अगदी जिल्ह्यातील नेत्यांनीही या गटाचा वारंवार कार्यक्रम केला आहे. मात्र देशमुख गटाने आतापर्यंत तरी आपली राजकीय चाल सोडलेली नाही. हे चांगले का वाईट, हे येणारा काळच ठरवेल.