शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

जिल्हा बॅँकेतील विजयाने देशमुख गट रिचार्ज

By admin | Updated: May 12, 2015 23:43 IST

आटपाडीत समर्थकांचा जल्लोष : देशमुखवाडा गुलालात न्हाला, कार्यकर्त्यांत उत्साह

अविनाश बाड-आटपाडी -विधानसभा निवडणुकीनंतर सुना-सुना दिसणारा आटपाडीतील देशमुखांचा वाडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीत उदयसिंह ऊर्फ संजूकाका देशमुख यांच्या विजयामुळे गुलालाने न्हाऊन निघाला संजूकाकांच्या निवडीमुळे देशमुख गटाचे कार्यकर्ते रिचार्ज झाले  आहेत. आतापर्यत अनेक निवडणुकांमध्ये माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी उमेदवारी केली आहे. पण त्यांच्या निवडणुकीची सारी सूत्रे पडद्यामागून उदयसिंह ऊर्फ संजूकाका हाताळत होते.राजेंद्रअण्णांनी लढविलेली विधानसभेची निवडणूक असो अथवा अमरसिंह देशमुख यांनी तालुक्याला प्रथमच मिळवून दिलेल्या जिल्हा परिषदेच्या लाल दिव्याची गाडी असो या सर्व निवडणुका ज्यांनी पडद्याच्या पाठीमागून हाताळल्या, त्या संजूकाकांना जिल्हा बॅँकेच्या निमित्ताने प्रथमच थेट संधी मिळाली.विशेष म्हणजे आटपाडी तालुक्यात एकूण ६८ विकास सोसायट्या आहेत. त्यापैकी ४५ संस्था देशमुख गटाच्या ताब्यात आहेत. पण उदयसिंह देशमुख यांना ५१ मते मिळाली म्हणजेच देशमुख गटाच्या राजकीय विरोधकांचीही सहा मते मिळाली. तालुक्यात कॉँग्रेसचे उमेदवार वसंतराव गायकवाड यांनी फक्त १६ मते मिळाली. मग देशमुखांना मिळालेली मते भाजपची की शिवसेनेची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना अमरसिंह देशमुख यांच्या उमेदवारीने विरोध केल्याने शिवसेनेची मते एकाच शेतकरी सहकारी पॅनेलमध्ये असूनही मिळाली की नाही, याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत.दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत मिळविलेल्या या दमदार विजयामुळे देशमुख गटाच्या कार्यकर्त्यामध्ये आता उत्साह संचारल्याचे चित्र आहे. असे असले तरी आता माणगंगा सहकारी साखर कारखाना, बाबासाहेब देशमुख सूतगिरणी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपसह देशमुख गटाचे सगळे विरोेधक या निवडणुकांमध्ये वेगळी भूमिका घेणार असून, त्याला देशमुख गटाचे हे ‘त्रिदेव’ कशी टक्कर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.देशमुखांचा ‘कार्यक्रम’ कधी थांबणार ?वारा ज्या दिशेने वाहतो, त्या दिशेने वाहत जाणे सुकर असते, पण देशमुख गटाला हे आजपर्यंत जमलेले नाही. अनेक नेत्यांना, अनेक गटांना देशमुख गटाने अनेक निवडणुकीत मदत केली, पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या या गटाचा लाभ घेणाऱ्या सर्वांनीच अनेकवेळा ‘कार्यक्रम’ केला आहे. तालुक्यातील, मतदारसंघातील आणि अगदी जिल्ह्यातील नेत्यांनीही या गटाचा वारंवार कार्यक्रम केला आहे. मात्र देशमुख गटाने आतापर्यंत तरी आपली राजकीय चाल सोडलेली नाही. हे चांगले का वाईट, हे येणारा काळच ठरवेल.