शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना झिडकारा : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:15 IST

सांगली : वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहे. हा त्यांचा अपमान असून, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांगलीत केले.महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ येथील गणपती मंदिरासमोर झाला. यावेळी आयोजित सभेत पालकमंत्री देशमुख बोलत ...

सांगली : वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहे. हा त्यांचा अपमान असून, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांगलीत केले.महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ येथील गणपती मंदिरासमोर झाला. यावेळी आयोजित सभेत पालकमंत्री देशमुख बोलत होते. खा. संजयकाका पाटील, खा. अमर साबळे, आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार उपस्थित होते.देशमुख म्हणाले की, सांगली जिल्ह्याला वसंतदादांचा वारसा आहे. दादांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या नावाच्या संस्था नेस्तनाबूत झाल्या. त्यांना किती वेदना झाल्या असतील. या संस्था बुडविणाºयांना सांगलीच्या जनतेने धडा शिकविण्याची वेळ आली आहे. ज्यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहे. सत्ता बळकाविण्यासाठी एकत्र आलेल्यांना जनता घरात बसविल्याशिवाय राहणार नाही.देश व राज्य जनतेने काँग्रेसमुक्त केले आहे. सांगली जिल्हा परिषदेतही सत्तापरिवर्तन केले. आता काँग्रेसची ही शेवटची सत्ता आहे. जनतेने महापालिकासुद्धा काँग्रेसमुक्त करावी, असे आवाहन करीत देशमुख म्हणाले की, देशात, राज्यात परिवर्तन झाल्यानंतर भाजपने जनतेच्या हितासाठी अनेक योजना हाती घेतल्या. मुद्रा योजना, मोफत गॅस कनेक्शन अशा योजनांतून जनतेपर्यंत सुविधा पोहोचविल्या. मराठा समजातील तरुणांना आरक्षणांतर्गत नोकरीचा मुद्दा न्यायालयात प्रभावीपणे मांडला जात आहे. या तरुणांना उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.सुरेश हळवणकर म्हणाले की, महापालिकेत काँग्रेसची २० वर्षे सत्ता आहे. पण नागरिकांना पाणी, रस्ते, गटारी आदी सुविधाही दिलेल्या नाहीत. दोन कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेरीनाल्याने कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. हा प्रश्नही सत्ताधाºयांना सोडविता आलेला नाही. भाजप सत्तेवर आल्यानंतर शेरीनाल्यासाठी १३ कोटींचा निधी आणून नदीचे प्रदूषण थांबविले जाईल. सांगलीचा विकास केवळ भाजपच करू शकतो. जनतेच्या कल्याणासाठी गणरायाच्या साक्षीने जो जाहीरनामा तयार होईल, त्याची अंमलबजावणी भाजप करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.खासदार संजयकाका म्हणाले, अनेक वर्षे भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेसच्या कारभाराने जनता त्रासली आहे. काँग्रेस कारभारामुळे या शहराचा विकास थांबला. मिरजेच्या पाणी योजनेचा समावेश अमृत योजनेत केला असतानाही न्यायालयात जाऊन याला खीळ घालण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप केला.भाजप नेत्यांकडून : जयंत पाटील टार्गेटभाजपच्या प्रचार प्रारंभावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, आ. सुरेश हळवणकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य केले. हळवणकर यांनी, वसंतदादांचे नाव नातू घेत नाही, मात्र जयंत पाटील यांनी या निवडणुकीत वसंतदादांचे नाव घ्यावे लागल्याचा टोला लगाविला. तर सुभाष देशमुख यांनी ‘खंजिर’चा विषय चर्चेत आणत भाजपच्या प्रचाराची दिशाच स्पष्ट केली.भर पावसात शपथभाजपने सर्व उमेदवार डोक्याला फेटा, खांद्यावर भाजपचा पट्टा अशा वेशभूषेत उभे होते. भर पावसात प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी सर्व उमेदवारांना पारदर्शी, गतिमान, विकासाभिमुख, भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ दिली.