शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना झिडकारा : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:15 IST

सांगली : वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहे. हा त्यांचा अपमान असून, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांगलीत केले.महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ येथील गणपती मंदिरासमोर झाला. यावेळी आयोजित सभेत पालकमंत्री देशमुख बोलत ...

सांगली : वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहे. हा त्यांचा अपमान असून, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांगलीत केले.महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ येथील गणपती मंदिरासमोर झाला. यावेळी आयोजित सभेत पालकमंत्री देशमुख बोलत होते. खा. संजयकाका पाटील, खा. अमर साबळे, आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार उपस्थित होते.देशमुख म्हणाले की, सांगली जिल्ह्याला वसंतदादांचा वारसा आहे. दादांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या नावाच्या संस्था नेस्तनाबूत झाल्या. त्यांना किती वेदना झाल्या असतील. या संस्था बुडविणाºयांना सांगलीच्या जनतेने धडा शिकविण्याची वेळ आली आहे. ज्यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहे. सत्ता बळकाविण्यासाठी एकत्र आलेल्यांना जनता घरात बसविल्याशिवाय राहणार नाही.देश व राज्य जनतेने काँग्रेसमुक्त केले आहे. सांगली जिल्हा परिषदेतही सत्तापरिवर्तन केले. आता काँग्रेसची ही शेवटची सत्ता आहे. जनतेने महापालिकासुद्धा काँग्रेसमुक्त करावी, असे आवाहन करीत देशमुख म्हणाले की, देशात, राज्यात परिवर्तन झाल्यानंतर भाजपने जनतेच्या हितासाठी अनेक योजना हाती घेतल्या. मुद्रा योजना, मोफत गॅस कनेक्शन अशा योजनांतून जनतेपर्यंत सुविधा पोहोचविल्या. मराठा समजातील तरुणांना आरक्षणांतर्गत नोकरीचा मुद्दा न्यायालयात प्रभावीपणे मांडला जात आहे. या तरुणांना उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.सुरेश हळवणकर म्हणाले की, महापालिकेत काँग्रेसची २० वर्षे सत्ता आहे. पण नागरिकांना पाणी, रस्ते, गटारी आदी सुविधाही दिलेल्या नाहीत. दोन कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेरीनाल्याने कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. हा प्रश्नही सत्ताधाºयांना सोडविता आलेला नाही. भाजप सत्तेवर आल्यानंतर शेरीनाल्यासाठी १३ कोटींचा निधी आणून नदीचे प्रदूषण थांबविले जाईल. सांगलीचा विकास केवळ भाजपच करू शकतो. जनतेच्या कल्याणासाठी गणरायाच्या साक्षीने जो जाहीरनामा तयार होईल, त्याची अंमलबजावणी भाजप करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.खासदार संजयकाका म्हणाले, अनेक वर्षे भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेसच्या कारभाराने जनता त्रासली आहे. काँग्रेस कारभारामुळे या शहराचा विकास थांबला. मिरजेच्या पाणी योजनेचा समावेश अमृत योजनेत केला असतानाही न्यायालयात जाऊन याला खीळ घालण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप केला.भाजप नेत्यांकडून : जयंत पाटील टार्गेटभाजपच्या प्रचार प्रारंभावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, आ. सुरेश हळवणकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य केले. हळवणकर यांनी, वसंतदादांचे नाव नातू घेत नाही, मात्र जयंत पाटील यांनी या निवडणुकीत वसंतदादांचे नाव घ्यावे लागल्याचा टोला लगाविला. तर सुभाष देशमुख यांनी ‘खंजिर’चा विषय चर्चेत आणत भाजपच्या प्रचाराची दिशाच स्पष्ट केली.भर पावसात शपथभाजपने सर्व उमेदवार डोक्याला फेटा, खांद्यावर भाजपचा पट्टा अशा वेशभूषेत उभे होते. भर पावसात प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी सर्व उमेदवारांना पारदर्शी, गतिमान, विकासाभिमुख, भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ दिली.