शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांगलीमध्ये रूजतेय त्वचादानाची चळवळ...; वर्षभरात चार बालकांना मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:23 IST

त्वचादानाबाबत गैरसमज --- मृत्यूपासून सहा तासांच्या आत त्वचा काढण्यात येते. त्वचा काढल्याने मृतदेह विद्रुप दिसतो असा एक गैरसमज नातेवाईकांमध्ये असतो, मात्र हे खरे नसून, केवळ मांडीवरील व पाठीवरीलच त्वचेचा पातळ पापुद्रा अत्याधुनिक मशिनरीव्दारे घेतला जातो. त्यामुळे मृतदेहाच्या पुढील विधीसाठी कोणतीही अडचण येत नाही.

ठळक मुद्दे रोटरी क्लबचा पुढाकार, शहरात स्कीन बॅँकेची स्थापना गेल्या वर्षभरात १० जणांनी त्वचादान केले आहे. तर चार रुग्णांवर त्वचा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. अविनाश पाटील आणि त्यांची टीम यासाठी कार्यरत आहे.

शरद जाधव ।सांगली : ‘मरावे परी कीर्ती रूपी उरावे’ अशी उक्ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी सध्या नेत्रदान, अवयवदानाची चळवळ मूळ धरत आहे. मृत्यूपश्चातही या नश्वर देहाचा उपयोग व्हावा, यासाठी सामाजिक संघटनांचा पुढाकार असतानाच आता त्वचादानाची चळवळही वाढत आहे. सांगलीत रोटरीच्या माध्यमातून सुरू झालेल्या स्कीन बॅँकेच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्वचेचे संकलन करून भाजलेल्या रुग्णांना जीवदान दिले जात आहे. वर्षभरात चार बालकांचे जीव यामुळे वाचले आहेत.

मानवी देहाचा मृत्यूनंतरही अनेकांना फायदा होत असतो. निर्धारित वेळेत अवयव प्रत्यारोपण केल्यास अनेकांना नवी दृष्टी, नवे आयुष्य मिळू शकते. याचधर्तीवर अवयवदानाची चळवळ वाढत आहे. मोठ्या शहरात ही चळवळ चांगलीच रूजली असली तरी सांगलीसारख्या ठिकाणी अद्यापही जनजागृती आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर त्वचादानाच्या चळवळीने सांगलीत मूळ धरले आहे.त्वचादानाचे महत्त्व लक्षात घेतले तर, देशात दरवर्षी ७० लाख व्यक्ती भाजतात. त्यापैकी दीड लाखजण उपचाराअभावी मरण पावतात. यात ८० टक्के प्रमाण स्त्रियांचे असते.

विविध कारणांमुळे भाजलेल्या रुग्णांचा विचार केला तर, २० ते ३० टक्के भाजलेल्या रुग्णांच्याही जीवावर बेतू शकते. यात सर्वात महत्त्वाचे जंतू संसर्गामुळे मृत्यूची शक्यता अधिक असते. त्यामुळे वेळीच त्वचेचे प्रत्यारोपण झाल्यास रुग्णाला नवीन आयुष्य मिळू शकते. हीच गरज ओळखून ‘रोटरी स्कीन बॅँक’स्थापण्यात आली आहे. जवळपास ६५ लाख रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. रोटरीने सामाजिक बांधिलकी जपत सुरू केलेल्या या अभियानास प्रतिसादही समाधानकारक मिळत आहे. गेल्या वर्षभरात १० जणांनी त्वचादान केले आहे. तर चार रुग्णांवर त्वचा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. अविनाश पाटील आणि त्यांची टीम यासाठी कार्यरत आहे.

त्वचादानाची पध्दतमृत्यूनंतर सहा तासांच्या आत हेल्पलाईनला फोन केल्यास त्वचा काढणारे तज्ज्ञ त्याठिकाणी पोहोचतात. साधारणपणे ४५ मिनिटात पाठ व मांडीवरील उपयुक्त त्वचा काढून घेण्यात येते. त्वचा काढलेल्या भागावर काळजीपूर्वक बॅँडेज करून मृतदेह परत दिला जातो. याच कालावधित नेत्रदानाचीही प्रक्रिया केली जाऊ शकते.

समाजात अद्यापही त्वचादानाबाबत गैरसमज आहेत. ते दूर होणे गरजेचे आहेत. त्वचेची प्रचंड प्रमाणात गरज असल्याने नातेवाईकांनीही त्वचादानासाठी पुढाकार घ्यावा व भाजलेल्या व्यक्तीस जीवनदान द्यावे.- डॉ. दिलीप पटवर्धन, अध्यक्ष,रोटरी त्वचापेढी समिती.