शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुलाचे ऊसबिल वडिलांच्या कर्जात जमा!

By admin | Updated: June 17, 2017 00:12 IST

मुलाचे ऊसबिल वडिलांच्या कर्जात जमा!

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर लाखो शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला; पण कर्जमाफी जाहीर होताच सोसायटी व बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैशाची कपात करीत कर्जाची रक्कम भरून घेण्यास सुरुवात केली आहे. यापेक्षाही एक अफलातून प्रकार कऱ्हाड तालुक्यातील नडशी गावात घडला असून, घाईगडबडीत कर्जाची रक्कम भरून घेताना सोसायटीने वडिलांचे कर्ज मुलाच्या ऊसबिलातून वर्ग करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी राज्यभर संपाचे हत्यार उपसल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ११ जून रोजी राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आजपासूनच कर्ज माफ झाल्याची घोषणा केली. तसेच या अल्पभूधारक शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज तातडीने देण्यात यावे, असेही जाहीर केले. मात्र, शासनाच्या या घोषणांकडे दुर्लक्ष करीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व नडशी विकास सेवा सोसायटीने आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. या कार्यक्षेत्रातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने ऊस बिलाचा दुसरा हप्ता काही दिवसापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. हे पैसे आता शेतकऱ्यांच्या हातात मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, नडशी येथील विकास सेवा सोसायटीने १२ जून रोजी अनेक शेतकऱ्यांच्या नावावर जमा झालेल्या ऊस बिलाच्या रकमेतून सोसायटीचे कर्ज परस्पर जमा करून त्यांना त्याच्या पावत्या दिल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. शासन एका बाजूला कर्जमाफीची घोषणा करीत असताना जिल्हा मध्यवर्ती बँक व सोसायटी अशाप्रकारे कर्ज भरून कशी घेऊ शकते, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. यापेक्षाही भयानक प्रकार म्हणजे नडशी येथील मारुती शामराव थोरात यांचे सोसायटीचे ८६ हजार रुपये कर्ज आहे. मात्र, त्यांचा मुलगा अमोल मारुती थोरात याच्या नावावर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे २० हजार ४९० हे ऊसबिल जमा झाले होते. ते ऊसबिल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतनगर शाखेमधून वडिलांच्या सोसायटी कर्ज खात्यात परस्पर जमा करण्यात आल्याचा धक्कादायक कारभार करण्यात आला असून, मारुती थोरात यांना विकास सोसायटीने याबाबतची पावती दिली आहे. मुलगा व वडील या दोघांचीही संमती नसताना अशाप्रकारे बँकेमधून हे पैसे सोसायटीच्या दुसऱ्याच कर्ज खात्यावर कसे वर्ग करण्यात आले, असा सवाल उपस्थित होत जात आहे.कर्जमाफी ?.. छे छे, उलट कर्ज वसुली !११ जून रोजी शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर १२ जून रोजी परस्पर ऊसबिलाची रक्कम सोसायटीच्या कर्ज खात्यावर जमा करून घेतल्याने या अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. बँक व सोसायटीच्या या कारभारामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.