शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

मुलाचे ऊसबिल वडिलांच्या कर्जात जमा!

By admin | Updated: June 17, 2017 00:12 IST

मुलाचे ऊसबिल वडिलांच्या कर्जात जमा!

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर लाखो शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला; पण कर्जमाफी जाहीर होताच सोसायटी व बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैशाची कपात करीत कर्जाची रक्कम भरून घेण्यास सुरुवात केली आहे. यापेक्षाही एक अफलातून प्रकार कऱ्हाड तालुक्यातील नडशी गावात घडला असून, घाईगडबडीत कर्जाची रक्कम भरून घेताना सोसायटीने वडिलांचे कर्ज मुलाच्या ऊसबिलातून वर्ग करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी राज्यभर संपाचे हत्यार उपसल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ११ जून रोजी राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आजपासूनच कर्ज माफ झाल्याची घोषणा केली. तसेच या अल्पभूधारक शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज तातडीने देण्यात यावे, असेही जाहीर केले. मात्र, शासनाच्या या घोषणांकडे दुर्लक्ष करीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व नडशी विकास सेवा सोसायटीने आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. या कार्यक्षेत्रातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने ऊस बिलाचा दुसरा हप्ता काही दिवसापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. हे पैसे आता शेतकऱ्यांच्या हातात मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, नडशी येथील विकास सेवा सोसायटीने १२ जून रोजी अनेक शेतकऱ्यांच्या नावावर जमा झालेल्या ऊस बिलाच्या रकमेतून सोसायटीचे कर्ज परस्पर जमा करून त्यांना त्याच्या पावत्या दिल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. शासन एका बाजूला कर्जमाफीची घोषणा करीत असताना जिल्हा मध्यवर्ती बँक व सोसायटी अशाप्रकारे कर्ज भरून कशी घेऊ शकते, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. यापेक्षाही भयानक प्रकार म्हणजे नडशी येथील मारुती शामराव थोरात यांचे सोसायटीचे ८६ हजार रुपये कर्ज आहे. मात्र, त्यांचा मुलगा अमोल मारुती थोरात याच्या नावावर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे २० हजार ४९० हे ऊसबिल जमा झाले होते. ते ऊसबिल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतनगर शाखेमधून वडिलांच्या सोसायटी कर्ज खात्यात परस्पर जमा करण्यात आल्याचा धक्कादायक कारभार करण्यात आला असून, मारुती थोरात यांना विकास सोसायटीने याबाबतची पावती दिली आहे. मुलगा व वडील या दोघांचीही संमती नसताना अशाप्रकारे बँकेमधून हे पैसे सोसायटीच्या दुसऱ्याच कर्ज खात्यावर कसे वर्ग करण्यात आले, असा सवाल उपस्थित होत जात आहे.कर्जमाफी ?.. छे छे, उलट कर्ज वसुली !११ जून रोजी शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर १२ जून रोजी परस्पर ऊसबिलाची रक्कम सोसायटीच्या कर्ज खात्यावर जमा करून घेतल्याने या अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. बँक व सोसायटीच्या या कारभारामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.