शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुलाचे ऊसबिल वडिलांच्या कर्जात जमा!

By admin | Updated: June 17, 2017 00:12 IST

मुलाचे ऊसबिल वडिलांच्या कर्जात जमा!

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर लाखो शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला; पण कर्जमाफी जाहीर होताच सोसायटी व बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैशाची कपात करीत कर्जाची रक्कम भरून घेण्यास सुरुवात केली आहे. यापेक्षाही एक अफलातून प्रकार कऱ्हाड तालुक्यातील नडशी गावात घडला असून, घाईगडबडीत कर्जाची रक्कम भरून घेताना सोसायटीने वडिलांचे कर्ज मुलाच्या ऊसबिलातून वर्ग करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी राज्यभर संपाचे हत्यार उपसल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ११ जून रोजी राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आजपासूनच कर्ज माफ झाल्याची घोषणा केली. तसेच या अल्पभूधारक शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज तातडीने देण्यात यावे, असेही जाहीर केले. मात्र, शासनाच्या या घोषणांकडे दुर्लक्ष करीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व नडशी विकास सेवा सोसायटीने आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. या कार्यक्षेत्रातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने ऊस बिलाचा दुसरा हप्ता काही दिवसापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. हे पैसे आता शेतकऱ्यांच्या हातात मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, नडशी येथील विकास सेवा सोसायटीने १२ जून रोजी अनेक शेतकऱ्यांच्या नावावर जमा झालेल्या ऊस बिलाच्या रकमेतून सोसायटीचे कर्ज परस्पर जमा करून त्यांना त्याच्या पावत्या दिल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. शासन एका बाजूला कर्जमाफीची घोषणा करीत असताना जिल्हा मध्यवर्ती बँक व सोसायटी अशाप्रकारे कर्ज भरून कशी घेऊ शकते, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. यापेक्षाही भयानक प्रकार म्हणजे नडशी येथील मारुती शामराव थोरात यांचे सोसायटीचे ८६ हजार रुपये कर्ज आहे. मात्र, त्यांचा मुलगा अमोल मारुती थोरात याच्या नावावर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे २० हजार ४९० हे ऊसबिल जमा झाले होते. ते ऊसबिल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतनगर शाखेमधून वडिलांच्या सोसायटी कर्ज खात्यात परस्पर जमा करण्यात आल्याचा धक्कादायक कारभार करण्यात आला असून, मारुती थोरात यांना विकास सोसायटीने याबाबतची पावती दिली आहे. मुलगा व वडील या दोघांचीही संमती नसताना अशाप्रकारे बँकेमधून हे पैसे सोसायटीच्या दुसऱ्याच कर्ज खात्यावर कसे वर्ग करण्यात आले, असा सवाल उपस्थित होत जात आहे.कर्जमाफी ?.. छे छे, उलट कर्ज वसुली !११ जून रोजी शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर १२ जून रोजी परस्पर ऊसबिलाची रक्कम सोसायटीच्या कर्ज खात्यावर जमा करून घेतल्याने या अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. बँक व सोसायटीच्या या कारभारामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.