शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

पहाटे दाट धुके, दुपारी कडक ऊन!

By admin | Updated: April 13, 2017 13:08 IST

धुक्याच्या दाट दुलईचा आल्हाददायक आनंद अनुभवला

आॅनलाईन लोकमतसांगली, दि. १३ : गेल्या काही दिवसांपासून ४० अंशापेक्षा जादा तापमानाचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना बुधवारी पहाटेच्या सुमारास धुक्याच्या दाट दुलईचा आल्हाददायक आनंद मिळाला. पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत शहर अक्षरश: धुक्यात गायब झाले होते. पहाटे जॉगिंग, वॉकिंगला बाहेर पडणाऱ्यांनी धुक्याचा हा सुखद धक्का अनुभवला. दुपारनंतर मात्र पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवला. दुपारी सांगलीचा पारा ४२ अंशापर्यंत गेला होता.गेल्या आठवड्याभरापासून सांगलीकर उन्हाच्या तडाख्याने होरपळून निघत आहेत. उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाहीलाही होत असताना बुधवारी पहाटेच्या सुमारास नागरिकांना गारव्याचा अनुभव आला. पहाटेच्या सुमारास शहरावर धुक्याची चादर पसरली होती. सकाळी आठपर्यंत हे धुके शहरावर कायम होते. या धुक्याच्या गारव्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना हिवाळ्यातील वातावरण अनुभवण्यास मिळाले. तसेच निसगार्चा हा चमत्कारही अनुभवता आला. पसरलेले धुके आणि थंडीमुळे शहरवासीयांना उकड्यातून काहीसा थंडावा मिळाला. पण वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे आरोग्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे.पहाटे लवकर सुरू होणाऱ्या चहा-नाष्ट्याच्या गाड्यांवर कामावर जाणाऱ्यांची, तसेच फिरायला जाणाऱ्यांची गर्दी झाली. हिमवर्षाव झाल्यानंतर किंवा तीव्र थंडीची लाट आल्यानंतर जशा तोंडातून गरम वाफा बाहेर पडतात, तसाच अनुभव बुधवारी सकाळी नागरिकांना आला. गावभाग, कृष्णा नदीकाठ परिसर, आमराई, वखारभाग, खणभाग, विश्रामबाग, कोल्हापूर रस्ता आदी भागातून आठ-साडेआठनंतरच नागरिकांची नित्यकामाची लगबग जाणवू लागली. धुक्याचे हे वातावरण टिपण्यासाठी अनेकांनी सेल्फी काढून घेतली. अनेकांनी सोशल मीडियावरून मित्रमंडळी, नातेवाईकांशी, हा धुक्याचा आनंद लुटण्यासाठी संपर्क साधला होता. सकाळच्या हुडहुडी भरविणाऱ्या या गारव्याचा आनंद काही तासच टिकला. दुपारनंतर पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला. दुपारच्या सुमारास तब्बल ४२ अंशावर पारा गेला होता.शिराळा पश्चिम भाग गारठलाशिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात पहाटेपासून सकाळी नऊपर्यंत दाट धुके पसरले होते. वाहनधारकांना वाहनांचे दिवे लावूनच वाहन चालवावे लागत होते. शिराळा तालुक्याचे पश्चिम भागातील कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पावलेवाडी खिंडीपासून चांदोलीपर्यंत मंगळवारी मध्यरात्रीपासून सकाळी नऊपर्यंत दाट धुके होते. हवेत थंडी होती, गारठा जाणवत होता. त्यामुळे शेतीची कामे करण्यात अडथळे निर्माण झाले होते. शाळकरी मुलांना परीक्षेसाठी धुक्यातून वाट काढतच जावे लागले.