शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

उमेदवारांच्या मानगुटीवर संशयाचे भूत कायम सांगली लोकसभा : संशयकल्लोळ, बंडखोरीचे ग्रहण ठरले डोकेदुखी, रहस्यावरील पडदा निकालादिवशी उठणार

By admin | Updated: May 14, 2014 00:12 IST

सांगली : बंडखोरांनी आणि पडद्यामागील छुप्या कुरघोड्यांनी सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना सर्वाधिक त्रास दिला. या गोष्टींचे लागलेले ग्रहण

 सांगली : बंडखोरांनी आणि पडद्यामागील छुप्या कुरघोड्यांनी सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना सर्वाधिक त्रास दिला. या गोष्टींचे लागलेले ग्रहण अजूनही कायम आहे. पडद्यामागील या घटनांचा प्रत्यक्ष मतांवर किती परिणाम झाला असेल, याचा अंदाज अजूनही उमेदवारांना आलेला नाही. निकालादिवशीच आता या रहस्यमयी घटनांवरील पडदा सरकणार असल्याने आगामी काळातील राजकीय समीकरणांवरही याचा परिणाम होईल. शर्यतीत आघाडीवर असलेल्या कॉँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना सुरुवातीपासून बंडखोरीच्या प्रकाराने छळले. याची सुरुवात भाजपमधून झाली. सांगलीचे आ. संभाजी पवार यांनी थेट अधिकृत उमेदवाराच्या चारित्र्यावरच बोट ठेवून पक्षीय नेत्यांची व उमेदवाराची गोची केली. राज्यातील सर्व दिग्गज नेत्यांनी त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला; मात्र कोणालाही यश आले नाही. त्याचवेळी कॉँग्रेसमध्ये विद्यमान आमदार हाफिज धत्तुरे यांनीही बंडाचा झेंडा फडकाविला. धत्तुरे यांच्या माध्यमातून मुस्लिम मतांची विभागणी होईल, या भीतीपोटी कॉँग्रेसच्या मंडळींनी धत्तुरेंच्या मनधरणीसाठी ताकद पणाला लावली. दोन्ही पक्षांना बंडखोरांनी एकाचवेळी आव्हान दिल्याने राजकीय वातावरण तापले होते. बंडखोरांमागे कोणती शक्ती आहे, याबद्दलही शंका उपस्थित झाल्या. अनेक नेत्यांची, पक्षांची नावे बंडखोरांच्या कृतीला जोडण्यात आली. कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या आघाडी धर्माचा गवगवा जिल्हाभर झाला. मोठ्या नेत्यांनी आपापसातील मतभेद विसरून प्रतीक पाटील यांच्या प्रचारासाठी प्रतिष्ठा पणाला लावली; मात्र स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात अजूनही नाराजी कायम होती. जतचे राष्टÑवादीचे नेते विलासराव जगताप यांनी आघाडी धर्माच्या क्षणिक नाटकाला ठामपणे विरोध केला. विधानसभा निवडणुकीवेळी कॉँग्रेसच्या नेतेमंडळींनी दिलेल्या जखमांमुळे जगतापांनी आघाडी धर्मापेक्षा मित्रधर्म श्रेष्ठ मानून भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. पक्षीय आदेश धुडकावला म्हणून जगतापांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. इतक्या मोठ्या घडामोडींमुळे सांगलीचे राजकीय वातावरण जसे तापले होते तसेच ते संशयानेही ग्रासलेही होते. कोणता नेता कोणाचा प्रचार करीत आहे, याविषयी शंका उपस्थित होऊ लागल्या. भर सभांमधून संशयकल्लोळ व्यक्त होऊ लागला. हाफिज धत्तुरे यांच्या बंडखोरीची तलवार मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर म्यान झाली. भाजपमधील संभाजी पवारांची बंडखोरी शेवटपर्यंत राहिली. भाजप, कॉँग्रेस उमेदवारांच्या मनी अनेकांबद्दलचे संशय कायम आहेत. संशय खरे ठरणार की खोटे, या प्रश्नाचे उत्तरही १६ मेरोजी मिळेल. (प्रतिनिधी)