शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

गणपतराव आबांच्या निधनाने चळवळीचा आधार हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आमदार गणपतराव (आबा) देशमुख यांच्यासाठी सांगोल्यानंतर सांगली जिल्ह्याचा दुष्काळी भाग हीच कर्मभूमी ठरली होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आमदार गणपतराव (आबा) देशमुख यांच्यासाठी सांगोल्यानंतर सांगली जिल्ह्याचा दुष्काळी भाग हीच कर्मभूमी ठरली होती. जिल्ह्याच्या दुष्काळी पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांचा लढा सदैव स्मरणात राहणारा आहे. त्यांच्या निधनाने सांगलीतील चळवळीचा आधार हरपला, अशी भावना व्यक्त होत आहे.

नागनाथअण्णा नायकवडी यांनी १९९३मध्ये आटपाडीत पहिली पाणी परिषद घेतली, तेव्हापासून प्रत्येक परिषदेत गणपतराव देशमुख यांचा सक्रिय सहभाग राहिला. परिषदेचे निमंत्रकपद शेवटपर्यंत त्यांच्याकडेच राहिले. दोन महिन्यांपूर्वी लॉकडाऊनमुळे ऑनलाइन परिषद झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे देशमुख सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीतील कदाचित ही एकमेव परिषद असावी.

दुष्काळी भागासाठी सिंचन योजना त्यांच्यासाठी नेहमीच जिव्हाळ्याचा विषय होता. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक सिंचन योजनेचा लाभ सांगोला, मंगळवेढ्याला कसा होईल याकडे त्यांचे लक्ष असायचे. म्हैसाळ योजनेचे पाणी जतमध्ये पोहोचले, त्याचवेळी देशमुख यांच्यापर्यंत पाण्याचा सुगंध पोहोचला होता. कृष्णेचे पाणी आता सांगोला, मंगळवेढ्यासाठी दूर नाही हे लक्षात येताच त्यांनी तडक सांगली गाठली. वारणालीमध्ये कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. योजना मांडल्या. त्यांचे भगिरथ प्रयत्न यशस्वी झाले. सध्या म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोला आणि मंगळवेढ्यातील काही गावांच्या शिवारात फिरत आहे. आबांची ही धावपळ कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांसाठीही चकित करणारी ठरली होती.

कृष्णा खोरे महामंडळाची पहिली मागणीदेखील त्यांनीच नागजला पाणी परिषद घेऊन केली होती. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबत पाण्यासाठी दीर्घकाळ चळवळी केल्या. नागनाथअण्णा, निळू फुले, विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह अनेक पाणी परिषदा भरविल्या. त्यामुळेच टेंभू योजना खळाळली. आटपाडी परिसरात कवी नारायण सुमंत, साहित्यिक प्राचार्य सयाजीराव मोकाशी, कवी जयंत जाधव यांच्यासोबत ‘आम्ही शेतकरी साहित्य इर्जिक परिषदे’चे कार्यक्रमही त्यांच्या प्रेरणेने झाले.

कवठेएकंदच्या क्रांतीसिंह नाना पाटील वाचनालय व प्रबोधिनीने देशमुख यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले होते. विट्यात २००३ मध्ये दुष्काळी शेतकऱ्यांनी तहसीलदार कचेरीसमोर जनावरे बांधून आंदोलन सुरू केले, तेव्हा एन. डी. पाटील, गणपतराव देशमुखांनी लढ्याला बळ दिले होते, त्या जोरावर तब्बल १०१ दिवस आंदोलन चालले. क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाने त्यांना पुरस्काराने गौरविले होते. सांगली जिल्ह्यात डॉ. भारत पाटणकर, भगवानराव पाटील, भगवानराव सूर्यवंशी, वैभव नायकवडी, ॲड. सुभाष पाटील, धनाजी गुरव अशा अनेक सहकाऱ्यांच्या लढ्याला त्यांचे पाठबळ होते.

चौकट

विट्याशी वीण

सांगोला सूतगिरणीचे सूत विट्यातील यंत्रमागांसाठी यायचे. यानिमित्ताने येथील वीणकरांसोबत गणपतराव आबांची घट्ट वीण निर्माण झाली होती. खानापूर तालुक्यातील अनेक शेतकरी त्यांच्या सूतगिरणीचे सभासदही आहेत.