शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मागणी तेथे तातडीने चारा छावण्या देणार

By admin | Updated: May 5, 2016 00:26 IST

दिलीप कांबळे : तासगावात आढावा बैठक

तासगाव : तासगाव तालुक्यात मागणी होईल तिथे तातडीने चारा छावण्या सुरु करण्यात येतील, असे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवारी स्पष्ट केले. शेतकरी एकटा नाही, शासन तुमच्यासोबत आहे, हा मुख्यमंत्र्यांचा संदेश देण्यासाठी मी इथे आलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.कांबळे यांनी तालुक्यात गेल्या चार वर्षापासून टंचाईचा सामना करणाऱ्या धामणी, पाडळी आणि नरसेवाडी या गावांची पाहणी केली. या गावांतील परस्थिती जाणून घेतल्यानंतर तासगाव पंचायत समितीत आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, तहसीलदार सुधाकर भोसले, सभापती स्वाती लांडगे, उपसभापती अशोक घाईल, गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्यासह अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. तालुक्यातील टंचाईबाबत पदाधिकाऱ्यांच्या भावना मंत्री कांबळे यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर टंचाईबाबत सरकार संवेदनशील असून, तातडीने उपययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, १५ मे नंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे शक्य असेल तिथे सिंंचन योजना सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. चारा छावण्यांचा मागचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात मागणी केल्यानंतर तातडीने चारा छावणी सुरु करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तरीदेखील एखादी चांगली संस्था चारा छावणीसाठी पुढाकार घेत असेल तर, अशा संस्थेला छावणी सुरु करण्यास परवानगी दिली जाईल. मिरजेतून लातूरला पाणी देता, कर्नाटकला पाणी दिले जाते, मात्र पाणी योजना असूनदेखील पाच किलोमीटरवर असणाऱ्या धामणी, पाडळीसारख्या गावांना पाणी मिळत नाही, हे योग्य नाही. असे सांगून या गावांना दोन दिवसांत बुर्ली योजनेतून पाणी देण्याचे आदेश मंत्री कांबळे यांनी योवळी दिले. (वार्ताहर)...‘प्रादेशिक’ वीज बिल : निर्णय आठ दिवसांतप्रादेशिक पाणी योजनांना व्यावसायिक पध्दतीने वीज बिल आकारणी केली जाते. त्यामुळे योजनेचे १६ कोटींचे वीज बिल थकित आहे. हे वीज बिल शासनाने भरुन, यापुढे सिंंचन योजनांप्रमाणे कमी दराने वीज बिल आकारणी करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली होती. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ दिवसांत निर्णय घेऊन वीज बिल कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिलीप कांबळे यांनी दिले.