शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर तालुक्यात २८ गावांमध्ये चारा डेपोची मागणी

By admin | Updated: September 8, 2015 22:41 IST

दुष्काळाची दाहकता : चाऱ्याचा प्रश्न गंभीर, टॅँकरने पाणी पुरवठा, तलाव कोरडे

दिलीप मोहिते - विटा  खानापूर तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून, चारा टंचाई निर्माण झाल्याने पशुधन धोक्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर तालुक्यातील २८ गावांनी प्रशासनाकडे चारा छावण्यांऐवजी चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्यानंतर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ११ गावांत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, अजून दोन गावांची टॅँकरची मागणी प्रशासनाने प्रलंबित आहे. खानापूर तालुक्यात जून २०१५ पासून आजअखेर चार महिन्यांत केवळ ८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अल्प ओलीवर शेतकऱ्यांनी केलेली खरीप पेरणी पूर्णपणे वाया गेली आहे. खानापूर तालुक्यात ८ हजार ५६४ लहान व २७ हजार ६९८ मोठी अशी एकूण ३६ हजार २६२ जनावरांची संख्या आहे. या जनावरांना प्रतिदिन ४६२ टन चाऱ्याची आवश्यकता आहे. परंतु, तालुक्यात सध्या १ हजार १९४ टन चारा उपलब्ध आहे. हा उपलब्ध चारा अवघ्या दोन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे तालुक्यात चारा छावण्यांऐवजी चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी केली असून, तालुक्यातील २८ गावांनी याबाबतचे प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविले आहेत. खानापूर तालुक्यातील हिवरे, पळशी, बाणूरगड, घाडगेवाडी (कुर्ली), चिंचणी-मंगरूळ, वेजेगाव, घानवड, जोंधळखिंडी, भवरवाडी (भिकवडी बुद्रुक), बामणी व घोटी बुद्रुक या ११ गावातील १८ हजार लोकसंख्येला टॅँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. भिकवडी बुद्रुक व करंजे या गावांची पाणी टॅँकर सुरू करण्याची मागणी आली आहे. तालुक्यातील १४ गावातील कूपनलिका व विहिरी प्रशासनाकडून अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. या गावांनी केली चारा डेपोंची मागणी...खानापूर तालुक्यातील विटा, माहुली, नागेवाडी, पारे, बामणी, कार्वे, गार्डी, खानापूर, पोसेवाडी, ऐनवाडी, घोटी खुर्द, जाधववाडी, रेवणगाव, रेणावी, लेंगरे, वेजेगाव, भिकवडी बुद्रुक, साळशिंगे, मादळमुठी, भेंडवडे, करंजे, देविखिंडी, पळशी, धोंडेवाडी, बलवडी (खा.), बेणापूर, हिवरे व सांगोले या २८ गावांनी पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्यांऐवजी चारा डेपोची मागणी केली असून, त्याबाबतचे प्रस्ताव तहसीलदार अंजली मरोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत.खानापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. ज्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी होईल, त्या गावात तातडीने टॅँकर सुरू करण्यात येतील. - अंजली मरोड,तहसीलदार, विटा.