शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

खानापूर तालुक्यात २८ गावांमध्ये चारा डेपोची मागणी

By admin | Updated: September 8, 2015 22:41 IST

दुष्काळाची दाहकता : चाऱ्याचा प्रश्न गंभीर, टॅँकरने पाणी पुरवठा, तलाव कोरडे

दिलीप मोहिते - विटा  खानापूर तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून, चारा टंचाई निर्माण झाल्याने पशुधन धोक्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर तालुक्यातील २८ गावांनी प्रशासनाकडे चारा छावण्यांऐवजी चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्यानंतर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ११ गावांत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, अजून दोन गावांची टॅँकरची मागणी प्रशासनाने प्रलंबित आहे. खानापूर तालुक्यात जून २०१५ पासून आजअखेर चार महिन्यांत केवळ ८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अल्प ओलीवर शेतकऱ्यांनी केलेली खरीप पेरणी पूर्णपणे वाया गेली आहे. खानापूर तालुक्यात ८ हजार ५६४ लहान व २७ हजार ६९८ मोठी अशी एकूण ३६ हजार २६२ जनावरांची संख्या आहे. या जनावरांना प्रतिदिन ४६२ टन चाऱ्याची आवश्यकता आहे. परंतु, तालुक्यात सध्या १ हजार १९४ टन चारा उपलब्ध आहे. हा उपलब्ध चारा अवघ्या दोन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे तालुक्यात चारा छावण्यांऐवजी चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी केली असून, तालुक्यातील २८ गावांनी याबाबतचे प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविले आहेत. खानापूर तालुक्यातील हिवरे, पळशी, बाणूरगड, घाडगेवाडी (कुर्ली), चिंचणी-मंगरूळ, वेजेगाव, घानवड, जोंधळखिंडी, भवरवाडी (भिकवडी बुद्रुक), बामणी व घोटी बुद्रुक या ११ गावातील १८ हजार लोकसंख्येला टॅँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. भिकवडी बुद्रुक व करंजे या गावांची पाणी टॅँकर सुरू करण्याची मागणी आली आहे. तालुक्यातील १४ गावातील कूपनलिका व विहिरी प्रशासनाकडून अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. या गावांनी केली चारा डेपोंची मागणी...खानापूर तालुक्यातील विटा, माहुली, नागेवाडी, पारे, बामणी, कार्वे, गार्डी, खानापूर, पोसेवाडी, ऐनवाडी, घोटी खुर्द, जाधववाडी, रेवणगाव, रेणावी, लेंगरे, वेजेगाव, भिकवडी बुद्रुक, साळशिंगे, मादळमुठी, भेंडवडे, करंजे, देविखिंडी, पळशी, धोंडेवाडी, बलवडी (खा.), बेणापूर, हिवरे व सांगोले या २८ गावांनी पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्यांऐवजी चारा डेपोची मागणी केली असून, त्याबाबतचे प्रस्ताव तहसीलदार अंजली मरोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत.खानापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. ज्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी होईल, त्या गावात तातडीने टॅँकर सुरू करण्यात येतील. - अंजली मरोड,तहसीलदार, विटा.