शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

वीज कनेक्शन तोडणी बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:24 IST

करगणी : महावितरणने सक्तीने वीज बिल वसुली सुरू करून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा लावलेला सपाटा त्वरित बंद करावा, अन्यथा ...

करगणी : महावितरणने सक्तीने वीज बिल वसुली सुरू करून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा लावलेला सपाटा त्वरित बंद करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार सचिन मुळीक यांना रासपचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर, उमाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशभरात महागाई वाढत आहे. शेतीमालाचे पडलेले बाजारभाव आणि कोरोनामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आर्थिक पेचात सापडले आहेत. अनेक व्यवसाय, दुकानेही लॉकडाऊन काळात बंद होती. बारा बलुतेदार, अठरापगड जातींच्या व्यावसायिकांची दुकाने बंद असतानाही लॉकडाऊन काळातील वाढीव, भरमसाट दराने आलेली वीजबिले अन्यायकारक आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या रानात पिके आहेत. त्यांच्या विहिरीला पाणी आहे. मात्र महावितरणने वीज कनेक्शन बंद केल्याने त्यांनी काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे वीज बिल वसुली थांबवून ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडले आहे, ते पुन्हा जोडावे, अशी मागणी केली आहे.

यावेळी विशाल सरगर, कालिदास गाढवे, विकास वाक्षे, अजित कटरे, सुहास सरगर, सत्यजित गलांडे, विकास सरगर, अक्षय खोत, समाधान चौगुले, अरुण झंजे, शरद झंजे, समाधान घुटुकडे आदी उपस्थित होते.