शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

कोरोनामध्ये कडधान्य, फळे, पालभाज्यांना मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST

सांगली : कोरोनामध्ये आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला आहे. बेकरीतील तयार पदार्थाला प्राधान्य देणाऱ्या गृहिणी सध्या ...

सांगली : कोरोनामध्ये आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला आहे. बेकरीतील तयार पदार्थाला प्राधान्य देणाऱ्या गृहिणी सध्या मुलांना घरातच ते पदार्थ तयार करून देत आहेत. कडधान्य, फळे आणि पालभाज्या आहारात वाढविण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती झाली आहे. प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आहाराला बहुतांशी नागरिक प्राधान्य देताना दिसत आहेत.

आहाराबाबत प्रत्येक कुटुंब जागृत झाले आहे. ग्रामीण भागामध्ये जागृती नसली तरी शहरी भागामध्ये उत्तम आहाराला नागरिक प्राधान्य देताना दिसत आहेत. संतुलित आहाराचे सेवन करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे, असेही नागरिक सांगत आहेत. धान्य व तृणधान्य म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, मका, यासह डाळी यांचा आहारात समावेश असणे गरजेचे असल्याचे आहारतज्ज्ञांचे मत आहे. कोरोनाच्या साथीमुळे नागरिकांनी आपली जीवनशैलीच बदलली आहे. फास्ट फूडला प्राधान्य देणारेही नागरिक सध्या घरातील जेवण, फळे आणि कडधान्य खाण्याला प्राधान्य देत आहेत. बेकरीतील पदार्थ खरेदी करण्याकडे कुटुंबीयांनी बंद करून समोसे, केक, बटाटावड्यासह बहुतांशी पदार्थ नागरिक घरीच बनवत असल्याचे महिलांनी सांगितले.

चौकट

बेकरी पदार्थांना अघोषित सुटी

कोरोनाच्या संकटात आजारी पडू नये, यालाच सर्वच कुटुंबीय प्राधान्य देत आहेत. यामुळे शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या आहारातून बेकरी पदार्थांना काही दिवसासाठी तरी सुटी दिल्याचे नागरिकांनी सांगितले. बेकरीमधून आणावे लागणारे पदार्थ मुलांना घरीच बनविण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत, असेही काही महिलांनी सांगितले.

कोट

कोरोनामध्ये आम्ही शाकाहाराला प्राधान्य देत आहे. जेवढा लागेल तेवढाच स्वयंपाक केला जातो. नाश्त्यामध्ये तेलकट पदार्थ टाळत असून कुठलेही एक फळ आहारात असतेच. भिजवलेल्या कडधान्याचा वापरही वाढविला आहे.

-संगीता पाटील, गृहिणी.

कोट

आहारात तेलकट पदार्थ कमी केले आहेत. भरपूर फळे आणि भाजीपाल्यांचा वापर केला जातो. घरातील लहान मुलांसह आम्ही रोज तुळशीची पाने घालून चहा घेतो. मुलांना दूध देताना हळद घातली जाते. यामुळे मुलांचे आरोग्य उत्तम आहे.

-मनीषा जाधव, गृहिणी

कोट

कडधान्ये, पालेभाज्यांना आम्ही जास्त प्राधान्य देतो. गेल्या दीड वर्षापासून बेकरी पदार्थ पूर्णत: बंद केले आहेत. मुलांच्या आवडीचे पदार्थ आम्ही घरातच करून त्यांची गरज पूर्ण करतो.

अश्विनी जोशी, गृहिणी.

चौकट

आहारात आवळा, संत्री, सफरचंद हवेच

रोजच्या आहारात अनेक कुटुंबीय आवळा, आवळा कँडी, संत्री, मोसंबी आणि सफरचंदाला प्राधान्य देत आहेत. प्रत्येकाचा हलक्या नाश्त्याबरोबर फळे खाण्याकडेही मोठ्या प्रमाणात कल दिसत आहे. आहाराबाबत नागरिकांमध्ये जागृती झाल्याचे आहारतज्ज्ञांचे मत आहे.