शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

गोरक्षकांच्या बंदोबस्ताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 23:46 IST

सांगली : गोरक्षेच्या नावाखाली कथित गोरक्षकांकडून दलित, मुस्लिम समाजातील तरूणांवर जीवघेणे हल्ले केले जात आहेत.

ठळक मुद्दे: दलित, मुस्लिमांवर हल्ले करणाºयांचा निषेध विविध सामाजिक संघटनांकडून मानवी साखळी केलीजमाव जमवून झुंडशाही प्रवृत्तीने गोरक्षेच्या नावाखाली निष्पाप तरूणांना मारले जात आहे

सांगली : गोरक्षेच्या नावाखाली कथित गोरक्षकांकडून दलित, मुस्लिम समाजातील तरूणांवर जीवघेणे हल्ले केले जात आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आणि कथित गोरक्षकांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून सांगलीतील स्टेशन चौकात शुक्रवारी मानवी साखळी केली. तसेच दिवसभर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाºयांकडे मागण्यांचे निवेदन दिले.या आंदोलनात जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील, अ‍ॅड्. के. डी. शिंदे, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. नामदेवराव करगणे, सुधार समितीचे अ‍ॅड्. अमित शिंदे, भानुदास पाटील, भष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे विनोद मोरे, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रवीण कोकरे, माजी सैनिक संघटनेचे हिम्मतराव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव ओऊळकर, ज्योती अदाटे, सुनीता मदने, मुस्लिम आरक्षण समितीचे मुनीर मुल्ला, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जैलाब शेख, आम आदमी पार्टीचे साजिद मुजावर, कडेगाव नगरपंचायत समितीचे उपनगराध्यक्ष साजिद पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी आंदोलकांकडून सरकार आणि जातीयवादी शक्तीच्याविरोधात जोरात घोषणाबाजी केली जात होती. आंदोलकांनी जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये, जमाव जमवून झुंडशाही प्रवृत्तीने गोरक्षेच्या नावाखाली निष्पाप तरूणांना मारले जात आहे, त्यामुळे गोरक्षकांच्या बंदोबस्ताची मागणी आंदोलकांनी केली.लोकशाहीला लागलेला सामाजिक कलंकगोरक्षेच्या नावाखाली व्यापाºयांना गोरक्षक मारत आहेत. काही मुस्लिम, दलित तरूणांवर जीवघेणा हल्ला केला जात आहे. हा भारताच्या लोकशाहीला लागलेला सामाजिक कलंक असल्याची टीका प्रा. शरद पाटील यांनी केली. तसेच राज्य शासनाने सामाजिक एकता टिकण्यासाठी जातीच्या आधारावर होणारे हल्ले थांबविण्याची गरज आहे. अन्यथा सर्व सामाजिक संघटनांना संघटित करून तीव्र आंदोलनाचा लढा उभारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.गोरक्षकांकडून दलित, मुस्लिम समाजातील तरूणांवर जीवघेणे हल्ले केले जात आहेत. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून सांगलीतील स्टेशन चौकात शुक्रवारी मानवी साखळी केली. यामध्ये प्रा. डॉ. बाबूराव गुरव, माजी आ. प्रा. शरद पाटील, अ‍ॅड्. के. डी. शिंदे आदी सहभागी होते.