शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

अल्पवयीन चालकांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST

पाण्याची बचत करा सांगली : शहरातील काही भागामध्ये सार्वजनिक नळाला तोट्या लावल्या नसल्यामुळे पाणी वाया जात आहे. अनेक ठिकाणी ...

पाण्याची बचत करा

सांगली : शहरातील काही भागामध्ये सार्वजनिक नळाला तोट्या लावल्या नसल्यामुळे पाणी वाया जात आहे. अनेक ठिकाणी पाण्यास गळती असूनही त्याकडे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे लक्ष जात नाही. यामुळे पाणी वाया जात आहे, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करा

सांगली : शासनाने लाखो रुपये खर्च करून, येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधली आहेत. मात्र, शासकीय अधिकारी, कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने, देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत.

खुल्या जागेत कचऱ्याचे साम्राज्य

सांगली : महापालिका क्षेत्रात अनेक वाॅर्डांमध्ये खुले भूखंड आहेत. मात्र, काही मोजक्याच खुल्या भूखंडांना संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या भूखंडाला संरक्षण भिंत नाही, तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. प्रशासनाने शहरातील सर्वच खुले भूखंडांचा विकास करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

अनुदानात वाढ करण्याची मागणी

सांगली : निराधारांना शासनाकडून प्रतिमाह अत्यल्प अनुदान दिले जाते. हे अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.

रस्त्याच्या बाजूला वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करा

सांगली : शहरातील आंबेडकर रस्ता, स्टेशन चौक, शंभर फुटी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. या वाहनांवर कारवाई होत नसल्याने, वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.

गादी व्यावसायिक आले अडचणीत

सांगली : गेल्या दीड वर्षापासून लग्नसराई बंद पडली आहे. लॉजिंग, वसतिगृहही बंद आहे. त्यामुळे गाद्यांची मागणी कमालीची घटली असून, गादी व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या गादी व्यावसायिकांना कुटुंबाचा गाडा हाकलणे कठीण झाले असून, आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.

कर्ज वसुली थांबविण्याची मागणी

करगणी : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील महिला बचत गटांना बँकांनी दिलेली कर्ज वसुली काही काळ थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.