शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

अल्पवयीन चालकांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST

पाण्याची बचत करा सांगली : शहरातील काही भागामध्ये सार्वजनिक नळाला तोट्या लावल्या नसल्यामुळे पाणी वाया जात आहे. अनेक ठिकाणी ...

पाण्याची बचत करा

सांगली : शहरातील काही भागामध्ये सार्वजनिक नळाला तोट्या लावल्या नसल्यामुळे पाणी वाया जात आहे. अनेक ठिकाणी पाण्यास गळती असूनही त्याकडे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे लक्ष जात नाही. यामुळे पाणी वाया जात आहे, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करा

सांगली : शासनाने लाखो रुपये खर्च करून, येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधली आहेत. मात्र, शासकीय अधिकारी, कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने, देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत.

खुल्या जागेत कचऱ्याचे साम्राज्य

सांगली : महापालिका क्षेत्रात अनेक वाॅर्डांमध्ये खुले भूखंड आहेत. मात्र, काही मोजक्याच खुल्या भूखंडांना संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या भूखंडाला संरक्षण भिंत नाही, तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. प्रशासनाने शहरातील सर्वच खुले भूखंडांचा विकास करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

अनुदानात वाढ करण्याची मागणी

सांगली : निराधारांना शासनाकडून प्रतिमाह अत्यल्प अनुदान दिले जाते. हे अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.

रस्त्याच्या बाजूला वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करा

सांगली : शहरातील आंबेडकर रस्ता, स्टेशन चौक, शंभर फुटी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. या वाहनांवर कारवाई होत नसल्याने, वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.

गादी व्यावसायिक आले अडचणीत

सांगली : गेल्या दीड वर्षापासून लग्नसराई बंद पडली आहे. लॉजिंग, वसतिगृहही बंद आहे. त्यामुळे गाद्यांची मागणी कमालीची घटली असून, गादी व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या गादी व्यावसायिकांना कुटुंबाचा गाडा हाकलणे कठीण झाले असून, आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.

कर्ज वसुली थांबविण्याची मागणी

करगणी : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील महिला बचत गटांना बँकांनी दिलेली कर्ज वसुली काही काळ थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.