शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

रखडलेले दाखल्यांचे गतीने वितरण

By admin | Updated: April 8, 2017 00:00 IST

‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ : इस्लामपूरमध्ये नागरिकांतून समाधान

इस्लामपूर : येथील ‘महसूल विभागाच्या प्रशासकीय इमारतीमधील सेतू कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या महसूलच्या दाखल्यांना लिपिकाकडून ‘ब्रेक’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच गेल्या महिन्याभरापासून रखडलेले दाखले शुक्रवारी गतीने वितरित करण्यात आले. ‘लोकमत’च्या या वृत्ताने महसूल विभागात खळबळ उडाली होती.येथील सेतू कार्यालयातून उत्पन्न, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमीलेअर, जात, शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक अशा दाखल्यांसह अनेक प्रकारची प्रतिज्ञापत्रे नागरिकांना करुन दिली जातात. या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळत असल्याने, तालुक्यातील नागरिकांची या सेतू कार्यालयात मोठी गर्दी असते. दिवसभरात जवळपास १०० हून अधिक दाखल्यांची पूर्तता या कार्यालयातून केली जाते. हे दाखले तहसीलदारांच्या अधिकृत स्वाक्षरीसाठी पाठवले जातात. तेथे असणारे लिपिक सुनील साळुंखे हे दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी तपासून तहसीलदारांच्या डिजिटल स्वाक्षरीने दाखला निर्गत करीत असतात. मात्र गेल्या महिन्याभरापासून विविध प्रकारचे दाखले देण्याचे काम रखडले होते. जे नागरिक भेटण्यासाठी येतील, त्यांचेच दाखले साळुंखे यांच्याकडून दिले जातात, अशा तक्रारी वाढल्या होत्या. गुरुवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने या सर्व बाबींची प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन खातरजमा केल्यानंतर, जवळपास २०० हून अधिक दाखले देण्याचे काम प्रलंबित असल्याचे समजले. नागरिकांच्या सोयीसाठी असणारी ही व्यवस्था नागरिकांनाच नडवत असल्याने ‘लोकमत’ने त्यावर प्रकाशझोत टाकला. या वृत्तामुळे खडबडून जाग्या झालेल्या महसूल यंत्रणेने शुक्रवारी हे प्रलंबित दाखले सोडण्याचे काम केले. त्यानंतर सेतू कार्यालयातून या दाखल्यांच्या मूळ प्रती नागरिकांना वितरित करण्यात आल्या. ‘लोकमत’च्या या वृत्ताबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कृषी राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची विविध दाखल्यांसाठी परवड सुरु आहे. महसूल यंत्रणेच्या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची विविध दाखल्यांसाठी येथील तहसील कार्यालयात ससेहोलपट होत आहे.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सरकारात आहेत. त्यांच्या तालुक्यात सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची दाखल्यासाठी पिळवणूक सुरु आहे. जो नागरिक भेट घेईल त्यालाच दाखला मिळतो, अशी येथील तससील कार्यालयाची नवी व्यवस्था लिपिक सुनील साळुंखे याने निर्माण केली आहे. लाल दिव्याच्या गाडीतून शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून फिरणारे कषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. (वार्ताहर)