शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेले दाखल्यांचे गतीने वितरण

By admin | Updated: April 8, 2017 00:00 IST

‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ : इस्लामपूरमध्ये नागरिकांतून समाधान

इस्लामपूर : येथील ‘महसूल विभागाच्या प्रशासकीय इमारतीमधील सेतू कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या महसूलच्या दाखल्यांना लिपिकाकडून ‘ब्रेक’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच गेल्या महिन्याभरापासून रखडलेले दाखले शुक्रवारी गतीने वितरित करण्यात आले. ‘लोकमत’च्या या वृत्ताने महसूल विभागात खळबळ उडाली होती.येथील सेतू कार्यालयातून उत्पन्न, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमीलेअर, जात, शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक अशा दाखल्यांसह अनेक प्रकारची प्रतिज्ञापत्रे नागरिकांना करुन दिली जातात. या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळत असल्याने, तालुक्यातील नागरिकांची या सेतू कार्यालयात मोठी गर्दी असते. दिवसभरात जवळपास १०० हून अधिक दाखल्यांची पूर्तता या कार्यालयातून केली जाते. हे दाखले तहसीलदारांच्या अधिकृत स्वाक्षरीसाठी पाठवले जातात. तेथे असणारे लिपिक सुनील साळुंखे हे दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी तपासून तहसीलदारांच्या डिजिटल स्वाक्षरीने दाखला निर्गत करीत असतात. मात्र गेल्या महिन्याभरापासून विविध प्रकारचे दाखले देण्याचे काम रखडले होते. जे नागरिक भेटण्यासाठी येतील, त्यांचेच दाखले साळुंखे यांच्याकडून दिले जातात, अशा तक्रारी वाढल्या होत्या. गुरुवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने या सर्व बाबींची प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन खातरजमा केल्यानंतर, जवळपास २०० हून अधिक दाखले देण्याचे काम प्रलंबित असल्याचे समजले. नागरिकांच्या सोयीसाठी असणारी ही व्यवस्था नागरिकांनाच नडवत असल्याने ‘लोकमत’ने त्यावर प्रकाशझोत टाकला. या वृत्तामुळे खडबडून जाग्या झालेल्या महसूल यंत्रणेने शुक्रवारी हे प्रलंबित दाखले सोडण्याचे काम केले. त्यानंतर सेतू कार्यालयातून या दाखल्यांच्या मूळ प्रती नागरिकांना वितरित करण्यात आल्या. ‘लोकमत’च्या या वृत्ताबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कृषी राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची विविध दाखल्यांसाठी परवड सुरु आहे. महसूल यंत्रणेच्या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची विविध दाखल्यांसाठी येथील तहसील कार्यालयात ससेहोलपट होत आहे.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सरकारात आहेत. त्यांच्या तालुक्यात सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची दाखल्यासाठी पिळवणूक सुरु आहे. जो नागरिक भेट घेईल त्यालाच दाखला मिळतो, अशी येथील तससील कार्यालयाची नवी व्यवस्था लिपिक सुनील साळुंखे याने निर्माण केली आहे. लाल दिव्याच्या गाडीतून शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून फिरणारे कषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. (वार्ताहर)