शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेले दाखल्यांचे गतीने वितरण

By admin | Updated: April 8, 2017 00:00 IST

‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ : इस्लामपूरमध्ये नागरिकांतून समाधान

इस्लामपूर : येथील ‘महसूल विभागाच्या प्रशासकीय इमारतीमधील सेतू कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या महसूलच्या दाखल्यांना लिपिकाकडून ‘ब्रेक’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच गेल्या महिन्याभरापासून रखडलेले दाखले शुक्रवारी गतीने वितरित करण्यात आले. ‘लोकमत’च्या या वृत्ताने महसूल विभागात खळबळ उडाली होती.येथील सेतू कार्यालयातून उत्पन्न, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमीलेअर, जात, शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक अशा दाखल्यांसह अनेक प्रकारची प्रतिज्ञापत्रे नागरिकांना करुन दिली जातात. या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळत असल्याने, तालुक्यातील नागरिकांची या सेतू कार्यालयात मोठी गर्दी असते. दिवसभरात जवळपास १०० हून अधिक दाखल्यांची पूर्तता या कार्यालयातून केली जाते. हे दाखले तहसीलदारांच्या अधिकृत स्वाक्षरीसाठी पाठवले जातात. तेथे असणारे लिपिक सुनील साळुंखे हे दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी तपासून तहसीलदारांच्या डिजिटल स्वाक्षरीने दाखला निर्गत करीत असतात. मात्र गेल्या महिन्याभरापासून विविध प्रकारचे दाखले देण्याचे काम रखडले होते. जे नागरिक भेटण्यासाठी येतील, त्यांचेच दाखले साळुंखे यांच्याकडून दिले जातात, अशा तक्रारी वाढल्या होत्या. गुरुवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने या सर्व बाबींची प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन खातरजमा केल्यानंतर, जवळपास २०० हून अधिक दाखले देण्याचे काम प्रलंबित असल्याचे समजले. नागरिकांच्या सोयीसाठी असणारी ही व्यवस्था नागरिकांनाच नडवत असल्याने ‘लोकमत’ने त्यावर प्रकाशझोत टाकला. या वृत्तामुळे खडबडून जाग्या झालेल्या महसूल यंत्रणेने शुक्रवारी हे प्रलंबित दाखले सोडण्याचे काम केले. त्यानंतर सेतू कार्यालयातून या दाखल्यांच्या मूळ प्रती नागरिकांना वितरित करण्यात आल्या. ‘लोकमत’च्या या वृत्ताबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कृषी राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची विविध दाखल्यांसाठी परवड सुरु आहे. महसूल यंत्रणेच्या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची विविध दाखल्यांसाठी येथील तहसील कार्यालयात ससेहोलपट होत आहे.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सरकारात आहेत. त्यांच्या तालुक्यात सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची दाखल्यासाठी पिळवणूक सुरु आहे. जो नागरिक भेट घेईल त्यालाच दाखला मिळतो, अशी येथील तससील कार्यालयाची नवी व्यवस्था लिपिक सुनील साळुंखे याने निर्माण केली आहे. लाल दिव्याच्या गाडीतून शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून फिरणारे कषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. (वार्ताहर)