शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

टेंभू योजनेच्या आवर्तनास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST

टेंभू योजनेचे आवर्तन मागील महिन्यातच मिळणे गरजेचे होते. मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे आवर्तनास विलंब होत आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी ...

टेंभू योजनेचे आवर्तन मागील महिन्यातच मिळणे गरजेचे होते. मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे आवर्तनास विलंब होत आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात पाण्याची टंचाई भासली नव्हती. परंतु सध्या पाणी पातळी खालावल्याने शेतीच्या पाण्याची शेतकऱ्यांना मोठी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी होत आहे.

तालुक्यात सध्या पाण्याअभावी नदी, बंधारे, ओढे काेरडे पडू लागले आहेत. पाण्याअभावी ऊस, पिके वाळू लागली आहेत. डोळ्यासमोर पिके वाळत असल्याने शेतकरी हतबल बनला आहे. सध्या ऊस तोडणी सुरू असून पाण्याअभावी वजनात तूट येत आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ऊस, द्राक्षबागा, फळभाज्या आदी पिकांना पाण्याची गरज आहे. यावर्षी गहू, शाळू, तसेच हरभरा आदी रब्बी हंगामातील पेरणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याअभावी ही पिके कशी जगवायची, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कडेगाव तालुक्यातील येरळा, नांदणी नदीपात्र कोरडे ठणठणीत पडले आहे. पाण्याअभावी विहिरी, बंधारे, ओढे यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे टेंभू योजनेचे आवर्तन सुरू होणे गरजेचे आहे.

चौकट

ऊस बिलातून पाणीपट्टी कपात

कडेगाव तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यासाठी टेंभू योजनेकडून पुरेसे पाणी मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून टेंभू योजनेची पाणीपट्टी कपात करून घेतली जाते. त्यामुळे आवर्तनही विहित वेळेत मिळाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.