शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीसाठी तिसरी आघाडी निश्चित

By admin | Updated: July 13, 2015 00:33 IST

इच्छुकांच्या मॅरेथॉन मुलाखती : २२ जुलैपूर्वी सर्व पॅनेलची उमेदवार यादी जाहीर होणार

अंजर अथणीकर - सांगली  कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना यांची तिसरी आघाडी स्थापन करण्याचे निश्चित झाले झाले. शिवसेनेचे पृथ्वीराज पवार यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. या निवडणुकीत तब्बल ५०४ उमेदवार उभे असल्यामुळे नेत्यांनी त्यांच्या मुलाखतींना प्रारंभ झाला आहे. आणखी दोन दिवस या मुलाखती चालणार असून दोन्ही पॅनेलकडून २२ जुलैपूर्वीच पॅनेल घोषित करण्यात येणार आहेत. इच्छुकांची गर्दी वाढल्याने तडजोडीसाठी नेत्यांना कसरती कराव्या लागत आहेत. राष्ट्रवादी, भाजप व मदन पाटील यांची बाजार समितीसाठी आता युती झाली आहे. काँग्रेसनेही जनसुराज्य पक्षाबरोबर निवडणूक लढविण्याचे यापूर्वी जाहीर केले आहे. पक्षनिहाय संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र दोन्ही गटांतर्फे इच्छुकांच्या मुलाखती सुरु करण्यात आल्या आहेत. जनता दल, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीत उतरणार असून याला अंतिम स्वरूपही देण्यात आले आहे. माजी आ. शरद पाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय खा. राजू शेट्टी, माजी आ. संभाजी पवार, शरद पाटील हे घेणार आहेत. येत्या दोन दिवसात ही यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पृथ्वीराज पवार यांनी दिली. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पाच गटात होत असून, त्यानुसार सहकारी संस्था मतदार संघामध्ये २६६८, ग्रामपंचायत मतदार संघामधून २२८६ व हमाल, तोलाईदार मतदार संघातून १५८० मतदार आहेत. त्याचबरोबर व्यापारी मतदार संघामध्ये १३०६ व प्रक्रिया किंवा खरेदी- विक्री संघातून ३७५ मतदार आहेत. एकूण ८ हजार २२५ मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या सोसायट्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र बदलले आहे. यामुळे ज्या क्षेत्रात उमेदवारांचे प्राबल्य आहे, त्यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी, भाजपकडून सध्या मुलाखती सुरु आहेत. येत्या दोन दिवसात या मुलाखती पूर्ण होणार असून दोन्ही गटातर्फे २२ जुलैपूर्वी पॅनेल जाहीर करण्यात येणार आहे. बंडखोरीचा धोका असला तरी, दोन्ही गटाच्या नेत्यांनी बंडखोरी होणार नसल्याचा दावा केला आहे. गर्दीने पॅनेलला विलंबउमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे याला विलंब लागत आहे; मात्र आम्ही २२ जुलैपूर्वी पॅनेल जाहीर करू, अशी माहिती भाजपचे आ. विलासराव जगताप यांनी दिली. कोणत्या उमेदवाराची कोणत्या गटात ताकत आहे, याची सध्या पडताळणी सुरू आहे. त्यानुसार उमेदवारी दिली जाणार आहे. या निवडणुकीत बंडखोरी होणार नाही व आम्ही खपवूनही घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.बंडखोरीचा धोका!सर्वच पॅनेलना बंडखोरीची चिंता लागली आहे. बंडखोरांना शांत करणे तितके सोपे नसल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच पॅनेल जाहीर केले जाणार आहे. जिल्हा बँकेप्रमाणे अद्याप नेत्यांनी उमेदवारांकडून माघारीचे अर्ज भरून घेतले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी बंडखोरीची डोकेदुखी त्यांना सतावण्याची चिन्हे आहेत. एकमेकांच्या पॅनेलवर लक्षतीन पॅनेलची शक्यता सध्या दिसत असली तरी, या तिन्ही गटांनी एकमेकांच्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्या गटात कोणता उमेदवार दिल्यास त्याचे काय फायदे-तोटे होऊ शकतात, याचे गणितही मांडले जात आहे. त्यानुसारच व्यूहरचना केली जाणार आहे.