शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By admin | Updated: July 13, 2014 01:10 IST

अद्याप कोणासही अटक नाही.

जत : तालुक्यातील सालेकिरी येथील तीन शालेय विद्यार्थिनींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून श्री मारुती विंड पार्क डेव्हलपर्स या पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या सुनील सदाशिव चौधरी (रा. तेजलक्ष्मी बंगला, जत) यांच्याविरोधात मुचंडीचे मंडल अधिकारी अरुण एकनाथ कणसे यांनी आज (शनिवारी) जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.नऊ जुलैरोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान निकिता पाटील (वय १४), पूजा पाटील (११), ऐश्वर्या धोडमणी (८) या तीन अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींचा खड्ड्यातील पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला होता. हा खड्डा श्री मारुती विंड पार्क डेव्हलपर्स या कंपनीने मुरूम खोदण्यासाठी काढला होता. महसूल विभागाने त्यांना पाचशे ब्रास मुरूम खोदण्यासाठी जमिनीत तीन फूट खोलीपर्यंत परवाना दिला असताना त्यांनी १२ फूट खोदून दोन हजार ब्रास मुरूम नेला आहे. परवान्यापेक्षा जादा १० फूट खोल व एक हजार पाचशे ब्रास जादा मुरुमाची चोरी त्यांनी केली आहे. याची चौकशी स्वत: प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीलदार दीपक वजाळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन केली होती. मुरूम खोदून नेल्यानंतर या खड्ड्याचे सपाटीकरण त्यांनी करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून दोन सख्ख्या बहिणींसह तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार दीपक वजाळे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तालुक्यातील पवनऊर्जा निर्माण कंपनीचे व्यवस्थापक कर्मचारी, दलाल यांच्यात खळबळ माजली आहे. याची जत पोलिसात नोंद आहे. (वार्ताहर)