शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

संजीवनी योजनेस बदनामीचा कलंक

By admin | Updated: June 4, 2017 23:04 IST

संजीवनी योजनेस बदनामीचा कलंक

गजानन पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कसंख : जत तालुक्यातील रोजगार हमीच्या (मनरेगा) कामात तब्बल ४४ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. बोगस कामे, कामातील अनियमितता, शेतकऱ्यांची सहमती नसणे, परगावातील मजूर, यंत्राच्या साहाय्याने काम, बोगस मस्टर, मजुरीचे पैसे बँकेतून ठेकेदारांनी काढणे, कामाच्या जागेतील बदल, निकृष्ट कामे, कामांचे मोजमाप न करता एम.बी. तयार करणे, एकाच कामावर दोन लाभार्थ्यांना लाभ आदी त्रुटीवरून घोटाळा झाला आहे. तालुक्याला संजीवनी ठरू शकणाऱ्या रोजगार हमी योजनेला राजकीय लोकांनी, गावपुढाऱ्यांनी बदनामीचा कलंक लावलेला आहे. घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी ओमराज गहाणेवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.रोजगार हमी घोटाळाप्रकरणी गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, तीन ग्रामसेवक, कृषी अधिकारी, तांत्रिक अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, तालुक्यात झालेल्या १८४७ कामांची चौकशी करावी, जेणेकरून आणखी मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.अनेक गावांत रोजगार हमीचे ठेकेदार निर्माण झाले आहेत. त्यासाठी साखळीच तयार करण्यात आली आहे. ग्रामसेवक, ग्रामरोजगार, सेवक, तांत्रिक अधिकारी, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, तांत्रिक डाटा आॅपरेटर यांना हाताशी धरुन हा सर्व उद्योग सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची कामे झाली, पण या कामातच ग्रामरोजगार सेवकापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी सोयीनुसार डल्ला मारला आहे. गावोगावी असलेले ठेकेदार व फुकटचे पैसे पळविणाऱ्या लाभार्थींची चांदी झाली आहे.तालुक्यातील काशिलिंगवाडी, एकुंडी, बाज या गावांतील कामांची चौकशी झाली आहे. यामध्ये ३६ लाख ७४ हजार रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. तर सध्या माडग्याळ येथील कामांची चौकशी सुरू आहे. रोजगार हमीच्या कामाबाबत आसंगी (ता. जत), व्हसपेठ, गिरगाव, कोंतेवबोबलाद, टोणेवाडी, करेवाडी, सिंगनहळ्ळी, पांढरेवाडी, दरीबडची, येळवी, सनमडी, टोणेवाडी, कोसारी, मेंढीगिरी, देवनाळ, प्रतापूर या गावातील कामांबाबत तक्रारी आहेत. कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मनरेगाच्या कामात तालुक्यात तब्बल ४४ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. या सर्व कामांची इडीमार्फत किंवा त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी केली आहे.येळवी, टोणेवाडी, खैराव, कुणीकोणूर या भागात शेततलाव, विहिरीच्या कामात गोलमाल, तर प्रतापुरात पेव्हिंग ब्लॉकचे काम, रोपांची लागवड यात घोटाळा झाला आहे. कुणीकोणूरमधील रस्ता कामात व येळवीतील मरिआई मंदिराला सभामंडपाऐवजी व्यायाम शाळा म्हणून व चौकातील सभागृह चुकीच्या पध्दतीने बांधलेले आहे, असा आरोपही सावंत यांनी केला आहे.सध्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी पदभार घेतला आहे. तालुक्यातील मनरेगाच्या सर्व कामांची चौकशी केल्यास महाघोटाळा उघडकीस येईल. यात अनेक भ्रष्ट अधिकारी अडकतील. याची खातेनिहाय किंवा त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.