शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

संजीवनी योजनेस बदनामीचा कलंक

By admin | Updated: June 4, 2017 23:04 IST

संजीवनी योजनेस बदनामीचा कलंक

गजानन पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कसंख : जत तालुक्यातील रोजगार हमीच्या (मनरेगा) कामात तब्बल ४४ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. बोगस कामे, कामातील अनियमितता, शेतकऱ्यांची सहमती नसणे, परगावातील मजूर, यंत्राच्या साहाय्याने काम, बोगस मस्टर, मजुरीचे पैसे बँकेतून ठेकेदारांनी काढणे, कामाच्या जागेतील बदल, निकृष्ट कामे, कामांचे मोजमाप न करता एम.बी. तयार करणे, एकाच कामावर दोन लाभार्थ्यांना लाभ आदी त्रुटीवरून घोटाळा झाला आहे. तालुक्याला संजीवनी ठरू शकणाऱ्या रोजगार हमी योजनेला राजकीय लोकांनी, गावपुढाऱ्यांनी बदनामीचा कलंक लावलेला आहे. घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी ओमराज गहाणेवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.रोजगार हमी घोटाळाप्रकरणी गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, तीन ग्रामसेवक, कृषी अधिकारी, तांत्रिक अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, तालुक्यात झालेल्या १८४७ कामांची चौकशी करावी, जेणेकरून आणखी मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.अनेक गावांत रोजगार हमीचे ठेकेदार निर्माण झाले आहेत. त्यासाठी साखळीच तयार करण्यात आली आहे. ग्रामसेवक, ग्रामरोजगार, सेवक, तांत्रिक अधिकारी, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, तांत्रिक डाटा आॅपरेटर यांना हाताशी धरुन हा सर्व उद्योग सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची कामे झाली, पण या कामातच ग्रामरोजगार सेवकापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी सोयीनुसार डल्ला मारला आहे. गावोगावी असलेले ठेकेदार व फुकटचे पैसे पळविणाऱ्या लाभार्थींची चांदी झाली आहे.तालुक्यातील काशिलिंगवाडी, एकुंडी, बाज या गावांतील कामांची चौकशी झाली आहे. यामध्ये ३६ लाख ७४ हजार रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. तर सध्या माडग्याळ येथील कामांची चौकशी सुरू आहे. रोजगार हमीच्या कामाबाबत आसंगी (ता. जत), व्हसपेठ, गिरगाव, कोंतेवबोबलाद, टोणेवाडी, करेवाडी, सिंगनहळ्ळी, पांढरेवाडी, दरीबडची, येळवी, सनमडी, टोणेवाडी, कोसारी, मेंढीगिरी, देवनाळ, प्रतापूर या गावातील कामांबाबत तक्रारी आहेत. कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मनरेगाच्या कामात तालुक्यात तब्बल ४४ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. या सर्व कामांची इडीमार्फत किंवा त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी केली आहे.येळवी, टोणेवाडी, खैराव, कुणीकोणूर या भागात शेततलाव, विहिरीच्या कामात गोलमाल, तर प्रतापुरात पेव्हिंग ब्लॉकचे काम, रोपांची लागवड यात घोटाळा झाला आहे. कुणीकोणूरमधील रस्ता कामात व येळवीतील मरिआई मंदिराला सभामंडपाऐवजी व्यायाम शाळा म्हणून व चौकातील सभागृह चुकीच्या पध्दतीने बांधलेले आहे, असा आरोपही सावंत यांनी केला आहे.सध्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी पदभार घेतला आहे. तालुक्यातील मनरेगाच्या सर्व कामांची चौकशी केल्यास महाघोटाळा उघडकीस येईल. यात अनेक भ्रष्ट अधिकारी अडकतील. याची खातेनिहाय किंवा त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.