शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून माणगंगेचे खोलीकरण, रुंदीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST

आटपाडी : लोकवर्गणी आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून माणगंगा नदीपात्रातील झाडे, बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. आटपाडी तालुक्यातील ...

आटपाडी : लोकवर्गणी आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून माणगंगा नदीपात्रातील झाडे, बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडी ते राजेवाडीपर्यंतचे नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी सद्गुरू श्री श्री साखर कारखाना (राजेवाडी) आणि माणगंगा भ्रमण सेवा बहुउद्देशीय संस्था (सांगोला) यांच्या वतीने माणगंगा नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण सुरू करण्यात आले आहे.

माणगंगा नदी शिखर शिंगणापूर येथील डोंगरातून उगम पावते. तेथून म्हसवड, राजेवाडी, दिघंची, कौठूळी, नाझरे, सांगोला यामार्गे वाहते. नदीचा उगम ते शेवट १५३ किलोमीटरचा प्रवास आहे. नदीचे पात्र विस्तृत आणि खोल आहे. दुष्काळी भागाला नदीचे वरदान मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे माणगंगा नदी कोरडी पडत चालली आहे. सांगोला येथील माणगंगा भ्रमण सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ घोंगडे आणि स्वयंसेवकांनी नदी प्रवाहित करण्यासाठी दोन वेळा पायी प्रवास करून नदीचा अभ्यास केला. यातून माणगंगा नदी पुनरुज्जीवित करण्याचा अभ्यास करून पूर्ण प्रकल्प तयार केला आहे.

नदी पुनरुज्जीवित कामाचा खर्च सद्गुरू श्री श्री साखर कारखाना चाळीस टक्के आणि माणगंगा भ्रमण सेवा बहुउद्देशीय संस्था ६० टक्के करणार आहे. सांगोला तालुक्यातून काम करत आटपाडी तालुक्यापर्यंत आले आहे. आटपाडी तालुक्यात खानजोवाडी ते राजेवाडी या २२ किलोमीटरचे काम एका महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये नदीपात्राचे खोलीकरण आणि सरळीकरण केले जाणार आहे. नदीपात्रात आणि कडेला वाढलेली चिलार झाडे काढून पात्र स्वच्छ केले जाणार आहे.

बावीस किलोमीटरमधील सात बंधाऱ्यातील गाळ शेतकऱ्यांना मोफत भरून दिला जाणार आहे. माणगंगा पुनरुज्जीवित उद्घाटनावेळी आमदार अनिल बाबर यांनी डिझेलसाठी स्थानिक आमदार विकास निधीतून पाच लाख रुपये मंजुरीचे पत्र दिले तसेच स्वतः ५१ हजार मदतीचा धनादेश संस्थेकडे सोपवला.

यावेळी प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार सचिन मुळीक, सद्गुरू कारखान्याचे अध्यक्ष शेषागिरी राव, वैजनाथ घोंगडे, धनंजय पाटील, राजू वाघमारे उपस्थित होते.