शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

मातामृत्यूच्या प्रमाणात ७० टक्क्यांनी झाली घट

By admin | Updated: April 11, 2017 00:19 IST

जिल्ह्यात वर्षात ३० मातांचा बळी : ९९.९९ टक्के मातांची प्रसुती रुग्णालयात

सांगली : सर्वांगीण आरोग्य सेवांचा दर्जा संख्यात्मकच न राहता तो गुणात्मक वाढविण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा पहिला टप्पा २००५ पासून कार्यान्वित केला. याचा जिल्ह्यात फायदा झाला असून, २००७ मध्ये मातामृत्यूचे प्रमाण ११५ होते. यामध्ये सुमारे ७० टक्के घट होऊन ते ५४ पर्यंत खाली आले आहे. ९९.९९ टक्के मातांची प्रसुती रुग्णालयात होत आहे. तरीही २०१६-१७ वर्षात ३० मातांचा मृत्यू झाला आहे.अभियान सुरू होण्यापूर्वी सांगली जिल्ह्याचा दरहजारी जन्मदर २.२४ असा होता. तो सध्या १.९२ वर आला आहे, तर जन्मापासून एक वर्षाच्या कालावधित होणारे अर्भक मृत्यूचे प्रमाण दर हजार जन्मामागे २५ इतके होते, ते २०१७ पर्यंत ८.३ वर आले आहे. भारतात आजही नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण दर हजारी २५ इतके असताना, सांगली जिल्ह्याने यात लक्षणीय घट केली आहे. जिल्ह्यात अतिनवजात व नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण हे अनुक्रमे ८.३ इतके आहे.गरोदरपण व प्रसुतीत मातांचा मृत्यू टाळण्यातही जिल्ह्याने प्रगती केली आहे. महाराष्ट्रात २००७ मध्ये एक लाख लोकसंख्येमागे १०४ मातांचा मृत्यू झाला होता, तर सांगली जिल्ह्यात हे प्रमाण ११५ इतके होते. मातेची मासिक पाळी चुकताच नाव नोंदणी करणे सोयीचे असल्याने मदर अँड चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टीम ही आॅनलाईन गरोदर माता व बालकांची नोंदणी पद्धत सुरू करण्यात आली आहे. या नोंदणीचे फलित म्हणजे जिल्ह्यात प्रसुतीचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात ९९.९९ टक्के मातांची प्रसुती ही संस्थेत होत आहे. जिल्ह्यात १०० टक्के मातांची नोंदणी करण्यात आली आहे. यासोबतच जन्मलेल्या प्रत्येक बालकाची नोंदणी करून त्याला पुढे दोन वर्षापर्यंत द्यावयाच्या सेवांची नोंद करण्यात येते. या उपायामुळेच मातामृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. २०१६-१७ मध्ये महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे ८७ मातांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यात हे प्रमाण ५४ इतके आहे.गरोदर मातेची प्रसुती सुरक्षित होऊन माता व बालकांना कमीत-कमी ७२ तास आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीत ठेवता यावे, यासाठी जिल्ह्यात प्रसुती ठिकाणाचे बळकटीकरण करण्यात आले आहे. प्रसुती केंद्राच्या ठिकाणी २४ तास प्रसुतीची व्यवस्था केली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी सांगितले.