शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

शिवाजी विद्यापीठाच्या तासगाव उपकेंद्राचा राजकीय दबावातून निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:19 IST

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी मॅनेजिंग कौन्सिलचा ठराव झाला होता. मात्र, आज बुधवारी अचानक मंत्रिमंडळाच्या बैठकीत ...

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी मॅनेजिंग कौन्सिलचा ठराव झाला होता. मात्र, आज बुधवारी अचानक मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात करण्यासाठी झालेला निर्णय हा राजकीय दबावापोटी घेण्यात आला असल्याचा आरोप करंजे (ता. खानापूर) येथील अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी केला. दरम्यान, खानापूर येथे होणारे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर तालुक्यात न होण्यामागे येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याची टीकाही यावेळी सूर्यवंशी यांनी केली.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी विद्यापीठाचे मॅनेजिंग कौन्सिल सहमत होते. त्याबाबतचा ठरावही खानापूरसाठी होता. मात्र, गेल्या महिन्यात खानापूर येथील शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी खानापूर व आटपाडी तालुक्यातील विद्यार्थी आणि सुशिक्षित लोकांचा विचार करून उपकेंद्र खानापूरला मंजूर करण्याबाबत सांगण्यात आले.

मात्र, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अचानक शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तासगावला उपकेंद्र होणार असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यांचा हा निर्णय राजकीय दबावापोटी आहे. हा निर्णय होत असताना, खानापूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधींनीही याबाबत आपली काहीही भूमिका मांडली नाही. हा निर्णय येथील लोकप्रतिनिधींचे अपयश आहे.

परंतु, हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि खानापूर, आटपाडी तालुक्यांवर अन्याय करणारा आहे. या निर्णयाला अजून अंतिम मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे आगामी काळात लवकरच खानापूर व आटपाडी तालुक्यांतील विद्यार्थी आणि स्थानिक लोकांची एकजूट करून तीव्र संघर्ष उभा करणार असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी सांगितले.