शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

शिवाजी विद्यापीठाच्या तासगाव उपकेंद्राचा राजकीय दबावातून निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:19 IST

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी मॅनेजिंग कौन्सिलचा ठराव झाला होता. मात्र, आज बुधवारी अचानक मंत्रिमंडळाच्या बैठकीत ...

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी मॅनेजिंग कौन्सिलचा ठराव झाला होता. मात्र, आज बुधवारी अचानक मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात करण्यासाठी झालेला निर्णय हा राजकीय दबावापोटी घेण्यात आला असल्याचा आरोप करंजे (ता. खानापूर) येथील अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी केला. दरम्यान, खानापूर येथे होणारे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर तालुक्यात न होण्यामागे येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याची टीकाही यावेळी सूर्यवंशी यांनी केली.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी विद्यापीठाचे मॅनेजिंग कौन्सिल सहमत होते. त्याबाबतचा ठरावही खानापूरसाठी होता. मात्र, गेल्या महिन्यात खानापूर येथील शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी खानापूर व आटपाडी तालुक्यातील विद्यार्थी आणि सुशिक्षित लोकांचा विचार करून उपकेंद्र खानापूरला मंजूर करण्याबाबत सांगण्यात आले.

मात्र, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अचानक शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तासगावला उपकेंद्र होणार असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यांचा हा निर्णय राजकीय दबावापोटी आहे. हा निर्णय होत असताना, खानापूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधींनीही याबाबत आपली काहीही भूमिका मांडली नाही. हा निर्णय येथील लोकप्रतिनिधींचे अपयश आहे.

परंतु, हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि खानापूर, आटपाडी तालुक्यांवर अन्याय करणारा आहे. या निर्णयाला अजून अंतिम मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे आगामी काळात लवकरच खानापूर व आटपाडी तालुक्यांतील विद्यार्थी आणि स्थानिक लोकांची एकजूट करून तीव्र संघर्ष उभा करणार असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी सांगितले.