शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाच्या तासगाव उपकेंद्राचा राजकीय दबावातून निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:19 IST

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी मॅनेजिंग कौन्सिलचा ठराव झाला होता. मात्र, आज बुधवारी अचानक मंत्रिमंडळाच्या बैठकीत ...

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी मॅनेजिंग कौन्सिलचा ठराव झाला होता. मात्र, आज बुधवारी अचानक मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात करण्यासाठी झालेला निर्णय हा राजकीय दबावापोटी घेण्यात आला असल्याचा आरोप करंजे (ता. खानापूर) येथील अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी केला. दरम्यान, खानापूर येथे होणारे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर तालुक्यात न होण्यामागे येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याची टीकाही यावेळी सूर्यवंशी यांनी केली.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी विद्यापीठाचे मॅनेजिंग कौन्सिल सहमत होते. त्याबाबतचा ठरावही खानापूरसाठी होता. मात्र, गेल्या महिन्यात खानापूर येथील शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी खानापूर व आटपाडी तालुक्यातील विद्यार्थी आणि सुशिक्षित लोकांचा विचार करून उपकेंद्र खानापूरला मंजूर करण्याबाबत सांगण्यात आले.

मात्र, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अचानक शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तासगावला उपकेंद्र होणार असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यांचा हा निर्णय राजकीय दबावापोटी आहे. हा निर्णय होत असताना, खानापूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधींनीही याबाबत आपली काहीही भूमिका मांडली नाही. हा निर्णय येथील लोकप्रतिनिधींचे अपयश आहे.

परंतु, हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि खानापूर, आटपाडी तालुक्यांवर अन्याय करणारा आहे. या निर्णयाला अजून अंतिम मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे आगामी काळात लवकरच खानापूर व आटपाडी तालुक्यांतील विद्यार्थी आणि स्थानिक लोकांची एकजूट करून तीव्र संघर्ष उभा करणार असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी सांगितले.