शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील निर्बंधांबाबतचा निर्णय शासनाच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती कायम राहिल्याने या आठवड्यातील निर्बंधाबाबत रविवारी निर्णय होऊ शकला नाही. पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांवर असल्याने ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती कायम राहिल्याने या आठवड्यातील निर्बंधाबाबत रविवारी निर्णय होऊ शकला नाही. पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांवर असल्याने निर्बंध कायम ठेवायचे की व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार सूट द्यायची याबाबतचा निर्णय आता सोमवारी होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री जयंत पाटील या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्बंधाबाबत निर्णय घेणार आहेत.

दरम्यान, रविवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यातील निर्बंधाबाबत पर्याय शोधण्याची सूचना केली तर निर्बंधाबाबत सर्वसमावेशक निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

जिल्ह्यातील कोरोना स्थिती व उपाययोजनांबाबत रविवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक झाली. यात कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील कोरोनास्थिती, रुग्णालये व उपचाराच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली.

बैठकीत कोरोना रुग्णसंख्या स्थिर असल्याबाबत चर्चा झाली. सोमवारपासून सर्व दुकाने खुली करण्यासाठी व्यापाऱ्यांनी जोरदार मागणी लावून धरल्याने त्याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष होते. बैठकीत यावर चर्चाही झाली. त्यात कृषी राज्यमंत्री डॉ. कदम यांनी कोरोना स्थिती कायम असली तरी प्रशासनाने पर्याय शोधावेत अशी सूचना केली. मात्र, जिल्ह्याची कोरोना स्थिती अद्यापही चिंताजनक असल्याने व पाॅझिटिव्हिटी रेटही तुलनेने जादा असल्याने निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुनच निर्णय होणार आहे. रविवारी दिवसभर मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असल्याने व मुख्यमंत्रीही आढावा घेण्यात व्यस्त असल्याने पालकमंत्री पाटील सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतील अशी शक्यता आहे. शासनाशी चर्चा करुन निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. जिल्ह्यात सध्या अत्यावश्यक सेवांना दुपारी चारपर्यंतची परवानगी आहे.

चौकट

रुग्णसंख्या ठरतेय चिंताजनक

गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या कायम राहिली होती. उलट दोनवेळा नवीन बाधितांच्या संख्येने बाराशेचा टप्पा पार केला होता. नवीन रुग्णसंख्या सरासरी हजारावर कायम असतानाच, मृत्यूचे प्रमाणही कायम आहे. जिल्ह्यात दिवसाला सरासरी २० मृत्यूची नोंद होत आहे. महापालिका क्षेत्रासह वाळवा तालुक्यात रुग्णवाढ कायम राहिली आहे. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या आठवड्यात कोरोनाला उतार लागलेल्या कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यातही पुन्हा रुग्ण वाढत आहेत.