शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

जिल्ह्यातील निर्बंधांबाबतचा निर्णय शासनाच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती कायम राहिल्याने या आठवड्यातील निर्बंधाबाबत रविवारी निर्णय होऊ शकला नाही. पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांवर असल्याने ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती कायम राहिल्याने या आठवड्यातील निर्बंधाबाबत रविवारी निर्णय होऊ शकला नाही. पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांवर असल्याने निर्बंध कायम ठेवायचे की व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार सूट द्यायची याबाबतचा निर्णय आता सोमवारी होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री जयंत पाटील या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्बंधाबाबत निर्णय घेणार आहेत.

दरम्यान, रविवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यातील निर्बंधाबाबत पर्याय शोधण्याची सूचना केली तर निर्बंधाबाबत सर्वसमावेशक निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

जिल्ह्यातील कोरोना स्थिती व उपाययोजनांबाबत रविवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक झाली. यात कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील कोरोनास्थिती, रुग्णालये व उपचाराच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली.

बैठकीत कोरोना रुग्णसंख्या स्थिर असल्याबाबत चर्चा झाली. सोमवारपासून सर्व दुकाने खुली करण्यासाठी व्यापाऱ्यांनी जोरदार मागणी लावून धरल्याने त्याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष होते. बैठकीत यावर चर्चाही झाली. त्यात कृषी राज्यमंत्री डॉ. कदम यांनी कोरोना स्थिती कायम असली तरी प्रशासनाने पर्याय शोधावेत अशी सूचना केली. मात्र, जिल्ह्याची कोरोना स्थिती अद्यापही चिंताजनक असल्याने व पाॅझिटिव्हिटी रेटही तुलनेने जादा असल्याने निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुनच निर्णय होणार आहे. रविवारी दिवसभर मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असल्याने व मुख्यमंत्रीही आढावा घेण्यात व्यस्त असल्याने पालकमंत्री पाटील सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतील अशी शक्यता आहे. शासनाशी चर्चा करुन निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. जिल्ह्यात सध्या अत्यावश्यक सेवांना दुपारी चारपर्यंतची परवानगी आहे.

चौकट

रुग्णसंख्या ठरतेय चिंताजनक

गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या कायम राहिली होती. उलट दोनवेळा नवीन बाधितांच्या संख्येने बाराशेचा टप्पा पार केला होता. नवीन रुग्णसंख्या सरासरी हजारावर कायम असतानाच, मृत्यूचे प्रमाणही कायम आहे. जिल्ह्यात दिवसाला सरासरी २० मृत्यूची नोंद होत आहे. महापालिका क्षेत्रासह वाळवा तालुक्यात रुग्णवाढ कायम राहिली आहे. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या आठवड्यात कोरोनाला उतार लागलेल्या कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यातही पुन्हा रुग्ण वाढत आहेत.