शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

जलसंधारणाची कामे जिल्हा परिषदेकडेच ठेवण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:39 IST

सांगली : जलसंधारणाची कामे करण्यास जिल्हा परिषद सक्षम असल्याने राज्य सरकारने ती काढून घेऊ नयेत, अशी मागणी जिल्हा परिषदेने ...

सांगली : जलसंधारणाची कामे करण्यास जिल्हा परिषद सक्षम असल्याने राज्य सरकारने ती काढून घेऊ नयेत, अशी मागणी जिल्हा परिषदेने केली आहे.

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सध्या १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमतेची कामे करते. शासनाच्या नव्या आदेशानुसार ६०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमतेची कामे जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद्‌ व जलसंधारण विभागाकडून केली जाणार आहेत, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील कामे राज्य शासनाकडे जाणार आहेत. जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत या आदेशाला सदस्यांनी विरोध केला. कामे जिल्हा परिषदेकडेच ठेवण्याची मागणी झाली.

अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. कृषी विभागाकडून नियोजन समितीच्या निधीतून घेतल्या जाणाऱ्या शेततळ्यांसाठी तालुकास्तरावरून व्यापक प्रसिद्धी देण्याची सूचना सदस्यांनी केली. जलयुक्त शिवार योजनेतील नादुरुस्त बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मागविण्यात आले. वन विभागाकडील नालाबांधही गाळ काढून खोलीकरण करण्याचे ठरले.

सामाजिक वनीकरण विभागाची रोपे व झाडे उन्हाळ्यात पाण्याअभावी वाळून जातात, त्यांना पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी फळझाडांना प्राधान्य देत लोकसहभागाची संकल्पनाही सुचविण्यात आली.