शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा बाजारपेठा सुरू करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST

सांगली : व्यापारी पेठांवरील निर्बंध मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम आम्ही सरकारला देत आहोत. निर्बंध मागे न घेतल्यास येत्या ...

सांगली : व्यापारी पेठांवरील निर्बंध मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम आम्ही सरकारला देत आहोत. निर्बंध मागे न घेतल्यास येत्या सोमवारपासून आम्ही बाजारपेठा सुरू करू, असा इशारा शहरातील व्यापाऱ्यांनी गुरुवारी बैठकीत दिला.

व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी कापडपेठ येथे विविध व्यापारी संघटना, विविध पक्षांचे नेते यांची बैठक घेतली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक अभिजित भोसले, पान महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, ज्येष्ठ व्यापारी तात्यासाहेब गडदे, रवी खराडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर, युसूफ जमादार, हॉटेल असोसिएशनचे शैलेश पवार आदी उपस्थित होते.

समीर शहा म्हणाले, असोसिएशनने दिलेल्या मुदतीप्रमाणे शुक्रवारीच सर्व व्यवसाय सुरू करायचे ठरले होते; पण मुख्यमंत्र्यांबरोबर राज्यातील सर्व शिखर संघटनांची बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांची मुदत मागत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार संयम ठेवून सर्वच संघटनांनी उद्यापर्यंत थांबायचे, असा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत निर्णय शासनाकडून झाला नाही, तर शनिवार, रविवारचा लॉकडाऊन झाल्यावर सोमवारी महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसाय सुरू करण्यात येईल.

नगरसेवक भोसले म्हणाले, अन्यायी लॉकडाऊनमुळे जिल्ह्याचे, पर्यायाने शहराचे अर्थचक्र थांबणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून व्यापार सुरू झाला पाहिजे. यासाठी आम्ही गुन्हे दाखल करून घेण्यास तयार आहोत.

अजित सूर्यवंशी यांनी शहराच्या व्यापारासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. यासाठी एकजूट हवी. सर्व संघटनांची एक कृती समिती स्थापन करावी, अशी मागणी केली.

महापौर सूर्यवंशी म्हणाले, या प्रश्नाबाबत जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती देण्यात येईल. सकारात्मक निर्णय घेण्यास मी त्यांना विनंती करेन. इतर सर्व नेत्यांनी सोमवारी दुकाने उघडताना आम्ही व्यापाऱ्यांसोबत सोबत उभे राहू, असे आश्वासन दिले.

चौकट

मोर्चावर टीका

या बैठकीत आ. सुधीर गाडगीळ यांनी काढलेल्या मोर्चावर काही व्यापाऱ्यांनी टीकाही केली. हॉटेल संघटनेचे अध्यक्ष सतीश पवार यांनी गाडगीळ यांच्या मोर्चाला हजेरी लावली आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत येऊन मोर्चावरच टीका केली. ते म्हणाले, मी सांगलीकर म्हणून मोर्चात गेलो होतो. याठिकाणी व्यापारी मोर्चात सहभागी नव्हते. भाजपचे नेते जिल्हाधिकाऱ्यांना वेगळेच सांगत होते. आम्हाला गट-तट नको, नियम पाळायला आम्ही तयार आहोत.