शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

यशवंत कारखान्याच्या आंदोलनातील कामगाराचा मृत्यू; कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर

By अविनाश कोळी | Updated: April 16, 2023 20:46 IST

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी २०१२ मध्ये कारखान्याचा लिलाव केला आणि बँकेचे कर्ज फेडून घेतले.

विटा : थकीत पगाराच्या मागणीसाठी गेल्या सव्वादोन महिन्यांपासून विटा तहसील कार्यालयासमोर आंदोलनास बसलेल्या नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत साखर कारखान्याच्या आंदोलनातील अत्यवस्थ झालेले अमृत यशवंत लोंढे (वय ६५, रा. वाळूज, ता. खानापूर) या कामगाराचा रविवारी सायंकाळी उपचारावेळी मृत्यू झाला.

विटा तहसील कार्यालयासमोर दि. १ फेब्रुवारीपासून थकीत पगाराचे आठ कोटी २८ लाख रुपये मिळावेत, या मागणीसाठी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. हे कामगार गेल्या सव्वादोन महिन्यांपासून आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनातील कामगारांपैकी अमृत लोंढे यांची प्रकृती शुक्रवार, दि. १४ एप्रिल रोजी बिघडली. त्यांच्यावर विटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी २०१२ मध्ये कारखान्याचा लिलाव केला आणि बँकेचे कर्ज फेडून घेतले. त्यावेळी या लिलावातून मिळालेल्या पैशातून एक हजाराहून अधिक साखर कामगारांचे एकूण ८ कोटी २८ लाख रुपये जिल्हा बँकेकडून देणे आहे. वाळूज येथील कामगार अमृत लोंढे यांना गुरुवारी अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या सहकारी आंदोलन कामगारांनी त्यांना त्यांच्या विट्यातील मुलाच्या घरी पाठवले. मात्र, त्यांना शुक्रवारी पहाटे पुन्हा त्रास वाढल्याने येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांसह आंदोलनास बसलेल्या यशवंत कारखान्याच्या कामगारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.