शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2016 23:47 IST

काळुंद्रेतील घटना : वन विभागाकडून दुर्लक्ष; चार दिवसांपासून वावर

येळापूर/शिराळा : काळुंद्रे (ता. शिराळा) येथील शेतकरी संभाजी बंडू उबाळे (वय ५५) यांचा शुक्रवारी गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. हे वृत्त समजताच ग्रामस्थांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती; परंतु वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याची रात्री उशिरापर्यंत दखल घेतली नव्हती. संभाजी उबाळे शुक्रवारी सकाळी भात काढणीसाठी गावाच्या दक्षिणेला असणाऱ्या शेतात गेले होते. त्यावेळी शेजारील शेतातून आलेल्या गव्याच्या त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये उबाळे गंभीर जखमी झाले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. काही वेळाने उबाळे यांचा मुलगा शेतात भात काढणीसाठी आला. त्यावेळी वडील मृतावस्थेत पाहून त्याला जबर धक्का बसला. याबाबतची माहिती त्याने कुटुंबीयांना कळविली. शेतात मोठ्या जनावराच्या पायाचे ठसे उमटल्याने, हा हल्ला गव्यानेच केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. याच भागात चार दिवसांपूर्वी ग्रामस्थांना गव्याचे दर्शन झाले होते. उबाळे यांचा मृतदेह शिराळा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वन अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत वन विभागाचे अधिकारी आले नव्हते. शेवटी अंधार पडल्यानंतर वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक, ए. जी. यमगर, बी. जी. मिरजकर गावात हजर झाले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. गेल्या महिन्यात याच परिसरात गवा मृतावस्थेत सापडला होता. चांदोली अभयारण्यातील बिबट्या, रानडुकरे, गवे यासारखे अनेक प्राणी मानवी वस्तीत येत असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. उबाळे हे प्रगतशील शेतकरी असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या एका मुलाचे शेडगेवाडी येथे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे, तर दुसरा मुलगा सैन्यदलात गुवाहाटी येथे कार्यरत आहे. (वार्ताहर)