शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2016 23:47 IST

काळुंद्रेतील घटना : वन विभागाकडून दुर्लक्ष; चार दिवसांपासून वावर

येळापूर/शिराळा : काळुंद्रे (ता. शिराळा) येथील शेतकरी संभाजी बंडू उबाळे (वय ५५) यांचा शुक्रवारी गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. हे वृत्त समजताच ग्रामस्थांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती; परंतु वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याची रात्री उशिरापर्यंत दखल घेतली नव्हती. संभाजी उबाळे शुक्रवारी सकाळी भात काढणीसाठी गावाच्या दक्षिणेला असणाऱ्या शेतात गेले होते. त्यावेळी शेजारील शेतातून आलेल्या गव्याच्या त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये उबाळे गंभीर जखमी झाले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. काही वेळाने उबाळे यांचा मुलगा शेतात भात काढणीसाठी आला. त्यावेळी वडील मृतावस्थेत पाहून त्याला जबर धक्का बसला. याबाबतची माहिती त्याने कुटुंबीयांना कळविली. शेतात मोठ्या जनावराच्या पायाचे ठसे उमटल्याने, हा हल्ला गव्यानेच केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. याच भागात चार दिवसांपूर्वी ग्रामस्थांना गव्याचे दर्शन झाले होते. उबाळे यांचा मृतदेह शिराळा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वन अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत वन विभागाचे अधिकारी आले नव्हते. शेवटी अंधार पडल्यानंतर वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक, ए. जी. यमगर, बी. जी. मिरजकर गावात हजर झाले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. गेल्या महिन्यात याच परिसरात गवा मृतावस्थेत सापडला होता. चांदोली अभयारण्यातील बिबट्या, रानडुकरे, गवे यासारखे अनेक प्राणी मानवी वस्तीत येत असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. उबाळे हे प्रगतशील शेतकरी असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या एका मुलाचे शेडगेवाडी येथे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे, तर दुसरा मुलगा सैन्यदलात गुवाहाटी येथे कार्यरत आहे. (वार्ताहर)