शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा चाळीस हजार एकर द्राक्षबागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 23:59 IST

तासगाव : सलग तीन दिवस पडलेला पाऊस, ढगाळ हवामान आणि दव यामुळे जिल्ह्यातील सुमारे चाळीस हजार एकरावरील द्राक्षबागांना फटका ...

तासगाव : सलग तीन दिवस पडलेला पाऊस, ढगाळ हवामान आणि दव यामुळे जिल्ह्यातील सुमारे चाळीस हजार एकरावरील द्राक्षबागांना फटका बसला आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षाबांगा घडकूज, दावण्याने वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यावर्षी द्राक्षबागायतदारांना नुकसानीचा सामना करावा लागला असून, सुमारे चार हजार कोटींचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागाला वादळी पावसाने झोडपले आहे. खानापूर, आटपाडी, तासगाव कवठेमहांकाळ, मिरज, पलूस तालुक्यात अनेक ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे. बुधवारी पाऊस झाला नसला तरी, दिवसभर ढगाळ वातावरण होते. दोन, तीन दिवसांपासून सकाळी दहापर्यंत द्राक्षबागेतील दव कायम राहिले आहे. ऐन द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने हा पाऊस द्राक्षबागांच्या मुळावर आला आहे. गेल्यावर्षी लवकर द्राक्षछाटण्या घेतल्या होत्या. त्यावेळी पावसामुळेच द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी बहुतांश शेतकºयांनी आॅक्टोबर महिन्यात द्राक्ष छाटणी घेतली. मात्र आता तामिळनाडूतील वादळामुळे जिल्ह्यात झालेल्या पावसाने पुन्हा मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के द्राक्षबागा फ्लॉवरिंग अवस्थेत आहेत. सलग तीन दिवस पडलेला पाऊस, ढगाळ हवामान आणि दव यामुळे बहुतांश बागांतून घडकूज, मणीगळ आणि दावण्या रोग दिसून येत आहे. त्यामुळे या द्राक्षबागा उद्ध्वस्त होणार आहेत. नुकसानीचे नेमके चित्र स्पष्ट झाले नसले तरी, आॅक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पीक छाटणी झालेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसणार असून, सुमारे ४० हजार एकर द्राक्षबागांना अंदाजे चार हजार कोटींच्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.सलग दुसºया वर्षी निसर्गाचा प्रकोपआगाप छाटणी घेतल्यानंतर चांगला दर मिळतो, या अपेक्षेतून बहुतांश द्राक्षबागायतदारांनी सप्टेंबर महिन्यात पीक छाटणी घेतली होती; मात्र गेल्यावर्षीच्या अवकाळी पावसामुळे आगाप छाटण्या घेतलेल्या सर्व द्राक्षबागांचा हंगाम वाया गेला होता. त्यामुळे यावर्षी बहुतांश द्राक्षबागायतदारांनी आॅक्टोबर महिन्यात पीक छाटणी घेतली. मात्र याहीवर्षी पावसामुळे द्राक्षबागांना फटका बसला. त्यामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत.