शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

अवकाळीचा चाळीस हजार एकर द्राक्षबागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 23:59 IST

तासगाव : सलग तीन दिवस पडलेला पाऊस, ढगाळ हवामान आणि दव यामुळे जिल्ह्यातील सुमारे चाळीस हजार एकरावरील द्राक्षबागांना फटका ...

तासगाव : सलग तीन दिवस पडलेला पाऊस, ढगाळ हवामान आणि दव यामुळे जिल्ह्यातील सुमारे चाळीस हजार एकरावरील द्राक्षबागांना फटका बसला आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षाबांगा घडकूज, दावण्याने वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यावर्षी द्राक्षबागायतदारांना नुकसानीचा सामना करावा लागला असून, सुमारे चार हजार कोटींचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागाला वादळी पावसाने झोडपले आहे. खानापूर, आटपाडी, तासगाव कवठेमहांकाळ, मिरज, पलूस तालुक्यात अनेक ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे. बुधवारी पाऊस झाला नसला तरी, दिवसभर ढगाळ वातावरण होते. दोन, तीन दिवसांपासून सकाळी दहापर्यंत द्राक्षबागेतील दव कायम राहिले आहे. ऐन द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने हा पाऊस द्राक्षबागांच्या मुळावर आला आहे. गेल्यावर्षी लवकर द्राक्षछाटण्या घेतल्या होत्या. त्यावेळी पावसामुळेच द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी बहुतांश शेतकºयांनी आॅक्टोबर महिन्यात द्राक्ष छाटणी घेतली. मात्र आता तामिळनाडूतील वादळामुळे जिल्ह्यात झालेल्या पावसाने पुन्हा मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के द्राक्षबागा फ्लॉवरिंग अवस्थेत आहेत. सलग तीन दिवस पडलेला पाऊस, ढगाळ हवामान आणि दव यामुळे बहुतांश बागांतून घडकूज, मणीगळ आणि दावण्या रोग दिसून येत आहे. त्यामुळे या द्राक्षबागा उद्ध्वस्त होणार आहेत. नुकसानीचे नेमके चित्र स्पष्ट झाले नसले तरी, आॅक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पीक छाटणी झालेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसणार असून, सुमारे ४० हजार एकर द्राक्षबागांना अंदाजे चार हजार कोटींच्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.सलग दुसºया वर्षी निसर्गाचा प्रकोपआगाप छाटणी घेतल्यानंतर चांगला दर मिळतो, या अपेक्षेतून बहुतांश द्राक्षबागायतदारांनी सप्टेंबर महिन्यात पीक छाटणी घेतली होती; मात्र गेल्यावर्षीच्या अवकाळी पावसामुळे आगाप छाटण्या घेतलेल्या सर्व द्राक्षबागांचा हंगाम वाया गेला होता. त्यामुळे यावर्षी बहुतांश द्राक्षबागायतदारांनी आॅक्टोबर महिन्यात पीक छाटणी घेतली. मात्र याहीवर्षी पावसामुळे द्राक्षबागांना फटका बसला. त्यामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत.