शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

बोरगावातील नदीपात्रात मृत माशांचा खच

By admin | Updated: May 18, 2015 01:02 IST

कृष्णा दूषित : बोरगावसह बहे, फार्णेवाडी, ताकारी गावांमधील नागरी आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी, मळी मिसळल्याने पाणी दूषित होऊन रविवारी हजारो मासे मृत झाले. बोरगावसह बहे, फार्णेवाडी, ताकारी गावांच्या नदीकाठावर मृत माशांचा खच पडला आहे. यामुळे नदीकाठावरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढे होऊनही संबंधितांवर कारवाई का होत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. साथीचे रोग पसरू नयेत यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने ग्रामस्थांना पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन केले आहे. मासे मृत होण्याची दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कृष्णा नदीपात्रात कारखान्यांनी रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील मासे मृत झाले आहेत. तसेच अनेक माशांच्या जाती संपुष्टात येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रशासन मात्र गांधारीची भूमिका घेत आहे. नागरिकांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग यांच्याकडे लेखी, तोंडी तक्रार देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आवाज उठवणाऱ्यांवरच कायद्याचा धाक दाखविला जात असल्याने सामान्य नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. प्रदूषण न थांबल्यास नदीकाठचे नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. उन्हाळ््यात पाणी कमी होत असताना कृष्णेतील प्रदूषण वाढत आहे. (वार्ताहर)