शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

बोरगावातील नदीपात्रात मृत माशांचा खच

By admin | Updated: May 18, 2015 01:02 IST

कृष्णा दूषित : बोरगावसह बहे, फार्णेवाडी, ताकारी गावांमधील नागरी आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी, मळी मिसळल्याने पाणी दूषित होऊन रविवारी हजारो मासे मृत झाले. बोरगावसह बहे, फार्णेवाडी, ताकारी गावांच्या नदीकाठावर मृत माशांचा खच पडला आहे. यामुळे नदीकाठावरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढे होऊनही संबंधितांवर कारवाई का होत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. साथीचे रोग पसरू नयेत यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने ग्रामस्थांना पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन केले आहे. मासे मृत होण्याची दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कृष्णा नदीपात्रात कारखान्यांनी रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील मासे मृत झाले आहेत. तसेच अनेक माशांच्या जाती संपुष्टात येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रशासन मात्र गांधारीची भूमिका घेत आहे. नागरिकांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग यांच्याकडे लेखी, तोंडी तक्रार देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आवाज उठवणाऱ्यांवरच कायद्याचा धाक दाखविला जात असल्याने सामान्य नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. प्रदूषण न थांबल्यास नदीकाठचे नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. उन्हाळ््यात पाणी कमी होत असताना कृष्णेतील प्रदूषण वाढत आहे. (वार्ताहर)